रविवार, २९ मे, २०१६

लाल इश्क (मराठी)

प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........



एक अभिनेता आणि त्याची आधीची अर्धवट प्रेमकथा आणि कथेत दुसर्या नायिकेचे आगमन आणि या दोन्ही प्रेमकथांचा वेगवेगळा अन शेवटी एकत्र शेवट अशी एक वेगळीच  कहाणी चित्रपटात बघायला मिळते.कहाणीची सुरवातच इतकी जोरदार कि खून अन त्याचा शोध घेणारा पोलिस अधिकारी. मग हि कथा प्रेमकहाणी भोवती दोन कोनानी फिरल्यावर सरतेशेवटी त्या खुनाचा झालेला उलगडा. वास्तविक बघता या कहाणीला दोन नायिका असूनही एक थ्रिलर कहाणी म्हणून मोजणे जास्त संयुक्तिक ठरेल !! पण तरीही पूर्णत: थ्रिलर म्हणता येणार नाही कारण कथेची विविधांगी उठाठेव. खून-खुनाचा हेतू-खुनाची प्रक्रिया-खुनाचा शोध अन खुनाचा उलगडा अन शेवटच्या काही मिनिटात समजलेले खुनाचे कारण असल्या विविध कोनानी फिरणारी कहाणी आपण थ्रिलर या संकल्पनेतच मांडायला हवी.ते काहीही असो एका बाहेरच्या निर्मात्याने मराठीत येउन एक छानशी कहाणी उत्कृष्टरीत्या सादर केलेली आहे.

सुपरस्टार स्वप्नील जोशीने साकारलेला चित्रपट अभिनेता यश पटवर्धन आणि दोन नायिका १. अंजना सुखानी आणि समिधा गुरु आणि सोबतच जयंत वाडकर एका महत्वाच्या भूमिकेत/खलनायकाच्या भूमिकेत. स्वप्नील जोशीने आजवर एक romantic मराठी हिरो अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे पण त्याच्या romantic नसलेल्या अभिनय क्षमतेला वाव देणारी कलाकृती म्हणून भविष्यात लाल इश्क चे नाव घेतले जाइल. अंजना सुखानी हि हिंदी अभिनेत्री खरे पाहता पण मराठीची तयारी तिच्याकडून दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चांगली करवून घेतलेली आहे हे बरेचदा जाणवते. पण हशा पिकावते समिधा गुरु तिच्या "बाबू" संबोधण्याच्या पद्धतीने. हे "बाबू" संबोधन इनक्लुड कार्यासाठी दिग्दर्शकाचा हेतू काहीही असो पण झालंय ते हास्यास्पद. दोन्ही अभिनेत्र्यांच्या अभिनयातील कमतरतेबद्दल बरेच विशद करता येईल पण सध्या त्यांचे सौंदर्य अन स्वप्नील  जोशीचा अभिनय हीच अभिनयाची खासियत.

एक मराठी सिनेमा, एक त्रिकोणी  प्रेमकथा आणि उल्लेखनीय  नसलेले संगीत अशी एक कथा म्हणजे लाल इश्क. दोनच गाणे आणि त्यातीलही "चांद मातला" हे जरा सुश्राव्य गाणे आणि बाकी सगळाच  ठणठणगोपाळ. अर्थात तशी कथेचीच मागणी त्यामुळे सुसह्य

संजय लीला भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्य दिव्य सेट्स-वजनदार संवाद-उत्तम संगीत आणि शानदार पटकथा असे एक इम्प्रेशन त्याने सोडलेले आहे. पण यावेळेस सगळे व्यवस्थित जुळून आलेले  असले तरी संगीताची अनुपस्थिती आणि मंदावलेली पटकथा याने बोर्या वाजवलेला आहे. मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

शनिवार, ७ मे, २०१६

सैराट

मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच. त्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या पण लेखक-दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजुळेंचे त्यासाठी विशेष अभिनंदन.



नागराज मंजुळेंचा सिनेमा म्हणजे थोडाफार "आर्ट फिल्म" संकल्पनेकडे असलेली कहाणी अशी सर्वसाधारण रसिकांची मानसिकता त्यांनी बनवून ठेवलेली आहे. पिस्तुल्या अन fandry हे त्यांचे आजवरचे दोनच चित्रपट पण या संकल्पनेकडे वळणारे.पण प्रेम या संकल्पनेला घेऊन शेवट सोडून इतर कुठेही फारसा आर्ट फिल्मकडे न वळणारा एक चित्रपट आपण बनवू अशी कल्पना त्यांना तरी असेल का? देव जाणे!!  पण बनवला खरा. 

आर्ची अन परश्या हि एक टीनेजर जोडी. त्यांचे घडलेले प्रेम अन झालेला दु:खांत अशी कहाणी सैराट मध्ये आहे. सोशल साईट्सवर मी या कहाणीचा जातीशी वगेरे संबंध असून त्याच्याशी संबंधित खूप इंटरेस्टिंग चर्चा बघितल्या. पण चित्रपट प्रत्यक्ष बघितल्यावर समजल कि सैराट मध्ये कोणताही प्रत्यक्ष उल्लेख नाही. जो आहे तो इतका अप्रत्यक्ष आहे कि तुम्ही जोडूही शकता किंवा दुर्लक्षितहि करू शकता. पूर्णपणे बघणार्याच्या मानसिकतेवर अवलंबून. पण एक लहानसा स्कोप मात्र मंजुळेंनी सोडलेला आहे. पण माझ्या मते तसा कोणताही प्रत्यक्ष आक्षेपार्ह उल्लेख नाही.

आणखी एक महत्वाचं, आजपर्यंत मी बघितलेली कोणत्याही सिनेमाची एक सगळ्यात वेगवान कथा-पटकथा म्हणजे सैराट. पटकथेचा वेगळा साचा हाताळताना पकड सुटून भंगलेली कहाणी याचे संदर्भ पैश्याला पसाभर उपलब्ध आहेत. पण यशराज फिल्म्स किंवा धर्मा प्रोडक्शन्स यांना टक्कर देणारी जबरदस्त कथा-पटकथा अन ती हि मराठीत हे एक दुर्मिळ कॉम्बिनेशन निर्माण करण्यात नागराज मंजुळे अपेक्षेबाहेर यशस्वी झालेत हे नक्की. कथेचा वेग इतका जोरदार कि फक्त मध्यंतरापर्यंतच्या सैराट इतक्या कथेवर दोन किंवा तीन मराठी सिनेमे आणि चक्क एक हिंदी सिनेमा निघू शकला असता. तरीही  मध्यंतरा नंतरची कथेची महत्वाची बाजू आपण विचारात घेतलेली नाही हे येथे उल्लेखनीय. या प्रचंड वेगाच्या  धबधब्याला सावरताना, कोठेही एक मराठी प्रेक्षक जो मुळात बारीक चिरफाड करत कोणताही  सिनेमा बघतो, आपला इंटरेस्ट गमावणार नाही हि काळजी घेणे म्हणजे एक प्रचंड मोठे दिव्य. पण नागराज मंजुळे ते करून दाखवतात. या साठी त्यांचे खरोखर विशेष अभिनंदन.

नागराज मंजुळे हेच कथा-पटकथा लेखक-दिग्दर्शक अन झी Talkies बरोबर निर्मातेपण. थोडक्यात एक ऑल-इन-वन package. आज सिनेमा चालतोय म्हणून ठीकाय पण जर नीट बनला नसता तर त्यांचे जीणे हराम होईल इतकी टीका त्यावर झाली असती. सध्या उत्कृष्ट सिमेमावरच होत असलेली चर्चा अन त्या चर्चेतील सूर बघता असा अंदाज लावायला हरकत नसावी. याची त्यांना कल्पना नसेल असे मला वाटत नाही पण तरीही त्यांनी हि कलाकृती उभारली आणि मुख्य म्हणजे यशस्वीपणे पेलून दाखवली.त्यांचा मुळचा पिंड आर्ट फिल्मकडे वळणारा त्यामुळे त्यांनी स्वभावाप्रमाणे दु:खांत ठेवला. आपल्या सगळे गुडी गुडी बघण्याची सवय त्यामुळे तो दु:खांत खुपतो पण तोच कदाचित माउथ-टू-माउथ पब्लिसिटी साली प्रेरक असेल का?? भलेही या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येईल पण तरीही या दु:खांता मुळे निगेटिव्ह पब्लिसिटी मात्र होत नाहीये आजघडीला हे तिकीटबारीने दाखवून दिलेले आहे.
रिंकू राजगुरू (अर्चना पाटील-आर्ची) आणि आकाश ठोसर (प्रशांत काळे-परश्या) या दोघांची हि प्रेमकहाणी. त्यातही रिंकू राजगुरू हिची अभिनय क्षमता हि उत्कृष्ट कि काय (!!) हे कदाचित दिग्दर्शकाने आधी ओळखल्यामुळे असेल पण हि पूर्ण वेगवान पटकथा तिच्या भूमिके भोवती फिरते. नागराज मंजुळे यांचे या मुळच्या कास्टिंग साठीही विशेष अभिनंदन कारण मुख्य दोन्ही व्यक्तिरेखांचे कास्टिंग त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे घडवून आणलेले आहे. कास्टिंग डायरेक्टर वेगळा असणे हि चैन एका मराठी सिनेमाला परवडत नसावी असा माझा अंदाज आहे पण मुख्य दिग्दर्शक म्हणून या बेमालूम कास्टिंगचे श्रेय निर्विवादपणे नागराज मंजुळेंचेच. बाकीहि भूमिका आहेत, पर्श्याचा गोतावळा - आर्चीचा गोतावळा, पण इतकी वेगवान पटकथा 8५% सीन्समध्ये आर्चिसभोवताल फिरते आणि तिला मिळालेला "विशेष दखल अभिनयासाठी" हा  राष्ट्रीय पुरस्कार योग्य असल्याचे आर्ची सिद्ध करून दाखवते. 

अजय-अतुल या शब्दश: "महान" संगीतकार जोडगोळीचे संगीत हे सैराटचे मुख्य यश. तीन किंवा चारच  मुख्य गाणे पण ज्या ताकदीने त्या गाण्यांचा चित्रपटातील वापर आहे तो प्रेक्षकांना बांधून ठेवतो अन गुंतवून ठेवतो.  हि बाब मराठीत दुर्मिळ आणि म्हणूनच अनुभवण्यासारखी. त्यातही याच जोडीचे background music  म्हणजेच पार्श्वसंगीत. पण तेथेही त्यांची महान संगीत क्षमता ते प्रेक्षकांना जाणवून देतात. बाकी जाऊ देऊ पण परश्या-आर्चीची जी पहिली भेट होते तेथे आपला आजवरचा चित्रपटांचा अनुभव आपल्याला एखादं गाणं असेल असा अंदाज लावू देतो पण गाणे नाही आणि पार्श्वसंगीतासाठीचे जे कडवे आहे ते फिट्ट बसते\शोभते प्रसंगाला. अजय-अतुल हेच दोघे या सगळ्या गाण्यांचे लेखक. सगळ्या गाण्यांसाठी कौतुक पण "झिंगाट" साठी विशेष कौतुक. झिंगाट गाण्याचं कथेतील जे स्थान आहे ते महत्वाचे आहे कारण या गाण्यानंतर आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीला वेगळे वळण लागते किंवा ओहोटी लागते असे म्हणू पण हे गाणे जर जमले नसते तर काही खरं नव्हतं.  पण हि शक्यता तर दूरच इतके जबरदस्त गाणे कि कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दहा गाण्यात भविष्यात मोजले जाईल हि शक्यता निर्माण करून जाते हे गाणे. 

चांगले चित्रपट मराठीत बनतच नाही, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पगडा असलेला विनोदी काळ सोडून चित्रपट निर्माते बाहेरच पडत नाही वगेरे वगेरे असंख्य कारणे मी वेगवेळ्या चर्च्यानमध्ये बघितलेली आहेत. "कट्यार काळजात घुसली", " नटसम्राट" आणि आता "सैराट" नंतर या चर्च्याना एक पॉजीटिव्ह वळण लागेल अशी अशा बाळगतो आणि माझ्यातर्फे सैराटला पूर्ण पाच पैकी पाच (५ * ) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर  

रविवार, २० मार्च, २०१६

इच्छा नि आवश्यकता



"आवश्यकता" हा जीवनाचा न टाळण्याजोगा भाग
त्या देर-सवेर पुर्ण होतातच
काळानुसार  कधी ना कधी
त्या पुर्ण होण्यासाठी पळवाट मिळवतातच

खरा प्रश्न हा असतो कि
इच्छांना महत्व द्यावे कि आवश्यकताना??
दोघींचेही एकमेकांशी सख्य
पण नशिबाचा कस लागतो प्रत्यक्षात उतरताना

आवश्यकता कुणाच्याही शेवटी  पूर्ण होतातच
त्यात काहीही नवल नसते  
पण आवश्यकतांनी  इच्छांच रूप घेतल
आणि मग कुणि लक्ष्य मिळवलं तर मात्र नवल असते

आवश्यकता या  एखाद्या फकीराच्याही असतात
कशाही तो त्या पूर्ण करतोच करतो !!!
आणि इच्छा या एखाद्या राजाच्याही असतातच
त्या साठी तो गाऱ्हाणे  रडतोच रडतो !!!

हाच असेल बहुधा  देवानी नेमलेला
नशिबाचा मुख्य कार्यभाग
सगळ्यांना नेहमीच सगळंच मिळाल
तर देवाने शेवटी कुठे घ्यावा सहभाग

-समीर 

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

England Vs South Africa


आपल्या आय पी एलच्या फायनल सारखा अक्षरश: उत्कंठा शिगेला पोचवणारा 20-20 आंतरराष्ट्रीय सामना आज विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीतच बघायला मिळाला. अर्थात भारतीय पिचचा वाटा असला तरी खेळाडूंचे योगदान दुर्लक्षित करता येणारच नाही. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २३० धावांचा पहाड उभा केला. आणि प्रत्युत्तरात इंग्लंडने डेल स्टेन असलेल्या गोलंदाजांच्या तोफखान्याचा सामना करत लक्ष्य २० षटके व्हायच्या आधीच गाठलं. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या मानसिकतेच प्रदर्शन यातून स्पष्टपणे घडलं असे मला वाटलं. इंग्लंडच्या डावात १७ व्या षटकात मॉरीसला जरा फटका पडल्यावर आफ्रिकन खेळाडू पूर्ण आशा सोडून बसले होते आणि आशा न सोडता प्रयत्न केला असता तर चित्र निश्चितच वेगळं राहिलं असतं. वास्तविक बघता त्यांच्या फिल्डिंगने त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचून दिला. पण त्यांच्या पराभवाला हि खचलेली मानसिकताच शेवटी कारणीभूत ठरली.आजपर्यंतच्या २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसर्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा धावांचा पाठलाग केल्याबद्दल इंग्लंड संघाचे अभिनंदन.
-समीर

मंगळवार, १५ मार्च, २०१६

New Zealand Vs India

New Zealand beat India by 47 runs
still I will appreciate Indian performance for-
1. Captain Dhoni's bold decision to finish Ashwin's quota of all 4 overs before 10th over
2.Captain did not loose his calmness after getting hit for a six to Ashwin on 1st ball of match
3. Jaspreet Bumrah's bowling skill specially his ability to bowl yorkers is exceptional compared to other Indian bowlers
4.In 2007 world cup India loose first match against New Zealand and then went on to win the world cup.
On this positive note, I support Team India.

रविवार, १३ मार्च, २०१६

फुन्त्रू (मराठी)


मराठी सिनेमा हा "प्रेम" हा विषय सोडून साय-फाय थ्रिलर अश्या मराठीला कदाचित पूर्णत: अनोळखी असणार्या प्रांतात शिरू शकतो काय?? उत्तर आहे होय!!!! तसली हिंमत करणारे फिल्ममेकर्स मराठीत आहे आणि तसा प्रयत्नही ते करण्याची हिंमत करू शकतात, या हिमतीला लोकाश्रय कितपत मिळेल हे काळ ठरवेलच पण प्रयत्न मनापासून केलेला आहे हे जाणवते हे मात्र नक्की. त्यातही उल्लेखनीय असे की     साय-फाय थ्रिलर हा प्रकार कदाचित मराठीत नाही आणि मराठीचं एकूणच आर्थिक गणित बघता ते शक्यही नाही पण हि हिंमत करून दिग्दर्शक सुजय एस. डहाके मराठीत कदाचित पहिल्यांदाच एक साय-फाय थ्रिलर घेऊन आलेत. शेवट करताना त्यातही तो अर्धवट ठेवून आणि फुन्त्रू-२ अशी पाटी देऊन सुजयजींनी सिक्वेल येणारच असे अप्रत्यक्षपणे दर्शकांना सुचित केलेले आहे.

मोहन आगाशे हे एक इंजीयारिंग कॉलेजचे प्राध्यापक-संशोधक-फाउंडर-संशोधक वगेरे. मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेजचे.  साय-फाय थ्रिलर अर्थात सायन्स वर बेतलेली रहस्यमय कथा जेंव्हा बनवल्या जाते तेंव्हा आपण जे साधर्म्य कथेसाठी जोडतोय ते खरोखर बघण्यासारखे नाही काय? एक मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेज मधले विद्यार्थी-प्राध्यापक इतक्या शिताफीने कम्प्युटर software प्रॉब्लेम्स इतक्या डीटेल्ससकट उलगडू शकतात??थोडावेळ विनोद बाजूला ठेवू पण केतकी माटेगावकर सारखी मुलगी देखील मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये admission घेत नाही, त्याची कारणे आपण बाजूला ठेवू पण असे घडते हे मात्र नक्की.     
      
मदन देवधर (वीरा) हा एक मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी आणि (अनया) केतकी माटेगावकर ही त्याची क्लासमेट. ती त्याला आवडते आणि तो प्रयत्न करतो पण त्याला जवळपास रिजेक्ट करते. मग तो एका प्रोजेक्टपर्यंत पोचतो आणि तिची एक प्रतिकृती तयार करतो. या सगळ्या गुंत्याला साकारताना कहाणी मैत्री-effective task execution इत्यादी इत्यादी बर्याच विषयांना स्पर्श करते.
संजय डहाके हे या आधी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या "शाळा"या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना भेटलेत. फुन्त्रू हे टायटल का तर इमेज क्रिएशन चा जो प्रोजेक्ट विराला सापडतो त्या प्रोजेक्टचे नाव असते फुन्त्रू. संजयजीच याचे कथा व पटकथा लेखक. कथा व्यवस्थित जुळवून आणलेली आहे त्यांनी काही क्षुल्लक डीटेल्स वगळले तर कुणीही कथेवर बोट दाखवू शकणार नाही उदा. इंजिनियरिंगचे विद्यार्थी सोडले तर. पण मुद्दा आहे पटकथा कारण ही देखील संजयजिंचीच. कथेला नीट जुळवण्यात कदाचित इतकी मेहनत घेतल्या गेली की पटकथेकडे दुर्लक्ष झालेले आहे हे नक्की. इतके स्पष्ट दुर्लक्ष की कथेचा अंदाज प्रेक्षकांना लागून जातो पण कथाच पुढे न सरकल्यामुळे प्रेक्षक कंटाळून जातात.
हृषीकेश-सौरभ-जसराज असे तीन संगीतकार या चित्रपटाला लाभलेत आणि सांगण्यास आनंद की अप्रतिम संगीत सगळ्या गाण्यांना त्यांनी दिलेले आहे.बाकी सगळे गाणे तर उत्तम आहेतच पण वैभव जोशी यांनी लिहिलेल्या "अलख निरंजन तू" हे गाणे विशेष उल्लेखनीय. आणखी एक संगीतात संगीत दिग्दर्शकांनी जे कमावलं ते साकेत कानेटकर यांनी पार्श्व-संगीतात गमावलं. असे बरेच प्रसंग होते ज्यात उत्तम पार्श्व-संगीत ही कहाणीची गरज होती कारण कहाणी ही एक साय-फाय थ्रिलर होती. पण........

संजय जाधव यांनी टाईमपास १ च्या वेळेस शेवट न करवता अर्धवट ठेवून सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या संजयजींनी सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केलेली आहे. सिक्वेल आल्यास हरकत नाही पण नवीन भागात संथ पटकथा आणि पार्श्व संगीत या बाबींकडे लक्ष देतील अशी अपेक्षा प्रेक्षक बाळगतात. मला चित्रपट ठीक वाटला म्हणून मी दोन (२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

मिस्टर एंड मिसेस सदाचारी (मराठी)





आशिष वाघ हे नवीन दिग्दर्शक मराठीत पदार्पण करीत असून मिस्टर एंड मिसेस सदाचारी हा सिनेमा घेऊन आलेले आहेत. टायटल वरून वाटत असल्याप्रमाणे सदैव चांगले आचरण करणारे जोडपे यासम काहीही प्रकार नसून मुख्य नायक "शिवा सदाचारी" आणि त्याची लग्नापर्यंतची हि कहाणी म्हणून नाव मिस्टर एंड मिसेस सदाचारी. वास्तविक बघता आशिष वाघ हे मराठी चित्रपट वितरण व्यवसायातील मोठे नाव पण यावेळेस स्वत:च दिग्दर्शक बनलेत. एका चित्रपट वितरकाला पटकथेच्या वेगाचा अंदाज नसावा हे दुर्दैवी!!! पण तसे घडलंय खर.

कहाणी:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) हा एक अभ्यासातल्या अपयशामुळे सतत वर्षानुवर्षे घरच्यांच्या आणि त्यातही मुख्यत्वे वडलांच्या रोषाला बळी पडलेला एक मुलगा. त्याला झालेले प्रेम. या प्रेमाची त्याने केलेली adjustment आणि सरतेशेवटी हुशार भावाला पछाडत घरच्या संकटात वडलाना केलेली मदत अशी एक खूपच कन्फ्युजिंग कहाणी यात बघायला मिळेल.

अभिनय:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) आणि प्रार्थना बेहेरे हे दोघे मुख्य भूमिकेत यात आहेत म्हणजेच मिस्टर आणि मिसेस. पण मोहन जोशी यांनीही शिवाच्या वडलांच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वैभव म्हणजे मराठीतला सुपरस्टार एकदम अभिनयात "बाप" माणूस असे समजत कि काय पण पटकथा आणि कथालेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी त्याला इतके अति-महत्व दिलेले आहे कि बस. प्रेक्षक त्रासण्याइतके अति महत्व. मान्य कि बाजीराव-मस्तानी मध्ये चिमाजी अप्पाची भूमिका वैभवने अप्रतिम निभावली पण म्हणून तो लंगड्या कथा-पटकथेला तारून नेईल या अपेक्षेला काय म्हणावे?  प्रार्थना बेहेरेने "अती" न करता तिच्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित निभावलेली आहे. तिचे सौंदर्य हीच तिची अभिनयापेक्षाही जमेची बाजू आहे हे जाणून तिने तिच्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. पण बाहेर निघताना लक्षात राहतात ते मोहन जोशीच. आधी आपल्या नावडत्या मुलाचा त्यांचा दुस्वास मग आयुष्याच्या उत्तरार्धात आवडत्या मुलाने वार्यावर सोडल्यावर नावडता मुलगा जेंव्हा सावरतो तेंव्हा ते जाणवल्यावर त्यांचे कबुल करणे हे प्रेक्षकांवर छाप सोडून जाते.

दिग्दर्शन:
आशिष वाघ हे चित्रपट वितरण व्यवसायातून चित्रपट दिग्दर्शनात उतरलेले आहेत. तरीही त्यांनी इतके विविध प्रयत्न एकसाथ करावे याचे अप्रूप. प्रेमकहाणी-मित्रमेळा-प्रेमासाठी नायकाची इतरांना मदत- शिवजयंती इत्यादी इत्यादी विविध कोनाने कहाणी तीनही तास त्यांनी फिरवलेली आहे. शेवटी शेवटी लव जिहाद कडेही कहाणी वाकेल अशी शंका "नीता" च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना येते पण आशिष वाघ तिथे दया करतात कदाचित प्रेक्षकांवर.  पण त्यांनी पहिलाच प्रयत्न पुरेपूर निभावण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिवेन्सेस वगेरे जबरदस्त जुळून आलेत पण.....

संगीत:
संगीत या चित्रपटाचा एकमेव stong point. पंकज पडघन यांनी अप्रतिम संगीत दिलेले आहे सगळ्या गाण्यांना. पंकज पडघन म्हणजे दुनियादारी-तू हि रे-क्लासमेट्स-गुरु चे संगीत दिग्दर्शक. त्यांनी त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख आता निर्माण केली असून, भविष्यात अजय-अतुल नंतर मराठीत संगीत दिग्दर्शक म्हणून पंकज पडघन यांचे नाव आदर मिळवेल हे नक्की.  

मराठीत सगळंच उत्तम असावे लागते आणि थोडीशीही काडी इकडची तिकडे झाली तर मराठीत जमत नाही. एका पूर्वाश्रमीच्या चित्रपट वितरकाकडून संथ पटकथा हि चूक नव्हे गुन्हा घडलेला आहे या चित्रपटात म्हणून हा चित्रपट फक्त उत्कृष्ट संगीताच्या शिदोरीवर तरून जाईल काय?? याचे उत्तर काळ देइलच पण मी संगीत आवडले म्हणू पाव (१/४)* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर