रविवार, १९ जुलै, २०१५

तुझे नि माझे नाते काय


तुझे नि माझे नाते काय?

महान कवी अन गीतकार संदीप खरे व शानदार संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांना आपण ओळखतो मुख्यत्वे आयुष्यावर बोलू काही या शानदार गाणे कवितांच्या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमाचे जगभर जवळपास हजार प्रयोग केल्यावर हि जोडी तसाच एक दुसरा नजराणा रसिकांसाठी घेऊन आले आहेत. "तुझे नि माझे नाते काय?". "प्रेम" हा त्याच्या गाणे कवितांचा कधीही न संपणारा अन तुफान लोकप्रिय विषय. मग कविता वाचन अन गाणे यांचा एक असा कार्यक्रम असल्यास ज्यात मुख्य विषय म्हणजे प्रेम तर?

या कल्पनेचे मूर्त रूप म्हणजे "तुझे नि माझे नाते काय?"


बर मान्य कि प्रेम हा विषय असू दे पण मग फक्त तरुणाईचा ओढा राहील, बाकीच्या वयांबद्दल काय? तर याचे उत्तर म्हणून हे दोघंही प्रत्येक वयोगटात असणार्या प्रेम या संकल्पनेच्या विविध बाजूना या कार्यक्रमात स्पर्श करतात.टीनेजर अर्थात तरुण-मध्यमवयीन-आणि मोठे या सर्व वयोगटाना आपल्या गाणे-कवितात सामील करून सुवर्णमध्य साधलेला आहे.
आता आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाशी अगदी नैसर्गिकपणे या कार्यक्रमाची तुलना होईलच. दोन्ही कार्यक्रमांचा सादरीकरणाचा format सारखाच आहे पण यावेळेस त्यांनी घेतलेला महत्वाचा बदल म्हणजे रंगमंचावरील उपस्थिती. आधीच्या कार्यक्रमात फक्त संदीप-सलील हे दोघंच स्टेजवर असायचे पण या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सर्व वाद्यवृन्दाना आणि दोन गायिकांना स्टेजवर संमिलीत केलेले आहे, या दोन गायिकांमध्ये सौभाग्यवती सोनिया (संदीप) खरे यांचे देखील प्रेक्षकांना दर्शन घडते. मी बघितलेल्या आजच्या प्रयोग क्रमांक दोन मध्ये तरी त्या होत्या.
-समीर 

शनिवार, १८ जुलै, २०१५

बजरंगी भाईजान



बजरंगी भाईजान

मागच्याच पंधरवड्यात आपण एक आयडियल आणि अद्भुत दक्षिण भारतीय कलाकृती अनुभवली. मग आता या कलाकृतीला आपण हिंदीत आपल्या स्टाईलने टक्कर द्यायला नको? याच इच्छेला दमदार उत्तर देण्यासाठी आलाय बजरंगी भाईजान.एक परिपूर्ण अन उत्कृष्ट कलाकृती.
कहाणी:
मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) हि एक पाकिस्तानी मुलगी. कर्मधर्मसंयोगाने चुकून पाकिस्तानातून भारतात हरवून येते आणि ती आपल्या पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी भाईजान (सलमान खान) ला सापडते.
तो आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पाकिस्तानात कसा पोचवतो या मुख्य धाग्याभोवती गुंतलेली कहाणी म्हणजे बजरंगी भाईजान. आता कुणालाही शंका येईल कि त्यात काय विशेष म्हणून. आणि ते खरेही आहे पाकिस्तानात एका हरवलेल्या मुलीला पोचवणे यात काहीही तीर मारण्यासारख नाही. पण जर ती मुलगी मुकी असली तर? हो ती मुलगी मुकी असते!!! तिला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन एका मुक्या मुलीला तिच्या घरी पाकिस्तानात पोचवणे हा नक्कीच एका कहाणीचा विषय आहे. मग कहाणी हिंदी म्हणजे प्रेम,मैत्री,द्वेष इत्यादी इत्यादी भावना वेगवेगळ्या अनुषंगाने कथेत डोकावतात. गाणेही असतातच. पण भारतीय (हिंदी) मानसिकतेसाठी महत्वाच प्रकरण म्हणजे कहाणी. या एंड वर सलमानने पूर्ण यशस्वीपणे बाजी मारलेली आहे.
अभिनय:
सलमान खानचे कौतुक शब्दश: करावे तितके कमी इतके शानदारपणे त्याने पवन चतुर्वेदी उभा केलेला आहे. एका रिटायर्ड वेद विशारद पहलवानाचा मुलगा. पहलवानी आणि अभ्यासातही कमी. त्याच्या आयुष्यात अचानक घडलेला बदल. आयुष्यात झालेले नायिकेचे आगमन. आणि या सगळ्या कोलाहलातून त्याने केलेली मानवतेच्या पातळीवर एका मुक्या मुलीची मदत. करीना कपूर देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण तुम्ही बाहेर निघता तेंव्हा तुमच्या लक्षात राहतो तो सलमान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी. वास्तविक बघता नवाजुद्दिन सिद्दिकी हा एका सहाय्यक भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेचे कथेतले आगमनही मध्यंतरानंतर होते. पण बाहेर पडताना तुम्हाला लक्षात राहतो तो त्याने रंगवलेला सहाय्यक आणि सालमन हे दोघच बस. हर्षाली मल्होत्रा या छोकरीचे कौतुक केल्याशिवाय बजरंगी भाईजानच्या अभिनयाचा उल्लेखही भविष्यात होणार नाही इतकी छाप तिने सोडलेली आहे. तिने रंगवलेली शाहिदा (मुन्नी) हि एक मुकी मुलगी आईपासून दूर आणि आईच्या शोधात. वाचताना महत्व फक्त एका वाक्यात संपत असल तरी बघताना पूर्ण चित्रपट उभा राहिला राव तीन तासांचा. खरोखर छोकरी अक्षरश: शाहिदा म्हणून जगलेली आहे पूर्ण कहाणीभर
दिग्दर्शन:
कबीर खान या आपल्या एक था टायगर वाल्या शिपच्या कप्तानाला यावेळेस सलमानने स्वत: एक निर्माता बनल्यावर रिपीट केलेला आहे. एक था टायगर मध्ये देखील भारतीय आणि पंजाबी जासूस यांची प्रेमकहाणी अशी वेगळीच थीम होती. आणि या वेळेस तर कहाणी खूपच वेगळी होती. पण कबीर खान स्वत: कहाणी सहलेखक आणि पटकथा व संवाद लेखकही असल्यामुळे तो सर्व आघाड्यावर शीपचा कप्तान होता. वास्तविक बघता भारत-पाकिस्तान मधील दरीला आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात सांधणे असा एक स्तुत्य प्रयत्न होता. भारत आणि पाकिस्तानमधील सर्वसामान्य लोकांना हि दरी नकोय. त्यांना हवाय तो शांततेचा मार्ग. हा संदेश देताना समोर सलमान असल्यावर आणि किक व जय हो च्या अपयशानंतर सर्व नजर बजरंगी भाईजान वर असल्यावर इतक्या स्फोटक कहाणीला दमदारपणे पेलून दाखवणे म्हणून कबीर खानचे कौतुक करावेच लागेल.
त्याच्या दिग्दर्शन शैलीच्या वेगळेपणाचे एकच उदाहरण घेऊ, कोणत्याही कहाणीला प्रेक्षकांच्या आतपर्यंत झिरपण्यास कोणत्याही सिनेमाचे पहिले दहा मिनीट मुख्य भूमिका बजावतात. या दहा मिनटात समोर पडद्यावर कुणीही असू दे पण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे. बजरंगीमध्ये पहिल्या दहा मिनटात सलमान नसतो पडद्यावर पण एका छोट्या मुलीला अप्रतिम रित्या हाताळून कबीर खान प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर पुढील तीन तास खिळवून ठेवतो. एक था टायगर मध्ये पहिल्या दहा मिटताच तो प्रेक्षकांना flash back थ्रू कहाणीच्या मुळावर नेतो. मान्य असू दे वा नसू दे पण हि नस जी कबीर खान ला गवसलेली आहे ती भविष्यात त्याला एक यशस्वी दिग्दर्शक पातळीवर नेईल हे नक्की.
संगीत:
बजरंगी भाईजान मध्ये संगीत प्रीतम चे आहे. वैयक्तिक रित्या प्रीतम जा मला नेहमीच वन सॉंग वंडर वाटत आला आहे . प्रीतम हा संगीत दिग्दर्शक असलेल्या बर्याचश्या सिनेमात केवळ एक गाण हे इतके अप्रतिम असते कि बर्याचदा केवळ ते गाणे कमर्शियल पातळीवर चालून जाते आणि बाकी ठणठणगोपाळ. धूम (टायटल सॉंग), रेस- १ (जरा जरा टच मी), ये जवानी है दिवानी (बदतमीज दिल) हे त्याची काही उदाहरणे. याही सिनेमात सगळेच गाणे आपापल्या जागी शोभतात पण आपल्या किर्तीनुसार एक गाणे अप्रतिम देऊन गेला आहे प्रीतम. अदनान सामी ची कौसर मुनीर लिखित गझल "भर दो झोली मेरी". या गाण्याचं सिच्युएशन इतक जबरदस्त होत आणि त्या गझलचे बोलही त्या प्रसंगाला साजेसे आहेत. सेल्फी ले ले सारखा "वेळ मारून ने" टाईप काम नाही. अदनान सामीने ती गझल अगदी अप्रतिम रित्या निभावलेली आहे. त्याच्या बुर्सटलेल्या वजनापेक्षाही ती गझल आणि त्याचे बोल प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

हिंदी सिनेमा कसा असतो? तर तो कहाणीवर अवलंबून असतो, त्या कहाणीला चारही अंगाने फुलवतो त्यातला कलाकारांचा अभिनय.पण हिंदी सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमासारखा व्यक्तीपुजक नसल्यामुळे कहाणी जर प्रेक्षकांना भावली तर आणि फक्त तरच कोणत्याही सिनेमाला हिंदीत हिट असा दर्जा मिळतो. केवळ एखाद्या अभिनेत्याची उपस्थिती हे हिंदीत कमर्शियल यशस्वीतेतच लक्षण नसते. याच आपल्या मागच्या जय हो आणि किक या आपल्या मागील अपयशावरून सलमान खान ने जबरदस्त धडा घेऊन बजरंगी भाईजान आणलेला आहे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असा हा हिंदी चित्रपट मला आवडला आणि नावं ठेवण्या इतकी कोणतीही गोष्ट यात जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, १४ जुलै, २०१५

बाहुबली



बाहुबली 
अतिशय प्रचंड प्रमाणात प्रदर्शनपूर्व गाजावाजा झालेली कलाकृती, अडीचशे कोटीचे बजेट पासून अक्षरश: नवीन वसवलेल्या एका बोलीभाषे पर्यंत अनेकानेक दंतकथा आणि समोर येतो "बाहुबली"
दक्षिण भारतीय चित्रपटांची हि खरोखर खासियत असते कि कहाणीत कमतरता असतीलही कदाचित पण ते इतका जीव ओतून कहाणीला रंगवतात कि माणूस त्या जाणवणाऱ्या मेहनतीच्याच प्रेमात पडतो. भलेही काल्पनिक कथा अस डिस्क्लेमर सुरवातीला देऊनही व्यक्ती कहाणीत इतका गुंतून जातो कि नकळतपणे कहाणीच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतो.

अडीचशे कोटींचे बजेट, मग शानदार फॉरेन लोकेशन्स, जबरदस्त वेशभूषा, हाय-फाय चारचाक्या इत्यादी इत्यादी आपल्या अपेक्षेत असते हिंदी चित्रपटसृष्टीला अनुसरून पण यांपैकी काहीही नाही. उपरोल्लेखित गोष्टींपैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही तुम्ही चित्रपट रसिक असा वा नका असू बाहेर पडताना चित्रपटाबद्दल काहीही खराब बोलत नाही. दिग्दर्शक-पटकथा लेखक आणि सह कहाणी लेखक एस एस राजमौलीचे हेच सगळ्यात मोठे यश. माउथ-टू-माउथ पब्लिसिटिच्या पहिल्याच पायरीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवण्यात चित्रपटाला यश मिळते. हा दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे याचे हिंदी व्हर्जन आल्यास बाहुबलीची मुख्य भूमिका कुणी करावी असा विचार तुमच्या (हिंदी) मनातचमकलाच समजा तर मध्यंतराच्या आधीपर्यंत "कुणीही" चालेल असे वाटणारे आपण मध्यंतरा नंतर फक्त ह्रिथिक रोशन आणि टायगर श्रॉफ पाशी येउन थांबतो त्या दोघांच्या असलेल्या फिजिकल फिटनेस मुळेच.

हिंदी किंवा भारतीय असं म्हणू चित्रपटसृष्टीवर नेहमीच टीका होते कि टेक्निकली खूप खूप कमी आहे म्हणून. या टीकेला समर्थ नाही म्हणता येणार पण बर्याच अंशी उत्तर देणारी एक कलाकृती म्हणून भविष्यात बाहुबलीचे नाव घेतल्या जाईल. जास्त डिटेल आपल्याला कळत नाही पण लक्षात येणारी ठळक गोष्ट म्हणजे छायाचित्रण. विमानातून शूट करून जमिनीवरचे अगदी अप्रतिमरीत्या रेखाटलेले युद्ध. अक्षरश: इतके शानदाररित्या कि "३००" नावाचा एक हॉलीवूडपट आला होता त्याची बरोबरी करणारे छायाचित्रण अन स्पेशल इफेक्ट्स. मान्य करा वा नका करू पण हि गोष्ट भारतीय (सगळ्याच) चित्रपटसृष्टीत दुर्मिळ.
कहाणी:
दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे निर्विवादपणे नायक प्रधान. हि कहाणी थोडी प्राचीन काळची आहे. म्हणजे राज्य- राज्याचा अपेक्षित उत्तराधिकारी-त्यावरून रंगलेले नाट्य आणि त्याचा झालेला शेवट. हा शेवट नीटपणे न करता तेथेही स्पष्टपणे दिग्दर्शकाने सिक्वेलची मुहूर्तमेढ केलेली आहे. म्हणजे कहाणीला पुढे नेण्यासाठी का होईना पण बाहुबली पार्ट टू नक्की येणारच.
अभिनय:
कहाणीत दोन भाऊ प्रभास आणि राणा दग्गुबत्ती. पण त्यांचा उल्लेख न करता बाहुबली पुढे सरकरणारच नाही.आता कहाणीच थोडीशी वेगळी मग नायकही त्या भूमिकेला तोलून धरणारा हवा. पण सांगण्यास आनंद कि प्रभास आणि राणा दग्गुबत्ती हे दोघेही शब्दश: पुरून उरतात आपापल्या भूमिकांना. प्राची कालचे युद्ध, घोडेस्वारी, रथांचे handling आणि रथांवरून युद्ध कौशल्य दाखवणे इत्यादी इत्यादी बाबी खरोखर अप्रतिम रित्या राजामौलीने हाताळलेल्या आहेत. नाही म्हणायला थोड्यावेळासाठी तमन्ना देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण मध्यंतरानंतर थोड्या वेळाने ती गायब होते आणि पुन्हा दर्शन देत नाही . तिच्या भूमिकेच्या अस्तित्वाचे मुख्य कारण प्रभास (बाहुबलीच्या) व्यक्तिरेखेचे आपल्याच जीवनाच्या भूतकाळातले आगमन बस. एक गाणही आहे पण तोंडी लावण्यापुरते. एम एम करीमला काही काम. अभिनयासाठी सत्यराज म्हणजेच कटप्पाचा उल्लेख करावाच लागेल. एका महत्वाचा सहाय्यक भूमिकेत तो आहे. कोठेही अतिशयोक्ती न होऊ देत अप्रतिमरीत्या आपले फक्त अस्तित्व जाणवून गेलाय तो.

कोणताही चित्रपट का बघावा किंवा का बघू नये याची कारणे व्यक्तिपरत्वे बदलतात. या कारणात वय-आणि अनुभव हे महत्वाची भूमिका बजावतात. एकादी गोष्ट जी मला आवडते तिचा एखाद्या वाचकाला तिटकारा असू शकतो. पण तरीही रिव्ह्यू मी लिहिला अन तो तुम्ही वाचताय या न्यायाने मी बाहुबलीला दिग्दर्शन-स्पेशल इफेक्ट्स आणि सगळ्याच अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर