रविवार, १९ जुलै, २०१५

तुझे नि माझे नाते काय


तुझे नि माझे नाते काय?

महान कवी अन गीतकार संदीप खरे व शानदार संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांना आपण ओळखतो मुख्यत्वे आयुष्यावर बोलू काही या शानदार गाणे कवितांच्या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमाचे जगभर जवळपास हजार प्रयोग केल्यावर हि जोडी तसाच एक दुसरा नजराणा रसिकांसाठी घेऊन आले आहेत. "तुझे नि माझे नाते काय?". "प्रेम" हा त्याच्या गाणे कवितांचा कधीही न संपणारा अन तुफान लोकप्रिय विषय. मग कविता वाचन अन गाणे यांचा एक असा कार्यक्रम असल्यास ज्यात मुख्य विषय म्हणजे प्रेम तर?

या कल्पनेचे मूर्त रूप म्हणजे "तुझे नि माझे नाते काय?"


बर मान्य कि प्रेम हा विषय असू दे पण मग फक्त तरुणाईचा ओढा राहील, बाकीच्या वयांबद्दल काय? तर याचे उत्तर म्हणून हे दोघंही प्रत्येक वयोगटात असणार्या प्रेम या संकल्पनेच्या विविध बाजूना या कार्यक्रमात स्पर्श करतात.टीनेजर अर्थात तरुण-मध्यमवयीन-आणि मोठे या सर्व वयोगटाना आपल्या गाणे-कवितात सामील करून सुवर्णमध्य साधलेला आहे.
आता आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाशी अगदी नैसर्गिकपणे या कार्यक्रमाची तुलना होईलच. दोन्ही कार्यक्रमांचा सादरीकरणाचा format सारखाच आहे पण यावेळेस त्यांनी घेतलेला महत्वाचा बदल म्हणजे रंगमंचावरील उपस्थिती. आधीच्या कार्यक्रमात फक्त संदीप-सलील हे दोघंच स्टेजवर असायचे पण या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सर्व वाद्यवृन्दाना आणि दोन गायिकांना स्टेजवर संमिलीत केलेले आहे, या दोन गायिकांमध्ये सौभाग्यवती सोनिया (संदीप) खरे यांचे देखील प्रेक्षकांना दर्शन घडते. मी बघितलेल्या आजच्या प्रयोग क्रमांक दोन मध्ये तरी त्या होत्या.
-समीर 

शनिवार, १८ जुलै, २०१५

बजरंगी भाईजान



बजरंगी भाईजान

मागच्याच पंधरवड्यात आपण एक आयडियल आणि अद्भुत दक्षिण भारतीय कलाकृती अनुभवली. मग आता या कलाकृतीला आपण हिंदीत आपल्या स्टाईलने टक्कर द्यायला नको? याच इच्छेला दमदार उत्तर देण्यासाठी आलाय बजरंगी भाईजान.एक परिपूर्ण अन उत्कृष्ट कलाकृती.
कहाणी:
मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) हि एक पाकिस्तानी मुलगी. कर्मधर्मसंयोगाने चुकून पाकिस्तानातून भारतात हरवून येते आणि ती आपल्या पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी भाईजान (सलमान खान) ला सापडते.
तो आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पाकिस्तानात कसा पोचवतो या मुख्य धाग्याभोवती गुंतलेली कहाणी म्हणजे बजरंगी भाईजान. आता कुणालाही शंका येईल कि त्यात काय विशेष म्हणून. आणि ते खरेही आहे पाकिस्तानात एका हरवलेल्या मुलीला पोचवणे यात काहीही तीर मारण्यासारख नाही. पण जर ती मुलगी मुकी असली तर? हो ती मुलगी मुकी असते!!! तिला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन एका मुक्या मुलीला तिच्या घरी पाकिस्तानात पोचवणे हा नक्कीच एका कहाणीचा विषय आहे. मग कहाणी हिंदी म्हणजे प्रेम,मैत्री,द्वेष इत्यादी इत्यादी भावना वेगवेगळ्या अनुषंगाने कथेत डोकावतात. गाणेही असतातच. पण भारतीय (हिंदी) मानसिकतेसाठी महत्वाच प्रकरण म्हणजे कहाणी. या एंड वर सलमानने पूर्ण यशस्वीपणे बाजी मारलेली आहे.
अभिनय:
सलमान खानचे कौतुक शब्दश: करावे तितके कमी इतके शानदारपणे त्याने पवन चतुर्वेदी उभा केलेला आहे. एका रिटायर्ड वेद विशारद पहलवानाचा मुलगा. पहलवानी आणि अभ्यासातही कमी. त्याच्या आयुष्यात अचानक घडलेला बदल. आयुष्यात झालेले नायिकेचे आगमन. आणि या सगळ्या कोलाहलातून त्याने केलेली मानवतेच्या पातळीवर एका मुक्या मुलीची मदत. करीना कपूर देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण तुम्ही बाहेर निघता तेंव्हा तुमच्या लक्षात राहतो तो सलमान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी. वास्तविक बघता नवाजुद्दिन सिद्दिकी हा एका सहाय्यक भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेचे कथेतले आगमनही मध्यंतरानंतर होते. पण बाहेर पडताना तुम्हाला लक्षात राहतो तो त्याने रंगवलेला सहाय्यक आणि सालमन हे दोघच बस. हर्षाली मल्होत्रा या छोकरीचे कौतुक केल्याशिवाय बजरंगी भाईजानच्या अभिनयाचा उल्लेखही भविष्यात होणार नाही इतकी छाप तिने सोडलेली आहे. तिने रंगवलेली शाहिदा (मुन्नी) हि एक मुकी मुलगी आईपासून दूर आणि आईच्या शोधात. वाचताना महत्व फक्त एका वाक्यात संपत असल तरी बघताना पूर्ण चित्रपट उभा राहिला राव तीन तासांचा. खरोखर छोकरी अक्षरश: शाहिदा म्हणून जगलेली आहे पूर्ण कहाणीभर
दिग्दर्शन:
कबीर खान या आपल्या एक था टायगर वाल्या शिपच्या कप्तानाला यावेळेस सलमानने स्वत: एक निर्माता बनल्यावर रिपीट केलेला आहे. एक था टायगर मध्ये देखील भारतीय आणि पंजाबी जासूस यांची प्रेमकहाणी अशी वेगळीच थीम होती. आणि या वेळेस तर कहाणी खूपच वेगळी होती. पण कबीर खान स्वत: कहाणी सहलेखक आणि पटकथा व संवाद लेखकही असल्यामुळे तो सर्व आघाड्यावर शीपचा कप्तान होता. वास्तविक बघता भारत-पाकिस्तान मधील दरीला आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात सांधणे असा एक स्तुत्य प्रयत्न होता. भारत आणि पाकिस्तानमधील सर्वसामान्य लोकांना हि दरी नकोय. त्यांना हवाय तो शांततेचा मार्ग. हा संदेश देताना समोर सलमान असल्यावर आणि किक व जय हो च्या अपयशानंतर सर्व नजर बजरंगी भाईजान वर असल्यावर इतक्या स्फोटक कहाणीला दमदारपणे पेलून दाखवणे म्हणून कबीर खानचे कौतुक करावेच लागेल.
त्याच्या दिग्दर्शन शैलीच्या वेगळेपणाचे एकच उदाहरण घेऊ, कोणत्याही कहाणीला प्रेक्षकांच्या आतपर्यंत झिरपण्यास कोणत्याही सिनेमाचे पहिले दहा मिनीट मुख्य भूमिका बजावतात. या दहा मिनटात समोर पडद्यावर कुणीही असू दे पण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे. बजरंगीमध्ये पहिल्या दहा मिनटात सलमान नसतो पडद्यावर पण एका छोट्या मुलीला अप्रतिम रित्या हाताळून कबीर खान प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर पुढील तीन तास खिळवून ठेवतो. एक था टायगर मध्ये पहिल्या दहा मिटताच तो प्रेक्षकांना flash back थ्रू कहाणीच्या मुळावर नेतो. मान्य असू दे वा नसू दे पण हि नस जी कबीर खान ला गवसलेली आहे ती भविष्यात त्याला एक यशस्वी दिग्दर्शक पातळीवर नेईल हे नक्की.
संगीत:
बजरंगी भाईजान मध्ये संगीत प्रीतम चे आहे. वैयक्तिक रित्या प्रीतम जा मला नेहमीच वन सॉंग वंडर वाटत आला आहे . प्रीतम हा संगीत दिग्दर्शक असलेल्या बर्याचश्या सिनेमात केवळ एक गाण हे इतके अप्रतिम असते कि बर्याचदा केवळ ते गाणे कमर्शियल पातळीवर चालून जाते आणि बाकी ठणठणगोपाळ. धूम (टायटल सॉंग), रेस- १ (जरा जरा टच मी), ये जवानी है दिवानी (बदतमीज दिल) हे त्याची काही उदाहरणे. याही सिनेमात सगळेच गाणे आपापल्या जागी शोभतात पण आपल्या किर्तीनुसार एक गाणे अप्रतिम देऊन गेला आहे प्रीतम. अदनान सामी ची कौसर मुनीर लिखित गझल "भर दो झोली मेरी". या गाण्याचं सिच्युएशन इतक जबरदस्त होत आणि त्या गझलचे बोलही त्या प्रसंगाला साजेसे आहेत. सेल्फी ले ले सारखा "वेळ मारून ने" टाईप काम नाही. अदनान सामीने ती गझल अगदी अप्रतिम रित्या निभावलेली आहे. त्याच्या बुर्सटलेल्या वजनापेक्षाही ती गझल आणि त्याचे बोल प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

हिंदी सिनेमा कसा असतो? तर तो कहाणीवर अवलंबून असतो, त्या कहाणीला चारही अंगाने फुलवतो त्यातला कलाकारांचा अभिनय.पण हिंदी सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमासारखा व्यक्तीपुजक नसल्यामुळे कहाणी जर प्रेक्षकांना भावली तर आणि फक्त तरच कोणत्याही सिनेमाला हिंदीत हिट असा दर्जा मिळतो. केवळ एखाद्या अभिनेत्याची उपस्थिती हे हिंदीत कमर्शियल यशस्वीतेतच लक्षण नसते. याच आपल्या मागच्या जय हो आणि किक या आपल्या मागील अपयशावरून सलमान खान ने जबरदस्त धडा घेऊन बजरंगी भाईजान आणलेला आहे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असा हा हिंदी चित्रपट मला आवडला आणि नावं ठेवण्या इतकी कोणतीही गोष्ट यात जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, १४ जुलै, २०१५

बाहुबली



बाहुबली 
अतिशय प्रचंड प्रमाणात प्रदर्शनपूर्व गाजावाजा झालेली कलाकृती, अडीचशे कोटीचे बजेट पासून अक्षरश: नवीन वसवलेल्या एका बोलीभाषे पर्यंत अनेकानेक दंतकथा आणि समोर येतो "बाहुबली"
दक्षिण भारतीय चित्रपटांची हि खरोखर खासियत असते कि कहाणीत कमतरता असतीलही कदाचित पण ते इतका जीव ओतून कहाणीला रंगवतात कि माणूस त्या जाणवणाऱ्या मेहनतीच्याच प्रेमात पडतो. भलेही काल्पनिक कथा अस डिस्क्लेमर सुरवातीला देऊनही व्यक्ती कहाणीत इतका गुंतून जातो कि नकळतपणे कहाणीच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतो.

अडीचशे कोटींचे बजेट, मग शानदार फॉरेन लोकेशन्स, जबरदस्त वेशभूषा, हाय-फाय चारचाक्या इत्यादी इत्यादी आपल्या अपेक्षेत असते हिंदी चित्रपटसृष्टीला अनुसरून पण यांपैकी काहीही नाही. उपरोल्लेखित गोष्टींपैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही तुम्ही चित्रपट रसिक असा वा नका असू बाहेर पडताना चित्रपटाबद्दल काहीही खराब बोलत नाही. दिग्दर्शक-पटकथा लेखक आणि सह कहाणी लेखक एस एस राजमौलीचे हेच सगळ्यात मोठे यश. माउथ-टू-माउथ पब्लिसिटिच्या पहिल्याच पायरीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवण्यात चित्रपटाला यश मिळते. हा दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे याचे हिंदी व्हर्जन आल्यास बाहुबलीची मुख्य भूमिका कुणी करावी असा विचार तुमच्या (हिंदी) मनातचमकलाच समजा तर मध्यंतराच्या आधीपर्यंत "कुणीही" चालेल असे वाटणारे आपण मध्यंतरा नंतर फक्त ह्रिथिक रोशन आणि टायगर श्रॉफ पाशी येउन थांबतो त्या दोघांच्या असलेल्या फिजिकल फिटनेस मुळेच.

हिंदी किंवा भारतीय असं म्हणू चित्रपटसृष्टीवर नेहमीच टीका होते कि टेक्निकली खूप खूप कमी आहे म्हणून. या टीकेला समर्थ नाही म्हणता येणार पण बर्याच अंशी उत्तर देणारी एक कलाकृती म्हणून भविष्यात बाहुबलीचे नाव घेतल्या जाईल. जास्त डिटेल आपल्याला कळत नाही पण लक्षात येणारी ठळक गोष्ट म्हणजे छायाचित्रण. विमानातून शूट करून जमिनीवरचे अगदी अप्रतिमरीत्या रेखाटलेले युद्ध. अक्षरश: इतके शानदाररित्या कि "३००" नावाचा एक हॉलीवूडपट आला होता त्याची बरोबरी करणारे छायाचित्रण अन स्पेशल इफेक्ट्स. मान्य करा वा नका करू पण हि गोष्ट भारतीय (सगळ्याच) चित्रपटसृष्टीत दुर्मिळ.
कहाणी:
दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे निर्विवादपणे नायक प्रधान. हि कहाणी थोडी प्राचीन काळची आहे. म्हणजे राज्य- राज्याचा अपेक्षित उत्तराधिकारी-त्यावरून रंगलेले नाट्य आणि त्याचा झालेला शेवट. हा शेवट नीटपणे न करता तेथेही स्पष्टपणे दिग्दर्शकाने सिक्वेलची मुहूर्तमेढ केलेली आहे. म्हणजे कहाणीला पुढे नेण्यासाठी का होईना पण बाहुबली पार्ट टू नक्की येणारच.
अभिनय:
कहाणीत दोन भाऊ प्रभास आणि राणा दग्गुबत्ती. पण त्यांचा उल्लेख न करता बाहुबली पुढे सरकरणारच नाही.आता कहाणीच थोडीशी वेगळी मग नायकही त्या भूमिकेला तोलून धरणारा हवा. पण सांगण्यास आनंद कि प्रभास आणि राणा दग्गुबत्ती हे दोघेही शब्दश: पुरून उरतात आपापल्या भूमिकांना. प्राची कालचे युद्ध, घोडेस्वारी, रथांचे handling आणि रथांवरून युद्ध कौशल्य दाखवणे इत्यादी इत्यादी बाबी खरोखर अप्रतिम रित्या राजामौलीने हाताळलेल्या आहेत. नाही म्हणायला थोड्यावेळासाठी तमन्ना देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण मध्यंतरानंतर थोड्या वेळाने ती गायब होते आणि पुन्हा दर्शन देत नाही . तिच्या भूमिकेच्या अस्तित्वाचे मुख्य कारण प्रभास (बाहुबलीच्या) व्यक्तिरेखेचे आपल्याच जीवनाच्या भूतकाळातले आगमन बस. एक गाणही आहे पण तोंडी लावण्यापुरते. एम एम करीमला काही काम. अभिनयासाठी सत्यराज म्हणजेच कटप्पाचा उल्लेख करावाच लागेल. एका महत्वाचा सहाय्यक भूमिकेत तो आहे. कोठेही अतिशयोक्ती न होऊ देत अप्रतिमरीत्या आपले फक्त अस्तित्व जाणवून गेलाय तो.

कोणताही चित्रपट का बघावा किंवा का बघू नये याची कारणे व्यक्तिपरत्वे बदलतात. या कारणात वय-आणि अनुभव हे महत्वाची भूमिका बजावतात. एकादी गोष्ट जी मला आवडते तिचा एखाद्या वाचकाला तिटकारा असू शकतो. पण तरीही रिव्ह्यू मी लिहिला अन तो तुम्ही वाचताय या न्यायाने मी बाहुबलीला दिग्दर्शन-स्पेशल इफेक्ट्स आणि सगळ्याच अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, ३० जून, २०१५

कविता

कविता 
कविता लिहिणे अन कविता बनवणे 
यात काय फरक असावा?? 
शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण 
विचारसरणीतील 'नेमकेपणाकुठून यावा !!

फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे 
हेच कवितेचे यश आहे
पण त्या भावना नीट समजावून घेणे 
हेच रसिक मनाचे लक्षण आहे

कुणी भावनांना महत्व देईल तर कुणी शब्दांना
वय आणि अनुभव यावर हे अवलंबून आहे
पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडते
वास्तविकतेत यालाच महत्व आहे

शब्द न शब्द जोडून
ओळ ओळ बनेलहि
डोकं थोSSड वापरून यमक
पण जुळेलहि…………

पण शब्दांशी शब्द जुळवून
कविता कदाचित लिहिल्या जाईल
पण त्यात अर्थ नसला तर
"कविता बनवणे" या पासून कवी दूर राहील

लिहिणे जसे सर्वसमावेशक  
तसेच वाचनही अनेकानेक  कंगोरे स्पर्शणारे असावे
टीका करून लक्ष वेधणे इतकाच  क्षुल्लक हेतू नसावा
तर प्रतिक्रियेने कवीस आत्मचिंतनास बाध्य करावे

-समीर  

शनिवार, २० जून, २०१५

ABCD - 2



ABCD - 2 

ABCD म्हणजेच anybody can dance या आपल्याच मागच्या वर्षीच्या गाजलेल्या चित्रपटाच्या पुढचा भाग म्हणजेच सिक्वल घेऊन दिग्दर्शक रेमो डिसुझा आले असून पूर्णत: नवीन कथानक आहे अन पहिल्या भागाशी कथेचा काहीही संबंध नाही. पहिल्या भागातील पात्र हे तसेच दुसर्या भागात वापरण्यात आले असून त्यांची नावं (कथेतील) फक्त बदलण्यात आलेली आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच हा हि चित्रपट पूर्णत: नृत्य आणि त्यातील टेक्नीकॅलिटीला वाहिलेला असून या हि भागात प्रभू देवा हे महत्वाच्या भूमिकेत (मागच्या भागाप्रमाणेच) आहेत. कदाचित पुढचा भाग कमर्शियली टिकण्याच्या दृष्टीने या वेळेस श्रद्धा कपूर अन वरुण धवन हि जोडी मुख्य नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत आणि मागच्या भागातील गणेश आचार्य यांचे मुख्य भूमिकेत पात्र नाही.

पहिल्या भागाच्या वेळेस अशी बरीच चर्चा होती कि पूर्णत: नृत्याला वाहिलेला एक चित्रपट हिंदी मुख्य चित्रपटधारेत टिकणार नाही. पण त्या चित्रपटाला जनतेने निर्मात्या/दिग्दर्शकाच्या अपेक्षेबाहेर पसंती दिली. इतकी कि मुख्य नायक नायिकेला घेऊन दुसरा भाग घेऊन येण्याची हिंमत त्यांनी केली. आणि हि हिंमत करण्यात कोठेही कसूर केलेली नाही हे मात्र जाणवून नक्कीच जाते.


कहाणी:
"fictious " हा मुंबईचा नालासोपारा येथील एक डान्स ग्रुप. त्या ग्रुपच्या सत्य घटनेवर आधारित हि कथा असं डिस्क्लेमर सुरवातीलाच मिळते आणि सगळ्यात शेवटी त्यांचे (खरेखुरे) फोटोदेखील टायटल नंतर दिसतात.

एक डान्स ग्रुप जो अमेरिकेपर्यंत जाऊन तेथील नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोचतो. हि आणि इतकीच कहाणीची स्टोरीलाइन पण हे execute करताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा हि झाली डिटेल कहाणी. आता नृत्य हाच मुख्य विषय असल्यामुळे पूर्ण कहाणीत कोठेही त्यावरचा फोकस कमी होत नाही. पण सांगण्यास आनंद कि जरी नृत्य आणि त्यातील टेक्नीकॅलिटी यावर फोकस असला तरी पूर्ण कहाणीत सर्वसामान्य प्रेक्षकाला 'समजल नाही ब्वा' असं कधीच वाटत नाही.

अभिनय:
वरुण धवन आणि `श्रद्धा कपूर यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे कारण नायक-नायिका असूनही या कथेत मुख्य व्यक्तिरेखांनी नृत्यनिपुण असणे हि एक महत्वाची requirement होती. पण सांगण्यात आनंद कि दोघेही समर्थपणे आपापल्या भूमिका निभावतात आणि काही प्रसंगात तर वरुण धवन नृत्यात प्रभू देवाला बरोबरीची टक्कर देतो. या बरोबरच नायक नायिका असल्यामुळे प्रेम हे आहेच. मग आपापल्या भावनांचे प्रदर्शन करण्यात देखील दोघेही यशस्वी झालेले आहेत.Lauren Gottilieb हिचे कौतुक करावेच लागेल. मागील भागातही ती कथेच्या अनुषंगाने एका महत्वाच्या भूमिकेत होती आणि या हि भागात कदाचित तिची नृत्य निपुणता श्रद्धा कपूर पेक्षा जास्त आहे हे ओळखून तिला कथेत श्रद्धा कपूरसोबत रिप्लेस केलेले आहे. कारण काहीही असो पण अप्रतिम डान्स तिचा.दिग्दर्शक/अभिनेते हे मागच्या भागाप्रमाणेच या हि भागात नृत्य शिक्षक किंवा मुख्य कोरिओग्राफरच्या भूमिकेत आहेत आणि शब्दश: समर्थपणे भूमिकेला निभावून नेतात ते.

दिग्दर्शन:
रेमो डिसुझा हे स्वत: एक उत्तम कोरिओग्राफर आहेत. त्यांची नृत्य निपुणता/समज इत्यादी इत्यादी बद्दल कुणाला शंका असण्याचे कारणच नाही. पण तरीही नृत्याला कथेचा अनुषंगाने पूर्ण वाहिलेला एक चित्रपट जेंव्हा तुम्ही काढता तेंव्हा या बेभरवशी बॉलीवूडच्या कमर्शियल दुनियेत तिकीटबारीचाही हिशेब करावाच लागतो आणि हो रेमोलाही चुकलेला नाही. मागील भागात अतिशय अप्रतिमरीत्या execute केलेला शेवटचा डान्स हि खासियत बनून गेली होती. या भागात मागचा जसा डान्स होता तसाच प्रयत्न शेवटच्या डान्समध्ये भारताचा झेंडा आणि एका पात्राला सहनुभूतीद्वारे प्रेक्षकांच्या भावनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. बरेच प्रसंग त्याने अप्रतिमरीत्या execute करवलेले आहेत उदाहरणार्थ सुरवातीचे वरुण धावांचे अपयश मग त्याचे त्याच्या आईला आठवून खंत नृत्याद्वारे व्यक्त करणे भलेही प्रसंग छोटा असला तरीही सुरवातीलाच असल्यामुळे प्रेक्षकांची पकड घेणारा होता आणि जो चुकला असता तर खर नव्हत काही. पण सांगण्यास आनंद कि जमला.
मागील वर्षी हैप्पी न्यू इयर नावाचा सुपरस्टार शाहरुख खानचा एक चित्रपट होता. ज्याचा कथेचा मुख्य विषय हा हि नृत्यच होता पण फोकस भावभावनावरच पूर्ण होता. टेक्नीकॅलिटीज पूर्णच दुर्लक्षित होत्या. हि देखील कथा बर्याच प्रमाणात त्या चित्रपटाशी मिळती-जुळती पण फोकस जास्त प्रमाणात नृत्य आणि अभिनेत्यांची नृत्य निपुणता यावर. हेच मुख्य अन महत्वाच जर जमल नसत तर कठीण होत. पण जमल.

मला चित्रपट आवडला पण सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात शेवटचा डान्स इम्प्रेसिव्ह वाटला नाही जो कि असायला हवा होता म्हणून मी चित्रपटला साडे तीन ३(१/२) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर 

रविवार, १४ जून, २०१५

ज्युरासिक वर्ल्ड




ज्युरासिक वर्ल्ड 

ज्युरासिक पार्क या स्टीवन स्पीलबर्गच्या चित्रपटाने हॉलीवूड चित्रपट व्यवसाय - तेथील तंत्रज्ञ इत्यादी गोष्टीना जगभर अचाट प्रसिद्धी मिळवून दिली. इतकी कि डायनासॉर अन ज्युरासिक पार्क म्हटले कि स्टीवन स्पीलबर्गच जगभर लोकांना आठवतो.या ज्युरासिक पार्क सिरीजचे नंतर तीन पार्टस (सिक्वेल) पण निघाले. याच कथेची री ओढत दिग्दर्शक कोलिन ट्रेवेरोव्ह पुन्हा एकदा ज्युरासिक वर्ल्ड (कदाचित चौथा पार्ट) हि काल्पनिक कथा घेऊन आलेले आहेत.
कहाणी:
डायनासॉरला अब्जावधी वर्षानंतर जिवंत करून त्यांच्या जिवनाच जनतेसमोर केलेले/मांडलेले प्रदर्शन आणि त्या प्रयत्नात झालेली काहीतरी गडबड अन अपरिमित हानी अशी ज्युरासिक पार्क मागची मुख्य कन्सेप्ट कन्सेप्ट/थीम होती. पहिल्या गाजलेल्या प्रोजेक्ट नंतर, नंतरच्या प्रत्येक प्रयत्नात थोड्याफार फरकाने हाच मुख्य दुवा होता. ज्युरासिक वर्ल्डहि त्याला अपवाद नाही पण या वेळेस ज्युरासिक पार्क मधेल्या डायनासॉरला R & D मध्ये बनवताना त्यांच्या जीन्स मध्ये केलेला बदल अन या वेळेस त्या बदलामुळे झालेली गडबड असा बदल करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला.

तंत्रज्ञान:
हॉलीवूड मध्ये असणारे एकूणच निर्मिती आणि हाताळणी तंत्र हे आपल्या हिंदी चित्रपट सृष्टी पेक्षा फार फार प्रगत आहे. मानवावर येणारी एखादी अनैसर्गिक आपदा आणि त्या आपदांपासून मानव जातीचा केलेला/झालेला बचाव या थीमवर बनलेले चित्रपट हे बनवणे आणि त्या पासून जगभरातून कमाई करणे हि हॉलीवूड चित्रपटसृष्टीची खासियत. या त्यांच्या इम्प्रेशनला जगणारे तंत्राचा वापर झालेला दिसतो. छोट्या छोट्या गोष्टी उदाहरणार्थ एका डायनासॉरच डॉल्फिन प्रमाणे वाहत्या पाण्यातून उडी मारणे मान्य कि हा एका तंत्राचा प्रकार आहे पण त्या तंत्रच execution शब्दश: उत्कृष पातळीवर (नेहमीप्रमाणेच) आहे. तंत्रज्ञान अर्थातच टेक्निकली हॉलीवूड हे बॉलीवूड पेक्षा उत्कृष्ट होत आणि राहील कारण वास्तविक बघता आमचा "लिंगा" हा रजनीकांतचा चित्रपटही असच भव्य होता पण धरणाच्या बांधकामाच exection करताना अनेक ठिकाणी भाव-भावनांना महत्व दिल्या जाऊन टेक्निकल कमी झाकण्यात आली.

हॉलीवूड आणि बॉलीवूड या दोन चित्रपटसृष्टीत मुख्य फरक कसा याचे एक उदाहरण या चित्रपटामुळे मिळते. बॉलीवूड मध्ये अर्थात हिंदी चित्रपटसृष्टी भावना(प्रेम/दु:ख इत्यादी इत्यादी), अभिनय क्षमता, कथा, दिग्दर्शन या मुख्य पायावर असते आणि हॉलीवूड चित्रपटसृष्टी कथा, पटकथा आणि कथे अन पटकथेला सांधणारे टेक्निकल आस्पेक्ट्स यावर अवलंबून असते हे या चित्रपटामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

मला सर्व दृष्टीने चित्रपट आवडला. कुठेही/कोणतीही कमी जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५ * देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, ९ जून, २०१५

देवाचा 'सुपर कंप्युटर'

सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे  कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .फॉर ex. या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पुण्य केल आहे त्याला या जन्मात हे सुख द्या या दुसर्या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पाप केल होत याला हे दु: द्या किती जिकिरीच काम असेल .जर कविता लिहू असे म्हटले तर किती खतरनाक सब्जेक्ट होईल

देवाचा 'सुपर कंप्युटर'
देवाचा हिशेब कसा असेल
मला पडला होता प्रश्न
उत्तर शोधता शोधता उत्तर गवसलं
अन चक्क भेटला वरचा  सुपर कम्प्युटर

विचार करा किती त्रासला असेल तो
देवाचा 'सुपर कंप्युटर'
कारण म्हणे हिशेब ठेवण नसते जोक
खास करून अजिबात नाही 'वर'

या व्यक्तीने केल फक्त  इतकच  पुण्य
याला आता  घडवा हा दैवयोग
अन त्या  व्यक्तीचे हे पाप
याला आता फक्त योगायोग

यांनी हि सेवा
केली होती त्या वेळेस
म्हणून याचं काम
अडायला नको या वेळेस

बर देवही नसेल  पक्का
आपल्याच निर्णयावर
दर वेळेस त्याचीच कमांड फिरते
चित्रगुप्ताच्या  कोणत्याही डिसिजनवर

कुणाजवळ उपलब्ध  असते 
केलेल्या पापांना डिलीटचे ऑप्शन
कुणाला  तोही  पर्याय  नाही
उरते यमाचे फक्त लांच्छन

कधी मी असा  विचार करतो कि
मी चित्रगुप्त नाही हे किती बरय
अप्पर व्ह्यू ने ब्रॉड गोष्टी
बघाव्या लागत नाहीत हे किती चांगलय

'हा' म्हणे मागच्या जन्मात
होऊच शकायचा नाही एकाग्र
मग त्याला या जन्मात
बनवा एकदम कुशाग्र

'हिचा' म्हणे मागच्या जन्मात
देवावर नव्हता विश्वास
या जन्मात देवाला
वाटली पाहिजे भक्ती खास

हा होता मागच्या जन्मात
अगदीच जीवन वेस्ट
याला बनवा या जन्मात
अगदी समकक्ष बिल गेट्स

'हा' म्हणे मागच्या जन्मात
होता राजकीय पण अपयशी कार्यकर्ता
याला म्हणे मग या जन्मात
बनवा त्याच पक्षाचा सर्वेसर्वा

मग वेळ आली कि
मीच त्याला थांबवल
म्हटल तुझी आपबिती बस झाली
आता माझ डोक गरगरल

मला भारतीय नोकरशहांची सवय
म्हटल बोल मित्रा काही जमते का?
माझ पाप असेलच हिशेबात
पुण्यात बदलण शक्य वाटते का 

मग शेवटी तो म्हटला
म्हणे इथे होत नाहीत कोणतेच काम भ्रष्ट
म्हणे देवाचा पूर्ण वचक आहे
विचारहि   करू नका नतद्रष्ट


समीर