रविवार, २७ जुलै, २०१४

किक



किक-हिंदी 

चांगल्या आघाडीच्या कलाकारांना घेऊन बनलेल्या हिंदी सिनेमाचा मागच्या काही दिवसात दुष्काळ पडलेला होता, सगळे दुसर्या 
फळीच्या कलाकारांचे सिनेमे येत होते, या गोष्टीचा फायदा घेऊन तिकीटवारीवर आपला अप्रत्यक्ष फायदा होईल हे समजून-उमजून 
सलमान खान यांचा नवीन आलेला एक चित्रपट म्हणजे किक.
मुळात किक म्हणजे काय? कारण आपण जेंव्हा कुणाला पंच करतो तेंव्हा जो आघात (फिजिकल) होतो त्याला किक म्हटल्या 
जाते पण हि किक एका सिनेमाचे टायटल होणे शक्य नाही. तर किक म्हणजे एक आंतरिक स्फूर्ती. आणि याचा जवळचा संबंध
मद्यप्राशन केल्यानंतर एक "किक बसते" असे म्हटल्या जाते त्या किकशी असावा.
कहाणी:
देवीलालसिंग उर्फ डेव्हिल या व्यक्तीची जाकलीन फर्नांडीस व रणदीप हुडा यांच्या सोबतीने भारतातून पोलंडथ्रू फिरलेली कहाणी म्हणजे किक.
अभिनय:
सगळ्यात आधी सलमान खानचे खरोखर कौतुक. त्याने या वयातही खूप नवीन गोष्टींचा प्रयोग या सिनेमात करून बघितला आहे.
अभिनयातही आणि गायनातही. हिमेश रेशमिया व यो यो हनी सिंग नेहि एकदम उत्कृष्ट वगेरे नसले तरी चांगले संगीत दिलेले आहे.पण "मित ब्रदर्स" या संगीतकार तिकडीचे खुद्द सलमानने गायलेले "hang over " या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल.
सलमान खानने गायलेले हे गाणे खरोखर उत्कृष्ट category त येते.
दिग्दर्शन:
साजिद नाडियादवाला हे एक निर्माता म्हणून आघाडीच नाव. त्यांनी किक द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. पण आधीच
गाठीशी असलेल्या अनुभवाचा स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कसा फायदा होतो याच उदाहरण म्हणजे या सिनेमाचा पटकथेसाठी
त्यांनी kelela चेतन भगतचा उपयोग.
सलमान खान आणि त्याने सर्व आघाड्यांवर स्वत:च्या वयाचा विचार न करता "जय हो" या तद्दन फालतू अपयशानंतर
kelelya प्रयत्ना साठी मी किक ला २.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २५ मे, २०१४

हिरोपंती



हिरोपंती 

Jacki श्रॉफ पुत्र टायगर श्रॉफ व नवीन नायिका कृती सेनन यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण म्हणजे हिरोपंती 

हिरोपंती अर्थात साध्या शब्दात हिरोगिरी म्हणजेच कोणत्याही कथेत एका नायकाला नायक म्हणून कराव्या लागणाऱ्या उठाठेवी.

कहाणी:
मित्रांचा एक एकमेकांना मदत करणारा ग्रुप आणि त्याचा नायक बबलू (टायगर श्रॉफ). आता या नायकाच्याच भोवती कहाणी फिरते.पोरगी पळवणे आणि ज्या मित्राने मुलगी पळवली त्या मित्राला पूर्ण ग्रुप ने मदत करणे आणि साईड-बाय-साईड त्याचभोवती नायक-नायीकेचीही कहाणी गुंफणे हे तत्व लेखक संजीव गुप्ताने पाळलेलं आहे.
अभिनय:
टायगर श्रॉफच्या रूपाने सलमान खान/ह्रितिक रोशन या तगड्या शरीरयष्टीवाल्या नायकांना मिळालेला एक शानदार प्रतिस्पर्धी म्हणजे टायगर श्रॉफ. आधी मित्रांना मदत करणे व नंतर स्वत:ची कहाणी निभावणे या दोन्ही चक्कर मध्ये त्याची अभिनय क्षमता आणि शरीरयष्टी अन फिजिकल stunts करण्याची क्षमता लोकांना कळावी हे दिग्दर्शक सब्बीर खान चे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक सब्बीर खान हे निर्माता साजिद नदीयादवालाच्याच आधीच्या कम्बख्त इश्कचे दिग्दर्शक. याही वेळेस एक नवीन नायकाचे पदार्पण करवताना त्याच्या अभिनय क्षमतेवर अन शारीरिक compatibility वरून लोकांचे लक्ष्य विचलित होऊ नये हे त्यांचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते. अभिनय क्षमता दर्शवण्यासाठी त्यांनी अनोखे प्रयत्न केलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रयत्न म्हणजे मध्यंतर होईपर्यंत नायक नायिकेचा एकमेकांशी डायरेक्ट संपर्कच होऊ न देता फक्त अंदाजे-अंदाजे केलेली कथेची adjustment . पण टायगर श्रॉफ पुरेपूर उतरतो दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर.
संगीत:
साजिद-वाजीद जोडीच प्रसंगोचित संगीत सगळ्या गाण्यात आहे पण प्रेक्षकांवर छाप पडते Manj Musik यांच्या "व्हिस्तल बजा"
["Whistle Baja"] या गाण्यातील बासरीच्या सुरांचा. खरोखर अप्रतिम सुरवात बासरीची या गाण्यात वापरलेली आहे आणि या सुरावटीचा पार्श्वसंगीतातही चपखलपणे उपयोग केल्या गेलेला आहे.
रेटिंग:
टायगर श्रॉफच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नृत्यात वाकबगार व फिजिकली extravagant नायक मिळाल्याच
दाखवणाऱ्या या चित्रपटाला १.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शुक्रवार, २ मे, २०१४

The amazing spider man -2



The amazing spider man -2 

मागे तो झपाटलेला-२ आला होता मराठीतला तेंव्हा त्याच्या 3D इफेक्ट्सचे कौतुक करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे मराठी जनतेत चढाओढ लागली होती पण 3D इफेक्ट्स म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्की बघावा. 
न्यूयॉर्क अन तिथला मुख्यत्वे टाईम्स स्क्वेअर इतक्या वेळा हॉलीवूड वाल्यांनी मोडीत काढलेला आहे कि आपल्या रामोजी फिल्म सिटी सारखा तिकडे एखादा स्टुडियोच असावा तोडमोड करण्यासाठी न्यूयॉर्क पुरवणारा. अतिमानवीय खलनायक आणि त्याला मानव जातीच्या भल्यासाठी लढणारा अतिमानवीय नायक हि हॉलीवूड वाल्यांची लाडकी कल्पना. आणि त्याच परंपरेत नेहमीप्रमाणे आणखी एक कडी म्हणजे स्पायडर Man . अर्थात मागच्या आणि या स्पायडर Man मध्ये बराच बदल वाटतो. खात्री नाही पण पीटर
पार्कर हि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा नट बदलल्यासारखा वाटला. आणि त्याचा मित्र harry osborn तर नक्कीच बदलला.
मागचा भाग ज्यांनी बघितला असेल ते हे नक्कीच सांगू शकतील. आपण इंग्रजी चित्रपट जास्त concentration ने बघत नाही त्याचा परिणाम असावा हा बहुतेक.
कहाणी:
स्पायडर Man हा अतिमानवीय शक्तींची देणगी मिळालेला एक व्यक्ती. जनतेच्या भल्यासाठी वगेरे लढणारा. आणि त्याच जनतेवर झालेला अतिमानवीय सैतानी शक्तींकडून हल्ला आणि त्याने लढा देऊन मिळवलेला विजय.
स्पेशल इफेक्ट्स:
दिग्दर्शन वगेरे गोष्टींवर बोलण्याची एक रसिक म्हणून माझी प्राज्ञा नाही पण मला जाणवलेले अति उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा
उल्लेख मात्र मी नक्की करीन. स्पेशल इफेक्ट्स बद्दल जास्त टेक्निकल नॉलेज नसतानाही जाणवणारे स्पेशल इफेक्ट्स हा कदाचित उच्च क्वालिटीच्या 3D तंत्रामुळेहि असतील बहुतेक पण उत्कृष्ट होते हे नक्की.
रेटिंग: जगभर चालणार्या/गाजणाऱ्या या चित्रपटाला मी बापडा काय रेटिंग देणार पण मी याला पूर्ण पाचपैकी 5* देण्याची माझी हौस पूर्ण करीन.
-समीर

रविवार, २७ एप्रिल, २०१४

सम्राट & कं



सम्राट & कं

जर तुम्ही राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट बघायला जाता तेंव्हा तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात १] कौटुंबिक नितीमुल्ये हा चित्रपटाचा आत्मा असतो आणि त्याच्या भोवताल कथा गुंफलेली असते २] आलोक नाथ आणि मोहनीश बेहल हे त्यात असतात ३]त्याचे संगीत हा त्याचा निर्विवादरित्या आकर्षक भाग असतो पण सम्राट & कं. आश्चर्यकारकरित्या तिन्ही गोष्टीना अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स आणि त्याचा साथीदार डॉक्टर वॉटसन या दोन व्यक्तिरेखांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हिंदीत केलेले रूपांतरण म्हणजे सम्राट & कं.
वास्तविक बघता इथेही आलोक नाथ साठी आणि मोहनीश बेहल साठी स्कोप होता (गिरीश कर्नाड आणि गोपाल दत्तच्या जागी) पण
निर्मात्या कविता बरजात्या ज्या राजश्री प्रोडक्शनचे छोट्या पडद्यावरील प्रोजेक्ट्स सांभाळतात मुख्यत्वे त्यांना हे दोघे कास्टिंग साठी योग्य वाटले नाहीत बहुतेक. सुरवातीलाच मात्र त्यांनी निर्मात्या म्हणून सर ऑर्थर कॅनोन डायल यांचे आभार मानलेले आहेत.
कहाणी:
मिस्टरी स्टोरीज म्हणजेच रहस्य कथा या संकल्पनेला सावरणारे एक कथानक म्हणजे सम्राट & कं. त्यातही शेरलॉक होम्स आणि त्याचा मित्र डॉक्टर वाटसन हे दोघ पडद्यावर चितारणे हे लक्ष्य त्यामुळे सिनेमात दोन्ही व्यक्तिरेखा हिंदी पद्धतीने. आणि त्यातही हिंदी प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युजन न होता सगळे नीट पचनी पडावे हा लेखक/दिग्दर्शक कौशिक घातक यांचा प्रयत्न. या प्रयत्नात
मंदावलेली पटकथेची गती हि गोष्ट या चित्रपटाच्या कमर्शियल performance वर निश्चितपणे असर करेल हे नक्की.
अभिनय:
एस टी डी (सम्राट तिलक धारी) हि नायकाची मुख्य व्यक्तिरेखा राजीव खंडेलवालने निभावलेली आहे. पण कुठेही तो कमी पडत नाही. शेरलॉक होम्सला हिंदीत साकारणे म्हणजे त्याची analysis पॉवर/observation पॉवर आणि conclusion पॉवर यांचा योग्य मेळ लेखकाला अपेक्षित पद्धतीने साकारणे. आणि या कसोटीवर राजीव खंडेलवाल पुरेपूर उतरतो. त्याची observe करून निष्कर्षावर येण्याची पद्धत प्रेक्षकांना पटते.
दिग्दर्शन:
कौशिक घातक यांचा वापर निर्मात्याने दिग्दर्शक म्हणून केलेला आहे. कौशिक घातक हे छोट्या पडद्यावरील एक नाव. राजश्रीच्याच या आधीच्या एक "एक विवाह ऐसा भी" चे दिग्दर्शक. तेच इथे लेखक आणि पटकथेतही सहलेखक. थोडक्यात ऑल इन वन package . पण सगळीकडे अगदी पुरेपूर उतरतात ते प्रेक्षकांच्या अपेक्षेवर. अर्थात राजीवनेही अभिनयाने त्यांना साथ तोडीस-तोड दिलेली आहे. पण त्यांना त्यांचे श्रेय हे मिळायलाच हवे. कारण एका अतिशय दुर्लभ विषयावर हिंदीत एक चित्रपट काढून तो तिकीट बारीवर चालणार नाही याचा अंदाज असूनही प्रयत्नात कसूर न करणे हे खरोखर कौतुकास्पद. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे हॉलीवूड ची बरोबरी करताना वापरलेली पटकथा आणि प्रकाशयोजना. हाच चित्रपट जर आणखी कमी लांबीचा बनवून त्याची स्पीड थोडी वाढवली असती तर फरक पडला असता असे प्रेक्षकांना जाणवून जाते बघितल्यावर.
संगीत:
मागील वर्षी गाजलेल्या आशिकी-२ मधील संगीतकार जोडी अंकित तिवारी आणि मिथुन यांना इथे निर्मात्याने संधी दिलेली आहे.
आता एका रहस्य कथेत संगीताला मुळातच काही स्कोप नसतो पण जितका असतो तितका तितका दोघांनीही पुरेपूर निभावलेला आहे.रहस्य कथेत पार्श्वसंगीत उत्तम हवे आणि त्या कसोटीवर दोघंही फिट्ट बसतात.
का बघावा-बघू नये:
एका वेगळ्या विषयावरील एक उत्तम कलाकृती म्हणून बघण्यास काहीही हरकत नसलेला एक चित्रपट. जर तुम्हाला टिपिकल बॉलीवूड सिनेमे आवडत असतील म्हणजे प्रेम/संगीत इत्यादी तर या चित्रपटाची पटकथा फारच संथ वाटण्याची शक्यता आहे.
रेटिंग: कौशिक घातक आणि राजीव खंडेलवाल या दोघांच्याही प्रयत्नासाठी मी २ * देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २० एप्रिल, २०१४

2 स्टेट्स



2 स्टेट्स 

चेतन भगत आणि त्यांच्या गाजलेल्या "टू स्टेट्स" या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. लेखकाने खरोखर कादंबरी 
अतिशय उत्कृष्ट रित्या चित्रित केलेली आहे त्याची कहाणी (सुरवातीलाच कादंबरीत हि त्याची कहाणी आहे हे त्याने घोषित केलेले आहे).चित्रपटातही लेखक तोच असल्यामुळे आधी हे क्लियर करण्याच सौजन्य निर्माते धर्मा प्रोडक्षंस(करण जोहर) आणि नाडीयाडवाला फिल्म्स (साजिद नाडीयाडवाला) या दोघांनीही दाखवलेले आहे.
कहाणी:
"टू स्टेट्स" हि कादंबरी न वाचलेली इंग्रजी येणारी तरुणाई विरळ इतकी हि कादंबरी गाजली होती. (अभ्यासुनी २००८ च्या आसपासचा काळ आठवून बघावा). त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट आलाच समजा तर तो तिकीट खिडकीवर चालणारच या अंदाजावर मोहर उमटवणारा हा एक चित्रपट. क्रिश मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामिनाथन (आलिया भट) या दोघांची कहाणी म्हणजे टू स्टेट्स. पंजाबी मुलगा व तमिळ मुलगी म्हणजे दोघांच्या संस्कृतीत उत्तर-दक्षिण चे अंतर. हे संस्कृतीतले अंतर टिपण्याचे व त्याला शब्दात उतरवताना लेखकाचे कसब वादातीत होते. आणि म्हणूनच हि कादंबरी अफाट लोकप्रिय झाली होती/आहे. अहमदाबाद चा आय आय एम मध्ये शिकणारे दोघंही आणि परिस्थितीने एकमेकांच्या संपर्कात येउन प्रेमात पडलेले दोन व्यक्ती. आता हिंदी चित्रपट आणि प्रेमात पडलेले दोन जीव म्हणजे गाण्यांचा/संगीताचा भरपूर वापर (बागेत/कोलेज मध्ये/होस्टेल मध्ये इ. इ.) हे अपेक्षित होते.पण दिग्दर्शक अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने कुठेही "अति" होऊ दिलेले नाही.
अभिनय:
टू स्टेट्स मध्ये कहाणी उत्तम होतीच पण पात्रनिवड हा एक इश्यू होण्याचा चान्स होता.पण सांगण्यास आनंद कि क्रिश आणि अनन्या हे दोघेही परफेक्टलि सूट होतात आणि प्रेक्षकांची (कादंबरी वाचलेल्या) अपेक्षा पूर्ण करतात.तमिळ आणि पंजाबी परिवार जर बघितलेले असले तर दोन्ही परिवार एकदम उत्तमरीत्या शोभतात. आणि हा निर्मात्या/दिग्दर्शकाचा/लेखकाचा एक विजय असे म्हणूया कारण या चित्रपटाला पब्लिसिटीची पात्रांद्वारे फारशी गरज नव्हतीच. कादंबरीमुळे आधीच पुरेसा लोकप्रिय होता २ स्टेट्स.
दिग्दर्शन:
अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने दोन प्रांत involve असलेली हि गुंतागुंतीची कहाणी एकदम व्यवस्थित हाताळली. पंजाब आणि तामिळनाडू हे दोन प्रांत involve असल्यामुळे टाचणी पडून धुरळा उडण्याचा खूप चान्स होता पण त्याने व्यवस्थित हाताळले.
का बघावा: चेतन भगत हा लेखक एक उत्तम लेखक आहे. "कई पो चे" या त्याच्या एका कादंबरीवर आधारित (वन नाईट एट कॉल सेंटर) एक चीतपट आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे आणि cinematic लिबर्टी या संकल्पनेचा वस्तविकतेशी फारकत घेताना कितपत उपयोग करावा याची जाण असलेला एक लेखक असल्यामुळे नक्कीच बघावा असे वाटते याच्र स्पष्ट उदाहरण म्हणजे त्याचा कादंबरीत एक बॉस दाखवला आहे जो चेन्नई मध्ये त्याची खूप मदत करतो पण हे पात्र चित्रपटात नाही.
एका उत्तम कादंबरीवर आधारलेल्या चित्रपटाला मी 4* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, ८ मार्च, २०१४

टोटल सियापा



टोटल सियापा 

शानदार अभिनेता,गायक,संगीतकार व उत्कृष्ट चित्रकार (मुळचा पाकिस्तानी व्यक्ती/नागरिक) अली जफर यांचा नवीन चित्रपट "टोटल सियापा". मुळात "सियापा" म्हणजे काय कारण चित्रपटाच्या टायटल मध्येच तो शब्द आहे व इतका जनतेला परिचित नाही 
तर मला समजल्याप्रमाणे हा मुळचा पंजाबी भाषेतील शब्द असून आपल्या मराठीत "घोळ घालणे" असा काहीतरी सिमिलर त्याचा अर्थ असावा.
कहाणी:
अमन (अली जफर) व आशा (यामी गौतम) या दोघांची कहाणी म्हणजे टोटल सियापा. आधीच केलेल्या पुर्वप्रसिद्धीप्रमाणे
पाकिस्तानी मुलगा व भारतीय मुलगी,त्यामुळे अशी एकदम प्रत्यक्षात येण्यास कठीण अशी एक "लव्ह स्टोरी" असावी असा ग्रह असावा प्रेक्षकांचा पण हा सगळा "सियापा" म्हणजे घोळ हा फक्त एका रात्रीतला असून अमन हा आशाच्या घरच्या मंडळीना
पहिल्यांदा भेटण्यास जातो आणि पहिल्या भेटीत एकमेकांना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात दोन्ही बाजूंकडून घातले गेलेले घोळ म्हणजे टोटल सियापा.
अभिनय:
सगळ्यात आधी अलि जफर चे खरोखर कौतुक कारण पाकिस्तानी-हिंदुस्तानी प्रेमकथा,त्यातही मुलगी भारतीय म्हणजे एक स्फोटक विषय होता.जर एखादी टाचणी इकडे-तिकडे पडली असती तर पूर्ण स्फोट होऊन सगळाच सिनेमा जळाला असता.
पण अली जफरने हे सगळच नीट matuarly handle करून अस होऊ दिलेले नाही. उलट शेवटी climax च्या दरम्यान नायक-नायिकेचं एक भांडण होते,त्या दरम्यान विषय हिंदुस्तान-पाकिस्तान असा भरकटण्याचा पूर्ण चान्स होता पण लेखक नीरज पांडे व दिग्दर्शक इ.निवास यांच्या सहाय्याने अली जफरने अस सगळाच तोडगा काढलेला आहे.यामी गौतम हिचाही उल्लेख करावाच
लागेल कारण विकी डोनर सोडून आजवर कोणतीही उल्लेखनीय अशी भूमिका तिच्या वाटयाला आलेली नाही. आणि हि
भूमिका वेगळी होती,शरीर प्रदर्शन किवा नृत्य असे कोणतेही स्किल्स न दाखवता फक्त वागण्या-बोलण्याने अर्थात अभिनयाने
तिला प्रेम हि कन्सेप्ट एक्स्प्लेन करायची होती,त्यातही ti भारतीय असल्यामुळे "धडपणे". पण तिने सगळ भुमिकेबरहुकूम
कुठेही "अती" न करता व्यवस्थित निभावलं.
दिग्दर्शन:
इ निवास,हिंदीत स्ट्रगल करणारा एक दक्षिण भारतीय दिग्दर्शक, माय नेम इज एन्थोनी गोन्जाल्वीस या एका "हट के" पण तिकीट बारीवर अपयशी चित्रपटाचा दिग्दर्शक. या हि वेळेस दिग्दर्शकाने एक वेगळाच विषय पुन्हा निवडला व नीटपणे निभावला. आणि नीटपणे हे विशेष उल्लेखनीय कारण लेखक नीरज पांडेने कितीही प्रयत्न केला असता व दिग्दर्शकाला नीट handle करणे जमल नसत तरी पक्की होतीच "गडगड". विशेष करून अर्जुन पंडित याची आशाच्या भावाची एक भूमिका हाताळण जमल नसत तरी घोर होता. पण जमल. फक्त चित्रपटाची गती खूप रेंगाळल्या सारखी वाटते. पटापट पुढे सरकत नाही आणि तो सगळा घोळ फक्त एका रात्रीचाच असल्यामुळे अस होते हे पेक्षकांना जाणवते पण तोपर्यंत खूप उशीर होतो.त्यामुळे...........
संगीत:
संगीत दिग्दर्शक अली जफर हाच.मुख्य अभिनेता हाच गीतकार. व संगीत दिग्दर्शक. पण अगदीच उल्लेखनीय नसली तरी सगळीच कामगिरी तोडीस-तोड व कौतुकास्पद.अली जफर याचे पूर्ण चित्रपटाला असलेले contribution लक्षात घेता एका स्फोटक विषयावर बेतलेल्या या चित्रपटाल मी अडीच २ (१/२) * देईन.बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

सौ.शशी देवधर (मराठी)



सौ.शशी देवधर (मराठी)

जेंव्हा कोणताही मराठी चित्रपट बघायला तुमचे पाय चित्रपट गृहाकडे वळतात तेंव्हा एक गोष्ट कंसीडर करायलाच हवी कि तो चित्रपट "प्रेम" या संकल्पनेवर बेतलेला असतो आणि त्याच संगीत हा त्याचा आत्मा असतो पण सौ शशी देवधर
आश्चर्यकारकरित्या त्याला अपवाद ठरतो. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणत्याही स्वरुपात हा चित्रपट प्रेम संकल्पनेच्या संपर्कात येत नाही. आणि "आर्ट फिल्म" हि संकल्पना वाटू शकते इतके ट्विस्ट आणि टर्न कहाणीत आहेत आणि तरीही प्रेमाशी संपर्क आल्याविना.या मुव्हीला माजी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने निर्मिती करण्याची हिम्मत दाखवली हे विशेष उल्लेखनीय.
कहाणी:
मराठी सिनेमात प्रेम या संकल्पनेवर अवलंबून नसलेली एका स्त्रीची कहाणी जी आपल्या आयुष्याचे उसवलेले ठिगळ जोडायचे प्रयत्न करते आहे,एका सायकियाट्रीस्ट,एका पोलिस इन्स्पेक्टर आणि एका शिक्षकासोबत. मराठी सिनेमा "स्प्लीट personality " या अवघड विषयावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतो का? उत्तर हो आणि सौ शशी देवधर हे त्याच उदाहरण. डॉ अजिंक्य वर्तक(अजिंक्य देव) यांच्या कार सोबत सौ शुभदा देवधर यांच्या अपघाताने कहाणीची सुरवात होते. आणि अनेक वळणे घेऊन सौ नीलिमा वर्तक यांच्या कहाणीने संपते. सायको थ्रिलर हा प्रकार मराठीत जवळपास नाहीच पण हा चित्रपट सुरवात करतो आहे अशी अपेक्षा एक रसिक म्हणून आपण बाळगूया. .
अभिनय:
सगळ्यात आधी सई ताम्हणकर हिचे खरोखर कौतुक. सौ शुभदा देवधर आणि सौ नीलिमा ठाकूर अश्या दोन वेगवेगळ्या साच्यातील भूमिका तिने समर्थपणे पेललेल्या आहेत.दुनियादारी मधली शिरीन किंवा इतर कोणत्याही प्रेम या संकल्पनेवरच्या भूमिकेपासून पूर्णपणे वेगळी एक सायकिक भूमिका समर्थपणे सईने निभावलेली आहे.अजिंक्य देव याचेही बर्याच काळानंतर डॉ अजिंक्य वर्तक या सायकीयाट्रीस्टच्या एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते. आणि त्यानेही अगदी विशेष उल्लेखनीय नसली तरी समर्थपणे भूमिका पेललेली आहे. वास्तविक बघता सईची भूमिका पूर्णच फुटेज खाऊन गेली असती पण अजिंक्य देवने तसे होऊ दिलेले नाही. तुषार दळवीने देखील व्यवस्थित हाताळलेली आहे त्याची भूमिका.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक अमोल शेटगे यांचे विशेष कौतुक कारण मराठी सिनेमा अक्षरश: एका वेगळ्या विषयावर बेतलेला,इतकी गुंतागुंतीची कथा असलेला आणि कोणताही अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय चेहरा नसूनही त्यांनी समर्थपणे विषय पेललेला आहे.वास्तविक बघता स्वत: दिग्दर्शक पटकथा लेखनात सहलेखक त्यामुळे त्याने बरेचसे प्रसंग आधीच manage केले असतील या शंकेस वाव आहे.पण तरीही त्यांनी मराठीत एक वेगळा विषय आणून तो पेलून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करावेच लागेल.एक दिग्दर्शक हा एका सिनेमाच्या नौकेचा मुख्य captain असतो.सगळ्या चांगल्या वाईट बाबींना जबाबदार.आता सिनेमा मराठी तो हि इतका वेगळ्या धाटणीचा म्हणजे तिकीटबारीवर जास्त चालण्याची अपेक्षाच नाही तरीही प्रयत्नात कसूर न ठेवणे यासाठी विशेष दाद हि द्यावीच लागेल. वास्तविक बघता असे बरेच प्रसंग होते ज्यात दिग्दर्शक स्वत: कन्फ्युज झाला असता तर कपाळमोक्ष नक्की होता सिनेमाचा.पण अमोल शेटगे अक्षरश: पुरून उरलेत.
संगीत: मराठी सिनेमात संगीत हे लागतेच कारण गीत हे मुळात कविता वाटण्याइतक्या चपखलपणे प्रेक्षकांना "आत पोचतात". tubby - parik अशी जोडी यात निर्मात्याने वापरलेली आहे आणि ते हि याला पुरून उरतात.फक्त दोन गाणे पण ते कमी पडत नाहीत.चपखलपणे सूट होतात.गीतकार आशिष कुलकर्णी यांचेही गीतांसाठी विशेष कौतुक पण सगळ्यात शेवटी अजिंक्य देवच्या आवाजात एक कविता वाचन आहे त्यासाठी विशेष कौतुक कारण ती संगीत नसलेली कविता खरोखर उत्कृष्ट categoryत येते.
का बघावा:
मराठीत वेगळे सिनेमे बनतच नाहीत,वेगळ्या विषयाला मराठी फिल्ममेकर्स हातच घालत नाहीत,अशी चर्चा आपण बर्याचदा बघतो. या चर्चेला हा सिनेमा एक उत्तर देऊ शकतो. स्प्लीट personality या वेगळ्या विषयावरचा एक मराठी सिनेमा म्हणून हा सिनेमा नक्कीच बघावा असा आहे.
रेटिंग:पूर्ण प्रयत्नासाठी आणि सईच्या अभिनयासाठी मी या सिनेमाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर