तनु वेड्स मनु रिटर्न्स
निर्माता दिग्दर्शक आनंद राय (आपले रांझणा वाले हो) हे त्यांच्याच जुन्या तनु वेड्स मनु चा सिक्वेल अर्थात परत टू घेऊन आले आहेत. सिक्वेल म्हटल्यावर तो पहिल्या भागावरच अवलंबून हवा. जर तो तसा नसेल लोकांचा इंटरेस्ट निघून जातो. पण तनु वेड्स मनु बद्दल सांगण्यास आनंद कि कहाणी पूर्णपणे पहिल्या भागावर अवलंबून आहे. आणि पहिला जिथे संपतो तिथूनच पुढे दुसरा सुरु होतो पण तरीही दुसरा बघताना पहिला बघितलेला असण्याची आवश्यकता जाणवत नाही. पूर्णपणे वेगळे कथानक आहे आणि ते पहिल्या भागावर अवलंबून असले तरी त्याचे संदर्भ संवादात मिळतात. त्यामुळे पहिला बघितलेला नसला तरी दुसरा बघूनही समजण्यात काहीही गफलत होत नाही. या बाबीवर आनंद राय खूप मोठे मैदान मारतात कारण सिक्वेल म्हटले कि आपल्याला असते हॉलीवूड ची सवय. कुठलाही सिक्वेल जर आधीचे पार्ट बघितलेले नसतील तर पटकन उतरत नाही. सिक्वेल हा हॉलीवूडमध्ये आधीच्याच कहाणीवर इतका अवलंबून असतो कि बस... तर सांगायचा मुद्दा हा कि हा पार्ट टू असला तरी पण तुम्ही पहिल्यांदाच जाऊनही नीट एन्जॉय करू शकता.
कहाणी:
पहिल्या भागात दोन व्यक्ती प्रेमात पडतात. त्याचं लग्न होते आणि तेथे कहाणी संपते. मग आता दुसर्या भागात लग्नानंतरच त्यांचं आयुष्य कसं बनल असेल? इंटर्नल consequences असतील का?
असतील तरी त्यांचा स्वभाव (पहिल्या भागानुसार) बघता त्यांनी ते कसे handle केले असतील?
अश्या प्रश्नांचे उत्तरं घेऊन दुसरा भाग आलेला आहे. लेखक पहिल्या आणि दुसर्या भागाचेही हिमांशू शर्माच आहेत पण त्यांनी कोठेही conceptual अतिशयोक्ती केलेली नाही. नाहीतर असल्या प्रकरणात काहीतरी संदेश देणे- कौतुक मिळवणे- अवार्ड्स मिळवण्याची इच्छा बाळगणे असल्या विविध कारणांखाली "अती" म्हणजेच practically घडण्यास अशक्य असल्या बाबींचा समावेश केल्या जातो. मग या बाबींना कहानिशी-पहिल्या भागाशी वगेरे तारतम्य सांभाळण्यात दिग्दर्शकाची पकड सुटते.पण येथे लेखकाने असे काहीही घडू दिलेले नाही.
अभिनय:
तनु त्रिवेदी (कंगना राणावत) हिने अक्षरश: एकहाती आणि समर्थपणे तोलून धरलेला हा चित्रपट आहे.
तिचे मनुशी (आर माधवन) पटणे- न पटणे इत्यादी साकारताना पहिल्या भागातला तोच बिनधास्तपणा साकारलेला आहे. आणि तरीही नवेपणा देखील itroduce केलेला आहे. या (थोड्याफार) नवेपणाचा मला जाणवलेला मला जाणवलेला संदर्भ म्हणजे तिचे राजा अवस्थी (जिमी शेरगिल) सोबतचे काही प्रसंग. पण कदाचित दुसर्या भागात ती लग्न झालेली आणि पहिल्या भागात कुमारी असा फरक असल्यामुळे तो कोरडेपणा असावा. आर माधवन या व्यक्तीने काहीही जास्त संवाद नसतानाही फक्त expressions मनु शर्मा तोललेला आहे. आणि याचमुळे तो व्यवस्थित जमून आलेला आहे. पण तनु बर्याच प्रसंगात इतकी जमून आलेली आहे कि हा गडी नायक न राहता सहाय्यक व्यक्तिरेखा बनतो. पण हि तनुच्या (कंगनाच्या) अप्रतिम अभिनयाची एकप्रकारची असलेली पावतीच.
दिग्दर्शन:
आनंद राय यांनी सिक्वेल मधेही पहिल्या भागावर अवलंबून असणेपण सोडलेले नाही आणि तरीही नवीन प्रेक्षकांना तो समजेल कुठेही न समजल्यासारखा वाटणार नाही याची काळजी घेतलेली आहे हे वाटल्याशिवाय राहत नाही. भलेही संगीत हा कमर्शियल यशासाठीचा एक अतिशय महत्वाचा घटक यात कमी पडतो.पण ती कमी कहाणी अन दिग्दर्शकाचे कहाणी हाताळण भरून काढते.
पहिला भाग हा उत्तम होताच पण हा दुसरा भागही अप्रतिमरीत्या बनलेला आहे. एखादा सामान्य व्यक्ती चित्रपटगृहात तीन तास एन्जॉय करणे या हेतूने जातो. बाकी काहीही त्याचा हेतू नसतो. बर्याच काळानंतर या हेतूला पूर्णपणे खरा करणारी एक कलाकृती. मराठीत सिक्वेल्ची अपेक्षा इतकी नाही पण भविष्यात "मुंबई-पुणे-मुंबई" चा सिक्वेल कधी बनला तर तो असाच अर्थपूर्ण असावा अशी मला प्रामाणिक अपेक्षा आहे. हिमांशू शर्माचे अप्रतिम कहाणी आणि पटकथा लेखन अन कंगनाच्या अप्रतिम अभिनयासाठी मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
अगबाई अरेच्या-२ (मराठी)
अगबाई अरेच्या या आपल्या पहिल्याच चित्रपटाचे टायटल दुसर्या चित्रपटात वापरून त्या सिक्वेल सारखे २ हे शीर्षक देऊन केदार शिंदे हा नवीन चित्रपट घेऊन आलेला आहे पण सांगण्यास आनंद जी हा चित्रपट म्हणजे सिक्वेल नाही. पूर्णत: वेगळे कथानक आहे आणि या कथानकाचा पहिल्या भागाशी काहीही संबंध नाही.मागच्या अगबाई अरेच्या मध्ये "गालावर खळी" स्वप्नील बांदोडकरचे गाजलेले गाणे होते. भलेही तो चित्रपट कथानकासहित विस्मृतीत गेला असेल पण हे गाणे आणि अजय-अतुलचे "मल्हार वारी" हे गाणे विसरणे अशक्यच. तिकीटबारीवर तो चित्रपट खूप गाजला होता पण त्या गाजण्यामागे या दोन गाण्यांचा सहभाग खूप मोठा आहे.याच पहिल्या भागातले "मन उधाण वार्याचे गुज पावसाचे" हे शंकर महदेवनचेहि उत्कृष्ट गाणे होते.
असे जर आहे तर हा पार्ट २ असा दुसरे भागासारख नाव घेऊन का आला असेल ? पहिल्या भागात कथेच्या नायकाला दुसर्याच्या मनातल ओळखण्याची शक्ती आपोआप मिळते आणि त्याचा तो कसा वापर करतो या भोवती फिरणारे ते कथानक होते. या भागात अशी कोणतीही शक्ती वगेरे कथेत नाही पण मी बघितलेल्या केदार शिंदेच्या मुलाखतीप्रमाणे प्रेमात मन-कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा हे medium खूप महत्वाची भूमिका बजावतात. मग पहिला भाग हा पूर्णत: मनावर अवलंबून जर होता तर हा भाग स्पर्श अर्थात त्वचा या medium वर अवलंबून आहे. म्हणून हा पार्ट २ असावा. आणि केदार शिंदे हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक मोठे नाव. त्यामुळे पुढील काही वर्षात याच रेंज मध्ये पुढील पार्ट दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. त्या मुलाखतीत तरी मला असं जाणवलं आता बघुयात कि व्यावसायिक गणितं केदार शिंदेच्या पाठीशी राहतात कि त्याला थांबवतात.
अभिनय:सोनाली कुलकर्णीच्या अप्रतिम अभिनयाचे कौतक असल्याशिवाय अगबाई अरेच्या-२ चा उल्लेखहि अशक्य इतका अप्रतिम अभिनय तिने केलेला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणजे दिल चाहता है आणि डॉ प्रकाश बाबा आमटे वाली (दुसरी नाही), नाहीतर सिनली कुलकर्णी मराठी चित्रपट सृष्टीत दोन आहेत. गैसमज होण्याची शक्यता आहे.तर या सोनाली कुलकर्णीने रंगवलेली शुभांगी कुडाळकर हि यातली मुख्य व्यक्तिरेखा. हिच्या अवतीभोवती पूर्ण काहीही सुरवात ते शेवट पर्यंत फिरते. पण सांगण्यास आनंद कि सोनाली कुलकर्णी कोठेही कमी पडत नाही. हि कहाणी तिचा तिच्या (कोणत्याही) प्रेमाला होणारा स्पर्श आणि त्याचे aftereffects अश्या एका वेगळ्याच विषयाभोवती गुंफलेली आहे.
दिग्दर्शन:
केदार शिंदे यांचे दिग्दर्शन हि चित्रपटाची जमेची बाजू, यांच्या दिग्दर्शन क्षमतेबद्दल कुणाची शंका असण्याची शक्यताच नाही. आणि तरीही कुणाला शंका आल्यास "सही रे सही" किंवा "पुन्हा सही रे सही" हि त्यांची दोन नाटके बघून घ्यावीत. गैरसमज दूर होईल.
तर स्पर्शावर बेतलेले एक कथानक आणि त्यातही मराठी म्हणजे प्रेम हा कहाणीचा अनिवार्य भाग. या स्पर्श आणि त्याचे कहानिशी corelation सांभाळताना दिग्दर्शकाची पकड सुटेल असे बरेचशे प्रसंग होते. सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे सोनाली कुलकर्णीच्या मुख्य व्यक्तिरेखेला किती काळ फुटेज देणे. तिला कमी काळ जरी पडद्यावर आणल असत, एडिटिंग वगेरे मध्ये रोल काटला असता तरी फरक पडला असता. येथे केदार शिंदे मैदान मारतात.
पहिला भाग हा सुपर डुपर हिट होता. मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड वगेरे पण जर दोन असे सिक्वेल सारखे शीर्षक वापरताय तर मग थोडा फार संबंध पहिल्या भागाशी दाखवायला हरकत नव्हती असं वाटून जाते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग रोहित शेट्टी जसे त्याचा चित्रपटात दिग्दर्शनाचे श्रेय Rohit Shetty & team असं आपल्या पूर्ण संचाला देतो, तीच पद्धत इथेही केदार शिंदे & team अशी श्रेयनामावलीत दिग्दर्शनाच्या श्रेयासाठी वापरलेली आहे. पण मग त्याची सगळ्यात मुख्य गोष्ट फॉलो केलेली नाही. mouth to mouth publicity साठी कोणत्याही चित्रपटाचा शेवट मुख्य भूमिका बजावतो.
तर चित्रपटाचा संथ शेवट आणि संगीत हे दोन मुख्य मुद्दे अगबाई अरेच्या-२ मध्ये कमी पडतात म्हणून मी चित्रपट ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
कॉफी आणि बरेच काही (मराठी)
मराठी सिनेमा हा "प्रेम" या सार्वत्रिक ज्वलंत विषयावर अवलंबून असतो पण या विषयाला नीट हाताळलं तर काही अप्रतिम कथा पडद्यावर उतरतात याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "कॉफी आणि बरेच काही" वास्तविक प्रेम हा विषय असा कि हिंदी चित्रपटसृष्टीमुळे शारीरिक लगट हि एक आवश्यक factor असतो असा प्रेक्षकांचा समज. पण मराठी मानसिकता लक्षात घेता शारीरिक लगटिला बायपास करून फक्त भावभावनांचे खेळ आणि त्यातून कहाणीचा हैप्पी एंड असा एक दुर्मिळ योग दिग्दर्शक/लेखक प्रकाश कुंटे यांनी जमवून आणलेला आहे.
कहाणी:
वैभव तत्ववादी (निषाद) आणि प्रार्थना बेहरे (जाई) या दोघा software कंपनीतल्या कलीग्सची कहाणी म्हणजे "कॉफी आणि बरेच काही". निषाद सिनियर अन जाई ज्युनिअर आणि या दोघांची हि घडलेली हि कहाणी.
अभिनय:
सध्याचे arrange marriage करणारे तरुण मुलं/मुली स्वत:ला जस समजतात अगदी तशीच जोडी निषाद पडद्यावर उतरवण्यात वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरेला यश मिळालं आहे. नेहा महाजन ने उभी केलेली आभा हि जाईची बहिण पण छोट्याश्या भूमिकेत असली तरी छाप उमटवून जाते.
दिग्दर्शन:
वास्तविक बघता अर्रेंज marriage साठी जी आधी दाखवण्याची जी भेट असते त्याने सुरवात होणारी हि कहाणी आणि प्रेमाकडे वळताना भरकटण्याचा १०१% चान्स होता पण प्रकाश कुंटे यांनी प्रेक्षकांचं कुठेही कन्फ्युजन होणार नाही याची काळजी सगळीकडे घेतल्याचं जाणवते. सध्या सुध्या शब्दातून त्यांनी मराठी मानसिकतेला कहाणी पचेल अशी सोय केलेली आहे.
लग्न करताना क्रश म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा फक्त अपिअरन्स (सौंदर्य/दिसणे) महत्वाचे नसून
सोबत राहताना पटणे हे हि महत्वाचे असते या एका चाकोरीपासून वेगळ्याच पण मराठी मानसिकतेसाठी महत्वाच्या विषयाला हात घालणाऱ्या चित्रपटला मी साडे तीन ३ १/२ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
Fast & Furious 7
Hollywood director James Wan brought this 7th installment in this series. This movie is very famous worldwide hence now it do not requires any kind of introduction as not 1st or 2nd this is the 7th sequel in this seriesWe have many movies in Bollywood which are based on stunts e.g. Dhoom series is based on bike stunts but all the stunts available here are all localized with Bollywood tradition. They have many restrictions like money, technology availability, location requirement, execution difficulties etc. But I think this series is an inspiration for all stunts based movies in movie industry all over the world. This is the best example of a perfect execution of stunts and admirable picturisation of these perfectly executed stunts. We will take a small example in this 7th part, here there is one scene where Paul Walker reached on edge of mountain rift where his vehicle/bus got stuck. It was really a difficult stunt to execute his escape from that scenario. But it was carried out and that too so much brilliantly posturized that although it must be a story scene and obviously acting but it do not seem like this just for a second. It may be possible that a computer animation or graphics or something may be done but still you cannot oppose the brilliancy of scene execution. Although it was a Hollywood movie and as this story is not based on any unnatural or paranormal characters, involvement of emotions was observed in all parts of this series. This seventh part is also not an exception. When we see emotional involvement of characters in a Hollywood story it is observed that this emotional attachment or involvement is always based on practicality and effective profitable practicality. Although this always depends on different stories but this is my general observation.
As a hardcore Bollywood movie lover, I am not correct person to rate this movie but I will give this movie 5* out of 5 for magically pictured and unimaginably perfect executed stunts rest up-to viewers.
-Sameer
Cinderella-
Hollywood film makers are excellent when it is a question of effective execution of a fantacizing story on screen. Well, we read in our childhood regarding this romantic fantasy story of Cinderella which became in a shape of movie, real characters etc. and came to meet viewers on big screen. One thing which is required to mention that there are so many people who are interested in this story as almost all the rows are fully occupied in a multiplex where I have seen this film which was unexpected. But the original story by Charles Perrault is I found more fantasizing than this on screen story. This must be due to English accent difference which is much more difficult to digest in a Hollywood movie than reading in a book. In this story, in familiar Hollywood style, the cruelty of a step mother towards Cinderella is shown but as we are Bollywood movie lovers we found it most of the times something like “reading between the lines” or “ left for our assumption”. Suppose Cinderella is made in Bollywood director could have spent one and half hour out of the three to explain the cruel behavior of Cinderella’s stepmother towards her. Here this cruelty seems based on audience understanding. This seems due to time boundation of director have in Hollywood. As we find happy ending in required in almost all fantasizing stories, here magic is included as shown in original story.
“have Courage, be Kind and have faith in little bit of Magic” this is the most beautiful line which I really liked in this movie. We find it practically true in our life while dealing with many people in our day-to-day life.
A fantasizing on–screen story depends on it’s on screen execution. As the story was dependent on a originally published one, which is either liked or un-liked by most of the people if it created issue in any manner during execution as a drama in screen it will lead it to a failure. Kenneth Branagh as a director was successful in this on screen evolution of this story which is popular all over the world. I will give this film 4* out of 5 for efforts of director/writer and lead actress rest up-to viewers.
-Sameer
दम लगा के हैशायशराज फिल्म्सची धुरा आदित्य चोप्राने घेतल्यापासून आदित्य चोप्राने या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात चित्रपटनिर्मितीच्या तंत्रात अनेक स्वागतार्ह बदल केले असून यशराज फिल्म्स आता संगीत विरहित आणि पूर्णत: कहाणीवर अवलंबून असलेल्या आशयगर्भ चित्रपट निर्मितीत आली असून या क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व आधीच्याच वेगळेपणानुसार ठसे उमटवीत आहे हे हा चित्रपट बघितल्यावर रसिकांना जाणवते हे मात्र नक्की.
आर्ट फिल्म ज्याला मराठीत कदाचित आशयगर्भ असे म्हणूया त्यात कहाणी आणि त्या कहाणीत पात्रांना असलेले दिग्दर्शन यांना अनन्यसाधारण महत्व असते. ते संबंधित पात्र जर कहाणीला नीट प्रेक्षकांपर्यंत सादर करू शकले नाहीत तर असे चित्रपट कदाचित समीक्षकांच्या दृष्टीने यश मिळवतातहि पण पदरमोड करून तिकीट काढणारे प्रेक्षक मात्र फारसं चांगले बोलत नाहीत आणि कमर्शियलि सपशेल अपयशी ठरतात असे प्रयत्न. यशराज फिल्म्सने याची काळजी घेतलेली असल्याचे बर्याच ठिकाणी जाणवून जाते, आणि तितके अनुभवी असल्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षितही आहे.
याचे सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे कास्टिंग अर्थात पात्र निवड. हि पात्र निवड naturally कहाणीच्या अपेक्षेनुसारच असली तरीही ती जर चुकली असती तरीही नक्कीच एक ढिसाळ प्रयत्न आपोआप बनला असता हा.पण आदित्य चोप्राने यात नक्कीच अनुभवाचे योग्य analysis करून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत.
कहाणी:
नव्वदीच्या दशकातली कहाणी ज्यात नायक एक सामान्य मुलगा असून त्याचे ऑडियो कॅसेट्सचे दुकान असून एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला व्यक्ती असून त्याचे त्याच्या मनाविरुद्ध जुळवलेले अरेंज marriage आणि शेवटी झालेला सगळ्या गुंत्याचा
शेवट अशी एक एकदम यशराजच्या इमेजपेक्षा वेगळी कहाणी असून कदाचित काही विशिष्ट वयोगटात जाणवणाऱ्या काही ज्वलंत पण सार्वत्रिक नसणाऱ्या पण असणार्या आणि हे आपण कधी ना कधी नक्कीच अनुभवलेल्या प्रश्नाला हात घालणारी हि एक कहाणी.
अभिनय:
प्रेम तिवारी (आयुष्मान खुराणा) हा तो सामान्य तरुण. दहावीही नसलेला आणि वडलांचे ऑडियो कॅसेट्सचे दुकान इमाने इतबारे चालवणारा. आयुष्यमान खुराणाची अभिनय निवड किंवा रोल करण्याची निवड (मिळालेल्या कहाण्यांपैकी) हि उत्तम असते हे विकी डोनर आणि हवाईझादा या उदाहरणामुळे प्रेक्षक नक्कीच समजून असतील. पण त्याने निवडलेल्या या भूमिकेमागे निर्माता आणि त्याचे वेगळेपण नक्कीच अवलंबून असतील असे वाटल्याशिवाय राहत नाही. कारण हिरोगिरी अर्थात प्रेम-नृत्य-फायटिंग इत्यादी काहीही करणारा नायक हा नाही. दहावी न झालेला एक सामान्य तरुण रंगवताना त्याचे आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न रंगवताना आणि सोबतच लग्नाळलेला आणि लग्नासाठी काही विशिष्ट अपेक्षा बाळगणारा आणि त्या अपेक्षांची practicality पूर्णत: दुर्लक्षित करून फक्त खंडीभर अपेक्षा बाळगणारा एक निम्न मध्यमवर्गीय तरुण उत्कृष्टपणे उभा केलेला आहे आयुष्यमान खुराणाने.
संध्या वर्मा (भूमी पेडणेकर) हि मुख्य नायिकेच्या भूमिकेत असून वाढलेले वजन आणि त्या वजनामुळे आपोआप संयमित झालेल्या अपेक्षा अशी एक वेगळीच दोलायमान व्यक्तिरेखा साकारताना तिने खरोखर तिचे वेगळेपण जाणवून दिलेले आहे.
दिग्दर्शन:
भेजा फ्राय (१ आणि 2)चे लेखक शरत कटारिया दम लगा के हैया मध्ये रसिकांना दिग्दर्शक म्हणून भेटतात. आणि दोन्ही भेजा फ्राय इतकेच त्यांचे वेगळेपण आणि अस्तित्व जाणवून देतात. वास्तविक बघता हि कहाणीही थोडी विचित्र categoryत येते कारण सामान्य मुलीना लग्नाआधी आणि बायांना लग्नानंतर वजनावर केलेली गमतीतलीहि टिप्पणी चालत नाही हे आपल्याला जाणवते.पण खरोखर कुठेही प्रेक्षकांना पूर्ण चित्रपटात अशी pratyaksh टिप्पणी नायिकेवर जाणवत नाही आणि जाणवण्याइतपत अप्रत्यक्ष संदर्भ मात्र जाणवतात. मान्य असो वा नसो हा कंट्रोल दिग्दर्शकाचाच आणि याच महत्व बघताना जाणवते.
बरेचदा आपण बर्याच विजोड जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात बघतो. कोणत्याही प्रकारची शारीरिक compatibility नसलेल्या. आपण लक्ष देत नाही पण लक्ष दिलं तर प्रश्न पडतो कि या जोड्या टिकल्या कश्या? या "टिकल्या कश्या" ला काहीही उत्तर नसते आणि शोधूही नये पण बनतात कश्या याचे उत्तर मिळू शकते याचा अंदाज या चित्रपटाने लागतो. असा अंदाज प्रेक्षकांना लागावा आणि कहाणी नीटपणे पडद्यावर उतरावी हि निर्मात्याची/लेखकाची अपेक्षा दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची जोडी पूर्ण करते आणि दिग्दर्शन आणि अभिनयासाठी मी चित्रपटाला (४) चार * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
हवाइझादा
विमान हा शब्द आठवायला सांगितला तर आपल्याला काय क्लिक होते?? पुरातन काळात पुष्पक विमान ज्यात प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येला परतले पण हे जरा अतीच पुरातन झाल पण थोडं पुढे आल्यास राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला १९०३ साली आणि मग त्या विमानाला पुढे सुधारत सुधारत आजच विमान बनलं असे आपल्याला शाळेत वगेरे समजल्याच आठवते. पण राईट ब्रदर्सने विमान शोधायच्या आठ वर्षे आधी पंडित शास्त्री आणि शिवकर तळपदे या महाराष्ट्रीय व्यक्तींनी विमान यशस्वीपणे शोधले होते पण राज्यकर्त्या इंग्रजांनी हे कधीच मान्यता देऊन जगासमोर आणले नाही. त्यामुळे त्यांना त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. हि कहाणी जनतेला/जगाला कळावी या हेतूने लेखक-पटकथा लेखक विभु पुरी नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत "हवाइझादा"
कहाणी:
शिवकर तळपदे हा एका जमीनदाराचा सुपुत्र, काहीही करत नसलेला, अक्षरश: चौथीत आठ वर्ष वगेरे दाखवून त्याची बौद्धिक पातळी हिन हे सिद्ध करण्याचा विभु पुरीचा प्रयत्न पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो. वास्तविक बघता हाच जर हेतू होता तर त्याला पूर्णत्वास नेण्याचे अनेक पर्याय होते पण हा पर्याय जमलेला नाही.
हा शिवकर तळपदे घरातला काहीही करण्यास असमर्थ व्यक्ती पुढे योगायोगाने पंडित शास्त्रींच्या (मिथुन चक्रवर्ती) संपर्कात येतो.
शात्रीजींच्या संपर्कात येउन त्याच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळते. पुढे शास्त्रीजींचा मृत्यू होतो अर्थात या शिवकरच्या कृत्याने मानसिक धक्का बसून. मग शास्त्रीजींचे अपूर्ण स्वप्न विमान बनवण्याचे ते शिवकर पूर्ण करून विमान बनवण्यात यशस्वी होतो.
दिग्दर्शन:
विभु पुरींचे दिग्दर्शन लाभलेले आहे पण त्यांचे नवागतपण खूप ठिकाणी कळून येते. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी चित्रपट दिग्दर्शन स्वतंत्रपणे करण्याआधी सहायक दिग्दर्शक किंवा तत्सम एखादी भूमिका निभवायला हवी होती अनुभव मिळवण्यासाठी असे वाटून जाते. बर्याच गोष्टी खुपतात कथेतल्या, काही उदाहरणे घेऊ-१.चौथीत आठ वर्ष नापास असलेला मुला "पारा" चे दोन अर्थ शिकवण्याइतपत हुशार कसा बनतो?२. पंडित शास्त्रींचा मृत्यू त्याच्यामुळे जर होतो तर या महत्वाच्या बाबीला पुढे पूर्णपणे दुर्लक्षित कसे काय गेलेले आहे?३. gasoline चा सोर्स त्याला कुठून व कसा मिळतो? ४.पल्लवी शारदा (सितारा) सोबतच्या त्याच्या प्रेमप्रकरणात त्याला असं ठरवल्यासारख यश कसं मिळते? काहीही न करता??५.चित्रपटात देशभक्ती दाखवण्यासाठी लोकमान्य टिळकांचा समावेश दिग्दर्शकाने केलेला आहे मग त्याचे aftereffects नंतर
काय घडले हे दाखवण्याइतपत भान का बाळगले गेलेले नाही?अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या अगदी इरिटेट करतात मुळात विषय कितीही चांगला असला तरी एखाद्या हिंदी चित्रपटाला कमर्शियलि यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टीना सांभाळावे लागते. हिंदीत तमिळ-तेलगु सारखी प्रेक्षक संख्या कन्फर्म नसल्यामुळे एका हिंदी चित्रपटाला सगळंच बघावं लागते आणि हे आता विभु पुरीला समजेल पण त्याला समजण्यासाठी एका चांगल्या विषयाला वाहिलेल्या चित्रपटाचा बळी मात्र जाईल.
मी हवाईझादाला पाव (१/४*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा
-समीर