एयरलिफ़्ट
तेलाच्या भांडणात,
सद्दामच्या सुवर्णकाळात, इराकने कुवैतवर आक्रमण केले, त्या काळात कुवैतमध्ये अडकलेल्या
भारतीयांना सोडवण्यासाठी कदाचित मानवी इतिहासातील सगळ्यात मोठी सुटका मोहीम
(Evacuation) आखण्यात आली होती. जरा इकडे-तिकडे वाचन करण्याची सवय असेल तर या मोहिमेचे कौतुक बरेच ठिकाणी बघितले असेल. या कथेपासून प्रेरित
होऊन अक्षय कुमार त्या कथेवर बेस्ड सिनेमा घेऊन आला असून एक मनापासून केलेला चांगला
प्रयत्न असे याचे वर्णन करता येईल. या मोहिमेत जवळपास दिड लाख लोकांना सुरक्षित स्थळी
म्हणजे भारतात २०० विमानांच्या सहाय्याने आणण्यात आले होते असे मी वाचले होते, म्हणून
मला उत्सुकता होती कि तितकी adjustment शुटींग मध्ये दिग्दर्शकाने कशी केली असेल पण
चित्रपटात हजाराच्या आसपास व्यक्ती होते. कदाचित तितका practical बदल cinematic लिबर्टी
म्हणून दिग्दर्शकाने घेतला असावा.
कहाणी:
१९९० साली १५ बिलियन
डॉलरचे कर्ज इराकवर कुवैतचे होते. या कर्जाला चुकवणे तर दूरच पण वेगवेगळ्या कारणांना
उकरून काढून इराकने कुवैतवर आक्रमण केले होते. त्या काळात बरेचसे भारतीय पोटापाण्यासाठी
कुवैतमध्ये गेले होते, साहजिकच ते युद्धात फसले. त्या लोकांना सोडवून सुरक्षितपणे परत
आणण्यासाठी "ऑपरेशन सेफ होमकमिंग" नावाची जी मोहीम आखण्यात आली होती त्या
मोहिमेचे पडद्यावर रेखाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे एयरलिफ़्ट.
अभिनय:
अक्षय कुमार यात रणजीत
कट्याल या व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो सगळ्यांना व्यवस्थित सोडवून परत आणतो. हि
बहुधा काल्पनिक भूमिका असावी कारण मी तरी या व्यक्तीचे नाव कुठेही वाचले नाही. अक्षय
कुमार एक खरा प्रोफेशनल अभिनेता कारण तो या मोहिमेचे नेतृत्व करणारा व्यावसायिक म्हणून
शोभून गेला चित्रपटभर. एक उच्चपदस्थ दुसर्या देशात जाऊन प्रसंग आल्यावर भारतीय म्हणून
भारतीयांच्या मदतीला धावून गेलेला व्यक्ती हि विचित्र सिच्युएशन अक्षय कुमारने एका
अभिनेत्याच्या सराईतपणे हाताळली. नेतृत्व करत असताना त्याला येणारे अनेकानेक प्रॉब्लेम्स,
ते सोडवताना त्याची दमछाक इत्यादी व्यवस्थित साकारले अक्षयने. आधीच्या काळात मनोज कुमार
प्रसिद्ध होता कि जो फक्त देशभक्तीपर कहाणी असलेले चित्रपट आणून चालवून दाखवायचा. सध्याच्या
पिढीत मला वाटते अक्षय कुमार त्याच मार्गावर चालायला लागलेला आहे.
दिग्दर्शन:
राजा कृष्ण मेनन हे दिग्दर्शक आहेत एयरलिफ़्टचे, त्यांचा
हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात खूप मोठा विषय हाताळण्याची हिम्मत त्यांनी
दाखवलेली आहे आणि त्यात कुठेही ते कमी पडत नाहीत. दीड लाखांची व्यक्तीसंख्या शुटींगसाठी
सोयीचे म्हणून हजारावर खाली आणणे हि सगळ्यात मोठी adjustment त्यांनी केली. या चलाखीला
कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही कारण १९९० म्हणजे जवळपास २६-२७ वर्षे मागे जाऊन
उकरून काढण्याइतका उत्साह कोणीही दाखवणार नाही. पण त्या मोहिमेत श्री.बेदी नावाचे केंद्र
सरकारचे विदेश मंत्रालयातील एक आयएएस अधिकारी
होते. त्यांनी प्रचंड मेहनत/मदत/भारतातील नेतृत्व इत्यादी केले होते असे वाचल्याचे
मला पक्के आठवते. त्यांचा सिनेमात उल्लेख नाही. हे मला चुकीचे वाटले कारण सुरवातीला
तुम्ही रियल लाइफ़ बेस्ड अशी पाटी देता आणि अशी कन्नी मारता. पण कदाचित माझा जो सोर्स
होता तो faulty असेल किंवा यांचे महत्व कहाणीत तितकेसे नसेल.
संगीत:
सुरवातीचे एक आयटम
सॉंग सोडले तर चित्रपटात गाणेच नाही. पण ती कमी दोन्ही संगीत दिग्दर्शक अंकित तिवारी आणि अमाल
मलिक यांनी पार्श्वसंगीतात भरून काढलेली आहे कारण पार्श्वसंगीताचा मुबलक वापर चित्रपटभर
आहे.
कोणताही मालमसाला नसलेले
अन मुख्य म्हणजे संगीत विरहीत पूर्णपणे कहाणीवर अवलंबून असलेले चित्रपट खूप कमी असतात,एयरलिफ्ट
त्यापैकीच एक. मला चित्रपट आवडला म्हणून मी चित्रपटाला ३(तीन) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी
घ्यावा.
-समीर