रविवार, ३१ मे, २०१५

तनु वेड्स मनु रिटर्न्स



तनु वेड्स मनु रिटर्न्स 

निर्माता दिग्दर्शक आनंद राय (आपले रांझणा वाले हो) हे त्यांच्याच जुन्या तनु वेड्स मनु चा सिक्वेल अर्थात परत टू घेऊन आले आहेत. सिक्वेल म्हटल्यावर तो पहिल्या भागावरच अवलंबून हवा. जर तो तसा नसेल लोकांचा इंटरेस्ट निघून जातो. पण तनु वेड्स मनु बद्दल सांगण्यास आनंद कि कहाणी पूर्णपणे पहिल्या भागावर अवलंबून आहे. आणि पहिला जिथे संपतो तिथूनच पुढे दुसरा सुरु होतो पण तरीही दुसरा बघताना पहिला बघितलेला असण्याची आवश्यकता जाणवत नाही. पूर्णपणे वेगळे कथानक आहे आणि ते पहिल्या भागावर अवलंबून असले तरी त्याचे संदर्भ संवादात मिळतात. त्यामुळे पहिला बघितलेला नसला तरी दुसरा बघूनही समजण्यात काहीही गफलत होत नाही. या बाबीवर आनंद राय खूप मोठे मैदान मारतात कारण सिक्वेल म्हटले कि आपल्याला असते हॉलीवूड ची सवय. कुठलाही सिक्वेल जर आधीचे पार्ट बघितलेले नसतील तर पटकन उतरत नाही. सिक्वेल हा हॉलीवूडमध्ये आधीच्याच कहाणीवर इतका अवलंबून असतो कि बस... तर सांगायचा मुद्दा हा कि हा पार्ट टू असला तरी पण तुम्ही पहिल्यांदाच जाऊनही नीट एन्जॉय करू शकता.
कहाणी:
पहिल्या भागात दोन व्यक्ती प्रेमात पडतात. त्याचं लग्न होते आणि तेथे कहाणी संपते. मग आता दुसर्या भागात लग्नानंतरच त्यांचं आयुष्य कसं बनल असेल? इंटर्नल consequences असतील का?
असतील तरी त्यांचा स्वभाव (पहिल्या भागानुसार) बघता त्यांनी ते कसे handle केले असतील?
अश्या प्रश्नांचे उत्तरं घेऊन दुसरा भाग आलेला आहे. लेखक पहिल्या आणि दुसर्या भागाचेही हिमांशू शर्माच आहेत पण त्यांनी कोठेही conceptual अतिशयोक्ती केलेली नाही. नाहीतर असल्या प्रकरणात काहीतरी संदेश देणे- कौतुक मिळवणे- अवार्ड्स मिळवण्याची इच्छा बाळगणे असल्या विविध कारणांखाली "अती" म्हणजेच practically घडण्यास अशक्य असल्या बाबींचा समावेश केल्या जातो. मग या बाबींना कहानिशी-पहिल्या भागाशी वगेरे तारतम्य सांभाळण्यात दिग्दर्शकाची पकड सुटते.पण येथे लेखकाने असे काहीही घडू दिलेले नाही.
अभिनय:
तनु त्रिवेदी (कंगना राणावत) हिने अक्षरश: एकहाती आणि समर्थपणे तोलून धरलेला हा चित्रपट आहे.
तिचे मनुशी (आर माधवन) पटणे- न पटणे इत्यादी साकारताना पहिल्या भागातला तोच बिनधास्तपणा साकारलेला आहे. आणि तरीही नवेपणा देखील itroduce केलेला आहे. या (थोड्याफार) नवेपणाचा मला जाणवलेला मला जाणवलेला संदर्भ म्हणजे तिचे राजा अवस्थी (जिमी शेरगिल) सोबतचे काही प्रसंग. पण कदाचित दुसर्या भागात ती लग्न झालेली आणि पहिल्या भागात कुमारी असा फरक असल्यामुळे तो कोरडेपणा असावा. आर माधवन या व्यक्तीने काहीही जास्त संवाद नसतानाही फक्त expressions मनु शर्मा तोललेला आहे. आणि याचमुळे तो व्यवस्थित जमून आलेला आहे. पण तनु बर्याच प्रसंगात इतकी जमून आलेली आहे कि हा गडी नायक न राहता सहाय्यक व्यक्तिरेखा बनतो. पण हि तनुच्या (कंगनाच्या) अप्रतिम अभिनयाची एकप्रकारची असलेली पावतीच.
दिग्दर्शन:
आनंद राय यांनी सिक्वेल मधेही पहिल्या भागावर अवलंबून असणेपण सोडलेले नाही आणि तरीही नवीन प्रेक्षकांना तो समजेल कुठेही न समजल्यासारखा वाटणार नाही याची काळजी घेतलेली आहे हे वाटल्याशिवाय राहत नाही. भलेही संगीत हा कमर्शियल यशासाठीचा एक अतिशय महत्वाचा घटक यात कमी पडतो.पण ती कमी कहाणी अन दिग्दर्शकाचे कहाणी हाताळण भरून काढते.

पहिला भाग हा उत्तम होताच पण हा दुसरा भागही अप्रतिमरीत्या बनलेला आहे. एखादा सामान्य व्यक्ती चित्रपटगृहात तीन तास एन्जॉय करणे या हेतूने जातो. बाकी काहीही त्याचा हेतू नसतो. बर्याच काळानंतर या हेतूला पूर्णपणे खरा करणारी एक कलाकृती. मराठीत सिक्वेल्ची अपेक्षा इतकी नाही पण भविष्यात "मुंबई-पुणे-मुंबई" चा सिक्वेल कधी बनला तर तो असाच अर्थपूर्ण असावा अशी मला प्रामाणिक अपेक्षा आहे. हिमांशू शर्माचे अप्रतिम कहाणी आणि पटकथा लेखन अन कंगनाच्या अप्रतिम अभिनयासाठी मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा