मंगळवार, १५ मार्च, २०१६

New Zealand Vs India

New Zealand beat India by 47 runs
still I will appreciate Indian performance for-
1. Captain Dhoni's bold decision to finish Ashwin's quota of all 4 overs before 10th over
2.Captain did not loose his calmness after getting hit for a six to Ashwin on 1st ball of match
3. Jaspreet Bumrah's bowling skill specially his ability to bowl yorkers is exceptional compared to other Indian bowlers
4.In 2007 world cup India loose first match against New Zealand and then went on to win the world cup.
On this positive note, I support Team India.

रविवार, १३ मार्च, २०१६

फुन्त्रू (मराठी)


मराठी सिनेमा हा "प्रेम" हा विषय सोडून साय-फाय थ्रिलर अश्या मराठीला कदाचित पूर्णत: अनोळखी असणार्या प्रांतात शिरू शकतो काय?? उत्तर आहे होय!!!! तसली हिंमत करणारे फिल्ममेकर्स मराठीत आहे आणि तसा प्रयत्नही ते करण्याची हिंमत करू शकतात, या हिमतीला लोकाश्रय कितपत मिळेल हे काळ ठरवेलच पण प्रयत्न मनापासून केलेला आहे हे जाणवते हे मात्र नक्की. त्यातही उल्लेखनीय असे की     साय-फाय थ्रिलर हा प्रकार कदाचित मराठीत नाही आणि मराठीचं एकूणच आर्थिक गणित बघता ते शक्यही नाही पण हि हिंमत करून दिग्दर्शक सुजय एस. डहाके मराठीत कदाचित पहिल्यांदाच एक साय-फाय थ्रिलर घेऊन आलेत. शेवट करताना त्यातही तो अर्धवट ठेवून आणि फुन्त्रू-२ अशी पाटी देऊन सुजयजींनी सिक्वेल येणारच असे अप्रत्यक्षपणे दर्शकांना सुचित केलेले आहे.

मोहन आगाशे हे एक इंजीयारिंग कॉलेजचे प्राध्यापक-संशोधक-फाउंडर-संशोधक वगेरे. मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेजचे.  साय-फाय थ्रिलर अर्थात सायन्स वर बेतलेली रहस्यमय कथा जेंव्हा बनवल्या जाते तेंव्हा आपण जे साधर्म्य कथेसाठी जोडतोय ते खरोखर बघण्यासारखे नाही काय? एक मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेज मधले विद्यार्थी-प्राध्यापक इतक्या शिताफीने कम्प्युटर software प्रॉब्लेम्स इतक्या डीटेल्ससकट उलगडू शकतात??थोडावेळ विनोद बाजूला ठेवू पण केतकी माटेगावकर सारखी मुलगी देखील मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये admission घेत नाही, त्याची कारणे आपण बाजूला ठेवू पण असे घडते हे मात्र नक्की.     
      
मदन देवधर (वीरा) हा एक मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी आणि (अनया) केतकी माटेगावकर ही त्याची क्लासमेट. ती त्याला आवडते आणि तो प्रयत्न करतो पण त्याला जवळपास रिजेक्ट करते. मग तो एका प्रोजेक्टपर्यंत पोचतो आणि तिची एक प्रतिकृती तयार करतो. या सगळ्या गुंत्याला साकारताना कहाणी मैत्री-effective task execution इत्यादी इत्यादी बर्याच विषयांना स्पर्श करते.
संजय डहाके हे या आधी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या "शाळा"या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना भेटलेत. फुन्त्रू हे टायटल का तर इमेज क्रिएशन चा जो प्रोजेक्ट विराला सापडतो त्या प्रोजेक्टचे नाव असते फुन्त्रू. संजयजीच याचे कथा व पटकथा लेखक. कथा व्यवस्थित जुळवून आणलेली आहे त्यांनी काही क्षुल्लक डीटेल्स वगळले तर कुणीही कथेवर बोट दाखवू शकणार नाही उदा. इंजिनियरिंगचे विद्यार्थी सोडले तर. पण मुद्दा आहे पटकथा कारण ही देखील संजयजिंचीच. कथेला नीट जुळवण्यात कदाचित इतकी मेहनत घेतल्या गेली की पटकथेकडे दुर्लक्ष झालेले आहे हे नक्की. इतके स्पष्ट दुर्लक्ष की कथेचा अंदाज प्रेक्षकांना लागून जातो पण कथाच पुढे न सरकल्यामुळे प्रेक्षक कंटाळून जातात.
हृषीकेश-सौरभ-जसराज असे तीन संगीतकार या चित्रपटाला लाभलेत आणि सांगण्यास आनंद की अप्रतिम संगीत सगळ्या गाण्यांना त्यांनी दिलेले आहे.बाकी सगळे गाणे तर उत्तम आहेतच पण वैभव जोशी यांनी लिहिलेल्या "अलख निरंजन तू" हे गाणे विशेष उल्लेखनीय. आणखी एक संगीतात संगीत दिग्दर्शकांनी जे कमावलं ते साकेत कानेटकर यांनी पार्श्व-संगीतात गमावलं. असे बरेच प्रसंग होते ज्यात उत्तम पार्श्व-संगीत ही कहाणीची गरज होती कारण कहाणी ही एक साय-फाय थ्रिलर होती. पण........

संजय जाधव यांनी टाईमपास १ च्या वेळेस शेवट न करवता अर्धवट ठेवून सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या संजयजींनी सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केलेली आहे. सिक्वेल आल्यास हरकत नाही पण नवीन भागात संथ पटकथा आणि पार्श्व संगीत या बाबींकडे लक्ष देतील अशी अपेक्षा प्रेक्षक बाळगतात. मला चित्रपट ठीक वाटला म्हणून मी दोन (२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

मिस्टर एंड मिसेस सदाचारी (मराठी)





आशिष वाघ हे नवीन दिग्दर्शक मराठीत पदार्पण करीत असून मिस्टर एंड मिसेस सदाचारी हा सिनेमा घेऊन आलेले आहेत. टायटल वरून वाटत असल्याप्रमाणे सदैव चांगले आचरण करणारे जोडपे यासम काहीही प्रकार नसून मुख्य नायक "शिवा सदाचारी" आणि त्याची लग्नापर्यंतची हि कहाणी म्हणून नाव मिस्टर एंड मिसेस सदाचारी. वास्तविक बघता आशिष वाघ हे मराठी चित्रपट वितरण व्यवसायातील मोठे नाव पण यावेळेस स्वत:च दिग्दर्शक बनलेत. एका चित्रपट वितरकाला पटकथेच्या वेगाचा अंदाज नसावा हे दुर्दैवी!!! पण तसे घडलंय खर.

कहाणी:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) हा एक अभ्यासातल्या अपयशामुळे सतत वर्षानुवर्षे घरच्यांच्या आणि त्यातही मुख्यत्वे वडलांच्या रोषाला बळी पडलेला एक मुलगा. त्याला झालेले प्रेम. या प्रेमाची त्याने केलेली adjustment आणि सरतेशेवटी हुशार भावाला पछाडत घरच्या संकटात वडलाना केलेली मदत अशी एक खूपच कन्फ्युजिंग कहाणी यात बघायला मिळेल.

अभिनय:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) आणि प्रार्थना बेहेरे हे दोघे मुख्य भूमिकेत यात आहेत म्हणजेच मिस्टर आणि मिसेस. पण मोहन जोशी यांनीही शिवाच्या वडलांच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वैभव म्हणजे मराठीतला सुपरस्टार एकदम अभिनयात "बाप" माणूस असे समजत कि काय पण पटकथा आणि कथालेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी त्याला इतके अति-महत्व दिलेले आहे कि बस. प्रेक्षक त्रासण्याइतके अति महत्व. मान्य कि बाजीराव-मस्तानी मध्ये चिमाजी अप्पाची भूमिका वैभवने अप्रतिम निभावली पण म्हणून तो लंगड्या कथा-पटकथेला तारून नेईल या अपेक्षेला काय म्हणावे?  प्रार्थना बेहेरेने "अती" न करता तिच्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित निभावलेली आहे. तिचे सौंदर्य हीच तिची अभिनयापेक्षाही जमेची बाजू आहे हे जाणून तिने तिच्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. पण बाहेर निघताना लक्षात राहतात ते मोहन जोशीच. आधी आपल्या नावडत्या मुलाचा त्यांचा दुस्वास मग आयुष्याच्या उत्तरार्धात आवडत्या मुलाने वार्यावर सोडल्यावर नावडता मुलगा जेंव्हा सावरतो तेंव्हा ते जाणवल्यावर त्यांचे कबुल करणे हे प्रेक्षकांवर छाप सोडून जाते.

दिग्दर्शन:
आशिष वाघ हे चित्रपट वितरण व्यवसायातून चित्रपट दिग्दर्शनात उतरलेले आहेत. तरीही त्यांनी इतके विविध प्रयत्न एकसाथ करावे याचे अप्रूप. प्रेमकहाणी-मित्रमेळा-प्रेमासाठी नायकाची इतरांना मदत- शिवजयंती इत्यादी इत्यादी विविध कोनाने कहाणी तीनही तास त्यांनी फिरवलेली आहे. शेवटी शेवटी लव जिहाद कडेही कहाणी वाकेल अशी शंका "नीता" च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना येते पण आशिष वाघ तिथे दया करतात कदाचित प्रेक्षकांवर.  पण त्यांनी पहिलाच प्रयत्न पुरेपूर निभावण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिवेन्सेस वगेरे जबरदस्त जुळून आलेत पण.....

संगीत:
संगीत या चित्रपटाचा एकमेव stong point. पंकज पडघन यांनी अप्रतिम संगीत दिलेले आहे सगळ्या गाण्यांना. पंकज पडघन म्हणजे दुनियादारी-तू हि रे-क्लासमेट्स-गुरु चे संगीत दिग्दर्शक. त्यांनी त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख आता निर्माण केली असून, भविष्यात अजय-अतुल नंतर मराठीत संगीत दिग्दर्शक म्हणून पंकज पडघन यांचे नाव आदर मिळवेल हे नक्की.  

मराठीत सगळंच उत्तम असावे लागते आणि थोडीशीही काडी इकडची तिकडे झाली तर मराठीत जमत नाही. एका पूर्वाश्रमीच्या चित्रपट वितरकाकडून संथ पटकथा हि चूक नव्हे गुन्हा घडलेला आहे या चित्रपटात म्हणून हा चित्रपट फक्त उत्कृष्ट संगीताच्या शिदोरीवर तरून जाईल काय?? याचे उत्तर काळ देइलच पण मी संगीत आवडले म्हणू पाव (१/४)* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर     

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

घायल वन्स अगेन



सनी देओलचा राजकुमार संतोषीचा नव्वदीच्या दशकातला गाजलेला सिनेमा म्हणजे घायल. त्याचा पार्ट 2  म्हणजेच सिक्वेल घेऊन आणि त्याला म्हणजेच ज्येष्ठ पुत्र सनी देओललाच दिग्दर्शक बनवून घेऊन आलेत धर्मेंद्र. मागचा घायल हि त्यांचीच निर्मिती आणि सिक्वेल देखील त्यांचाच. मागच्या घायल मध्ये अमरीश पुरी ची व्यक्तिरेखा प्रचंssssड गाजली होती. एक नायक म्हणून सनी देओल प्रेक्षकांना जितका लक्षात राहिला तितकाच एक खलनायक म्हणून अमरीश पुरी. हा सिनेमा तशी जादू करू शकेल काय? याचे उत्तर काळच देईल पण सनी देओलने जर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण कमर्शियलि केले तर action सिक्वेन्सेस साठी रोहित शेट्टीला एक प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची प्रेक्षकांची खात्री पटते.
मागील घायल मधल्या नायिकेच्या म्हणजेच मीनाक्षी शेषाद्रीच्या एका वाक्यावरून सिक्वेल मध्ये पूर्ण कहाणी ओढलेली आहे. मागील घायलचा संदर्भ तितकाच एका वाक्यापुरता पण पूर्ण कहाणी उभी राहिली तीन तासांची एका वाक्यावर. मग नव्या दमाचे तरुणाईचे प्रतिनिधी वगेरे संमिलीत करून छानपैकी एक कहाणी यशस्वीपणे सनी देओलने उभी केली. झालेला अन्याय, अन्यायाविरुद्ध पेटलेली तरुणाई असा माल मसाला पेरून त्यात मुख्य भूमिकेत स्वत:च असल्यावर स्वत:च्या तारस्वरातील डायलॉग डिलीव्हरीलाही मस्तपैकी सनीने स्कोप ठेवलेला आहे. कहाणीत तरुणाईचा समावेश करून त्यांचे अन्यायाविरुद्ध पेटून उठणे नाटकी आहे कि काय अशी प्रेक्षकांना शंका येण्याइतपत नाट्यमयता आहे. हि शंका प्रेक्षकांना कितपत येईल/येईल कि नाही यावर सिनेमाचे भवितव्य ठरेल??
अभिनयासाठी सनी देओल म्हणजे मागच्याच घायल १ मधला अजय मेहरा आहे पण या वेळेस बळवंत राय मागच्या भागात अन खर्या आयुष्यातही अमरीशजीनचा मृत्यू झाल्यामुळे नाही. सनी देओल मागील भागात अन्यायाविरुद्ध पेटलेला एक वकील असतो, तारीख पे तारीख वगेरे त्याचे संवाद आजपर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या वेळेस थीम तीच असली तरी आता स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कथेच्या मागणीनुसार त्याने तरुण चेहर्यांचा कथेत समावेश केलेला आहे. पण वयाचा जो फरक पडायचा तो अजय मेहरावर पडतोच पडतो. कथेनुसार त्याचे वय वाढलेले आहेच पण स्वत:च दिग्दर्शक असल्यावर/मुळे त्याने जर अती-आत्मविश्वासाने आपल्या संवादांना म्हणजेच त्याच्या बाबतीत डायलॉग डीलीव्हरीला महत्व दिलेले आहे. त्याची संवाद फेक हि काही विशिष्ट प्रसंगात चालून जाते, घायल-गदर वगेरे काही केसमध्ये चालून गेली पण प्रत्येकच वेळेस ती चालून जाईल या आत्मविश्वासाला मुजरा!!!! अनिल शर्मासारखा एखादाच असतो जो शून्यातून विश्व उभे करू शकतो!!!

सनी देओल स्वत:च दिग्दर्शक आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे दिग्दर्शन शैलीवगेरे डीटेल्स आपण जाऊ देऊ आणि इमोशनल म्हणजेच भावनात्मक प्रसंग साकारण्यातला अननुभवहि दुर्लक्षित करू पण एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. आणि तो म्हणजे फायटिंग सिक्वेन्सेस अर्थात action सिवेन्सेस. action सिवेन्सेस मध्ये रोहित शेट्टीचा हातखंडा आहे पण त्याला टक्कर कोणी देईल तर दिग्दर्शक म्हणून भविष्यात तर सनी देओल. सनी देओलने जर टायगर श्रॉफ सारख्या फिजिकली फिट अभिनेत्याला घेऊन जर एखाद्या चांगल्या कथेची/संगीताची जोड दिली तर कदाचित एक चांगली कथा साकारू शकेल तो हे प्रेक्षकांना वाटून गेल्याशिवाय राहत नाही.   
संगीतासाठी या वेळेस दोन जोड्या वापरल्यात पण बाप्पिदासारखी मजा सिक्वेल मध्ये नाही हे नक्की.

घायल वन्स अगेन जर सनी देओल आवडत असेल तर आवडण्याचा खूप चान्स आहे आणि टाईमपास करायचा असेल तर कदाचित भ्रमनिरास होण्याचा धोका आहे. माझा झाला पण सनी देओलची दिग्दर्शन शैली मला आवडली खासकरून action सिक्वेन्सेस म्हणून मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

गुरु (मराठी)


गुरु (मराठी)

मराठीतले करिष्माई दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘दुनियादारी’ आणि ‘तू ही रेया मागील वर्षीच्या  सिनेमांच्या यशानंतर आता  ‘गुरू’ हा नवा सिनेमा घेऊन आलेले आहेत. मराठी सिनेमाचा एकूणच प्रेक्षकवर्ग बघता हा सगळा इत्यंभूत विचारशील प्रेक्षकवर्ग असतो त्यामुळे दक्षिण भारतीय पद्धतीच्या कथा पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे बघण्यासारखे राहील. दुनियादारी अन तू हि रे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून गेले. कदाचित त्यामुळे या चित्रपटाची पब्लिसिटी इतर मराठी सिनेमांपेक्षा भरपूर होत असल्याचे जाणवले. त्यात दिग्दर्शक संजय जाधव हेच स्वत: निर्माता जोडीपैकी एक निर्माता बनलेत या सिनेमासाठी त्यामुळेही कदाचित फरक पडला असावा. कारण काहीही असो पण पब्लिसिटी इतक्या प्रमाणावर आहे कि बस.

संजय जाधव यांनी दुनियादारी मध्ये तरुणाई अन तू हि रे मध्ये प्रेम व्यवस्थित हाताळल होत. इतर मराठी दिग्दर्शकांपेक्षा निश्चितच उत्तम रीतीने. गुरु मध्ये संजयजी स्वत:च लेखक जोडीपैकी एक (आशिष पाठारे सोबत) असल्यामुळे कि काय पण कहाणीत एकदम नवीन विषय निवडला आहे. पहिल्या पंधरा मिनिटात "गुन्हेगारी विश्वाकडे" वळणारी कथा असे इम्प्रेशन देणारी कहाणी नंतर उर्मिला कोठारेच्या कथेतल्या आगमनानंतर "प्रेमाकडे" वळली असे वाटते आणि मध्यंतरापर्यंत पोचेपर्यंत स्थलांतरितांच्या प्रश्नांना हात घालते. कितीही नाही म्हटल तरी इतक्या शिताफीने इतक transformation आणि ते हि मराठीत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या या विषयांना मांडणी करून प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत याची काळजी ही संजयजींनी घेतल्याचे बरेचदा जाणवते. या कहाणीचा शेवट कसा होतो हे निश्चितच बघण्यासारखे आहे कारण त्यातही मुरली शर्मा या हिंदीतल्या कसदार रंगमंच अभिनेत्याला खलनायक म्हणून मराठीत संजयजींनी गळाला लावून बाजी मारलेली आहे. मुरली शर्मा मराठी उच्चारात कोठेही कमी पडत नाही आणि खलनायक म्हणून छाप सोडून जातो.

संजयजिचा मराठी चित्रपट म्हणजे स्वनिल जोशी अन सई ताम्हणकरची जोडी अस आजवर समीकरण होत. त्यांनी एकाच वर्षात दोनदा तिकीटबारीवर हे समीकरण गाजवूनही दाखवल. पण गुरु मध्ये मात्र समीकरण बदलून दुनीयादारीतला दिग्या म्हणजेच सुपरस्टार अंकुश चौधरीला मुख्य अभिनेता म्हणून पुढे आणलेले आहे. अंकुश चौधरीचे कौतुक कारण त्याने दिग्दर्शकाच्या नवीन प्रयोगाला साथ देत मराठी चित्रपटात दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिक्वेन्सेस पेलून दाखवले. फायटिंग सिक्वेन्सेस बघून असे वाटले कि दक्षिण बारतीय पध्दतीप्रमाणे नायकप्रधान शेवट असेल पण तेथेच कदाचित संजयजी मधलं मराठीपण जागलं आणि मराठी पद्धतीप्रमाणे त्यांनी कथेचा शेवट करवला.  दुनियादारी मधल्या मीनूचे  म्हणजेच उर्मिला कानेटकरचे  ओवी या नावाने नायिका म्हणून  प्रेक्षकांना दर्शन घडते. तिने तिचा वाटा व्यवस्थित निभावला असून एका मुख्य अभिनेत्रीचे पात्र व्यवस्थित निभावलेले आहे.पण विशेष कौतुक अभिनयासाठी खलनायक मुरली शर्माचे कारण त्याने मराठीतला नसूनही मराठीत व्यवस्थित सगळ हाताळलेल आहे.   
  
संगीत हा मराठी प्रेक्षकांसाठी जिवाभावाचा विषय कारण मराठीत संगीत असते ते गाण्यांना म्हणजेच बेसिकली कवितांना आणि झुक्या रोजच दर्शन घडवतो कि मराठीत कवी-कवियित्री किती मुबलक आहेत याचे. पण सांगण्यास खरोखर आनद कि अमितराज-पंकज पडघन आणि प्रफुल्ल कार्लेकर असे तीन संगीत दिग्दर्शक असूनही संगीत उच्च पातळीचे आहे. दुनियादारी आणि तू हि रे मध्ये संगीत हे उच्च दर्जाचे होते. तीच संगीताची क्वालिटी संजयदाने गुरु मध्येही मेंटेन केली आहे स्वत: निर्माता बनल्यावर सुद्धा. "फिल्मी" आणि "mango डॉली" या दोन गाण्यांचा विशेष उल्लेख संगीतासाठी होइल.

फिल्म इंडस्ट्रीत  गुरु म्हटला कि  आधी आठवायचा मणिरत्नमचा आणि अभिषेक बच्चनच गुरु जो रहमानने सजवला होता. आपला मराठीतला गुरु अगदी तितका उच्च पातळीवर पोचला नसला तरी नेहमीसारखा विस्मृतीतही जाणार नाही. मला हा चित्रपट दिग्दर्शन-कहाणी आणि विशेष म्हणजे संगीत या साठी आवडला म्हणून मी चित्रपटाला ३.५ * देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर         

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

एयरलिफ़्ट



एयरलिफ़्ट

तेलाच्या भांडणात, सद्दामच्या सुवर्णकाळात, इराकने कुवैतवर आक्रमण केले, त्या काळात कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी कदाचित मानवी इतिहासातील सगळ्यात मोठी सुटका मोहीम (Evacuation) आखण्यात आली होती. जरा इकडे-तिकडे वाचन करण्याची सवय असेल तर या मोहिमेचे  कौतुक बरेच ठिकाणी बघितले असेल. या कथेपासून प्रेरित होऊन अक्षय कुमार त्या कथेवर बेस्ड सिनेमा घेऊन आला असून एक मनापासून केलेला चांगला प्रयत्न असे याचे वर्णन करता येईल. या मोहिमेत जवळपास दिड लाख लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे भारतात २०० विमानांच्या सहाय्याने आणण्यात आले होते असे मी वाचले होते, म्हणून मला उत्सुकता होती कि तितकी adjustment शुटींग मध्ये दिग्दर्शकाने कशी केली असेल पण चित्रपटात हजाराच्या आसपास व्यक्ती होते. कदाचित तितका practical बदल cinematic लिबर्टी म्हणून दिग्दर्शकाने घेतला असावा.

कहाणी:
१९९० साली १५ बिलियन डॉलरचे कर्ज इराकवर कुवैतचे होते. या कर्जाला चुकवणे तर दूरच पण वेगवेगळ्या कारणांना उकरून काढून इराकने कुवैतवर आक्रमण केले होते. त्या काळात बरेचसे भारतीय पोटापाण्यासाठी कुवैतमध्ये गेले होते, साहजिकच ते युद्धात फसले. त्या लोकांना सोडवून सुरक्षितपणे परत आणण्यासाठी "ऑपरेशन सेफ होमकमिंग" नावाची जी मोहीम आखण्यात आली होती त्या मोहिमेचे पडद्यावर रेखाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे एयरलिफ़्ट. 
         
अभिनय:
अक्षय कुमार यात रणजीत कट्याल या व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो सगळ्यांना व्यवस्थित सोडवून परत आणतो. हि बहुधा काल्पनिक भूमिका असावी कारण मी तरी या व्यक्तीचे नाव कुठेही वाचले नाही. अक्षय कुमार एक खरा प्रोफेशनल अभिनेता कारण तो या मोहिमेचे नेतृत्व करणारा व्यावसायिक म्हणून शोभून गेला चित्रपटभर. एक उच्चपदस्थ दुसर्या देशात जाऊन प्रसंग आल्यावर भारतीय म्हणून भारतीयांच्या मदतीला धावून गेलेला व्यक्ती हि विचित्र सिच्युएशन अक्षय कुमारने एका अभिनेत्याच्या सराईतपणे हाताळली. नेतृत्व करत असताना त्याला येणारे अनेकानेक प्रॉब्लेम्स, ते सोडवताना त्याची दमछाक इत्यादी व्यवस्थित साकारले अक्षयने. आधीच्या काळात मनोज कुमार प्रसिद्ध होता कि जो फक्त देशभक्तीपर कहाणी असलेले चित्रपट आणून चालवून दाखवायचा. सध्याच्या पिढीत मला वाटते अक्षय कुमार त्याच मार्गावर चालायला लागलेला आहे.

दिग्दर्शन:
 राजा कृष्ण मेनन हे दिग्दर्शक आहेत एयरलिफ़्टचे, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात खूप मोठा विषय हाताळण्याची हिम्मत त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यात कुठेही ते कमी पडत नाहीत. दीड लाखांची व्यक्तीसंख्या शुटींगसाठी सोयीचे म्हणून हजारावर खाली आणणे हि सगळ्यात मोठी adjustment त्यांनी केली. या चलाखीला कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही कारण १९९० म्हणजे जवळपास २६-२७ वर्षे मागे जाऊन उकरून काढण्याइतका उत्साह कोणीही दाखवणार नाही. पण त्या मोहिमेत श्री.बेदी नावाचे केंद्र सरकारचे विदेश मंत्रालयातील एक आयएएस  अधिकारी होते. त्यांनी प्रचंड मेहनत/मदत/भारतातील नेतृत्व इत्यादी केले होते असे वाचल्याचे मला पक्के आठवते. त्यांचा सिनेमात उल्लेख नाही. हे मला चुकीचे वाटले कारण सुरवातीला तुम्ही रियल लाइफ़ बेस्ड अशी पाटी देता आणि अशी कन्नी मारता. पण कदाचित माझा जो सोर्स होता तो faulty असेल किंवा यांचे महत्व कहाणीत तितकेसे नसेल. 

संगीत:
सुरवातीचे एक आयटम सॉंग सोडले तर चित्रपटात गाणेच नाही. पण ती कमी दोन्ही  संगीत दिग्दर्शक अंकित तिवारी आणि अमाल मलिक यांनी पार्श्वसंगीतात भरून काढलेली आहे कारण पार्श्वसंगीताचा मुबलक वापर चित्रपटभर आहे. 

कोणताही मालमसाला नसलेले अन मुख्य म्हणजे संगीत विरहीत पूर्णपणे कहाणीवर अवलंबून असलेले चित्रपट खूप कमी असतात,एयरलिफ्ट त्यापैकीच एक. मला चित्रपट आवडला म्हणून मी चित्रपटाला ३(तीन) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

कार्टी काळजात घुसली


कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक)

प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे.

कहाणी:
कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. वास्तविक बघता तेजश्री प्रधान हि नाटकात नायिका आहे असे म्हटल्यावर तिची आणि प्रशांतजींची जोडी कशी जमवली असेल याबाबत प्रेक्षकांना उत्कंठा वाटणे साहजिक आहे. पण लेखक वसंत सबनीस यांनी हि उत्कंठा पुरेपूर शमवली असून पहिल्या पंधरा मिनिटातच उत्तर मिळते प्रेक्षकांना.

अभिनय:
नाटकाभीनयाचे जागतिक विक्रमकर्ता प्रशांत दामले  हे संगीतकार के के आणि तेजश्री प्रधान हि त्यांची मुलगी कांचन यांच्या भूमिकेत असून त्या दोघांनी आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे.

प्रशांत दामले यांच्या केके चा उल्लेख विशेष करून त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी. मान्य कि नाटक लिखित संहितेत असते पण तरीही त्यातील विनोदाला लाइव्ह प्रेक्षकांसमोर उभा करणे कथेतील विनोदाच्या टायमिंग चुकू देता आणि नाटकाचा मूळ विषय बघता मुळातील गंभीरतेच्या गाभ्याला धक्का लागू देता हे मुख्य अभिनेत्यासाठी निश्चितच कौतुकास्पद. प्रशांतजींचे कांचनसोबतचे काही प्रसंग हे कथेला पुढे सरकवण्यासाठी भावनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक होते. ते हि त्यांनी अप्रतिम रित्या निभावून नेलेत. म्हणजे एकच व्यक्ती तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात रंगमंचावर लाइव्ह प्रेक्षकांसमोर भावनात्मक (इमोशनल) प्रसंग निभावतो आणि संहितेतील विनोदाच्या फोडणीलाही पुरून उरतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे.  आणि याच सोबत काही प्रसंगात प्रेक्षकांना त्यांच्या गायनकलेचेही दर्शन घडते

तेजश्री प्रधान हिने रंगवलेली भूमिका म्हणजे कांचन१८ वर्षांपासून वडलांपासून दुरावलेली एक मुलगी जेंव्हा परत आपल्या वडिलांना भेटते तेंव्हाची एका मुलीची दोलायमान मन:स्थिती तेजश्रीने अप्रतिम रित्या उभी केलेली आहे. काही प्रसंगात तिची भूमिका कथेला पुढे नेण्यासाठी एक सपोर्ट इतकीच मर्यादित आहे तर काही प्रसंग पूर्ण तिच्या भूमिकेच्या गांभीर्यावर उभे आहेत पण सांगण्यास कौतुक कि तिने समर्थपणे सगळे प्रसंग तोलले आणि निभावून नेलेले आहेत. होणार सून मधल्या जान्हवीमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली पण या नाटकामुळे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल.

कोणत्याही नाटकात पटकथा एक महत्वाची भूमिका बजावते. या नाटकात भावनात्मक प्रसंग उभे करण्यात पटकथा आणि संवाद लेखक कमी पडले अशी शंका प्रेक्षकांना बाहेर निघताना येते. अर्थात व्यक्ती-दरव्यक्ती आकलन करण्याचा फरक असल्यामुळे असेल कदाचित पण मला असे वाटले म्हणून मी या नाटकाला प्रशांतजी आणि तेजश्री दोघांच्या अभिनयासाठी साडे तीन   [ /]* दिन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर