शनिवार, ८ मार्च, २०१४

टोटल सियापा



टोटल सियापा 

शानदार अभिनेता,गायक,संगीतकार व उत्कृष्ट चित्रकार (मुळचा पाकिस्तानी व्यक्ती/नागरिक) अली जफर यांचा नवीन चित्रपट "टोटल सियापा". मुळात "सियापा" म्हणजे काय कारण चित्रपटाच्या टायटल मध्येच तो शब्द आहे व इतका जनतेला परिचित नाही 
तर मला समजल्याप्रमाणे हा मुळचा पंजाबी भाषेतील शब्द असून आपल्या मराठीत "घोळ घालणे" असा काहीतरी सिमिलर त्याचा अर्थ असावा.
कहाणी:
अमन (अली जफर) व आशा (यामी गौतम) या दोघांची कहाणी म्हणजे टोटल सियापा. आधीच केलेल्या पुर्वप्रसिद्धीप्रमाणे
पाकिस्तानी मुलगा व भारतीय मुलगी,त्यामुळे अशी एकदम प्रत्यक्षात येण्यास कठीण अशी एक "लव्ह स्टोरी" असावी असा ग्रह असावा प्रेक्षकांचा पण हा सगळा "सियापा" म्हणजे घोळ हा फक्त एका रात्रीतला असून अमन हा आशाच्या घरच्या मंडळीना
पहिल्यांदा भेटण्यास जातो आणि पहिल्या भेटीत एकमेकांना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात दोन्ही बाजूंकडून घातले गेलेले घोळ म्हणजे टोटल सियापा.
अभिनय:
सगळ्यात आधी अलि जफर चे खरोखर कौतुक कारण पाकिस्तानी-हिंदुस्तानी प्रेमकथा,त्यातही मुलगी भारतीय म्हणजे एक स्फोटक विषय होता.जर एखादी टाचणी इकडे-तिकडे पडली असती तर पूर्ण स्फोट होऊन सगळाच सिनेमा जळाला असता.
पण अली जफरने हे सगळच नीट matuarly handle करून अस होऊ दिलेले नाही. उलट शेवटी climax च्या दरम्यान नायक-नायिकेचं एक भांडण होते,त्या दरम्यान विषय हिंदुस्तान-पाकिस्तान असा भरकटण्याचा पूर्ण चान्स होता पण लेखक नीरज पांडे व दिग्दर्शक इ.निवास यांच्या सहाय्याने अली जफरने अस सगळाच तोडगा काढलेला आहे.यामी गौतम हिचाही उल्लेख करावाच
लागेल कारण विकी डोनर सोडून आजवर कोणतीही उल्लेखनीय अशी भूमिका तिच्या वाटयाला आलेली नाही. आणि हि
भूमिका वेगळी होती,शरीर प्रदर्शन किवा नृत्य असे कोणतेही स्किल्स न दाखवता फक्त वागण्या-बोलण्याने अर्थात अभिनयाने
तिला प्रेम हि कन्सेप्ट एक्स्प्लेन करायची होती,त्यातही ti भारतीय असल्यामुळे "धडपणे". पण तिने सगळ भुमिकेबरहुकूम
कुठेही "अती" न करता व्यवस्थित निभावलं.
दिग्दर्शन:
इ निवास,हिंदीत स्ट्रगल करणारा एक दक्षिण भारतीय दिग्दर्शक, माय नेम इज एन्थोनी गोन्जाल्वीस या एका "हट के" पण तिकीट बारीवर अपयशी चित्रपटाचा दिग्दर्शक. या हि वेळेस दिग्दर्शकाने एक वेगळाच विषय पुन्हा निवडला व नीटपणे निभावला. आणि नीटपणे हे विशेष उल्लेखनीय कारण लेखक नीरज पांडेने कितीही प्रयत्न केला असता व दिग्दर्शकाला नीट handle करणे जमल नसत तरी पक्की होतीच "गडगड". विशेष करून अर्जुन पंडित याची आशाच्या भावाची एक भूमिका हाताळण जमल नसत तरी घोर होता. पण जमल. फक्त चित्रपटाची गती खूप रेंगाळल्या सारखी वाटते. पटापट पुढे सरकत नाही आणि तो सगळा घोळ फक्त एका रात्रीचाच असल्यामुळे अस होते हे पेक्षकांना जाणवते पण तोपर्यंत खूप उशीर होतो.त्यामुळे...........
संगीत:
संगीत दिग्दर्शक अली जफर हाच.मुख्य अभिनेता हाच गीतकार. व संगीत दिग्दर्शक. पण अगदीच उल्लेखनीय नसली तरी सगळीच कामगिरी तोडीस-तोड व कौतुकास्पद.अली जफर याचे पूर्ण चित्रपटाला असलेले contribution लक्षात घेता एका स्फोटक विषयावर बेतलेल्या या चित्रपटाल मी अडीच २ (१/२) * देईन.बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा