गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४

पीके



पीके 

विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी हि जोडी म्हणजे यशाची हमखास खात्री अस समीकरण होत, मग जर यश मिळतेच आहे तर तीच टीम घेऊन नि तश्याच मनोरंजनात्मक पद्धतीने थोडाफार जनजागृतीचा प्रयत्न का करू नये या विचाराने याच जोडीचा नवीन चित्रपट म्हणजे पीके. राजकुमार हिरानीची कथा म्हणजे कल्पनाशक्तीचा असलेला सुयोग्य वापर आणि आणि त्याच कथेत उत्तमोत्तम पात्र अन त्या पात्रांची आपापसात असलेली अभिनयाची जुगलबंदी अस एक समीकरण बनलेलं होत. सर्किट-मुन्नाभाई-फरहान--राजू रस्तोगी-रांचो आणि व्हायरस असे अनेक उदाहरणं घेता येतील. शंतनू मोईत्रा चे संगीत आणि अभिजात जोशी चे कथा व पटकथा लेखन हा त्या सगळ्या यशस्वी कडीतील पाया. याही वेळेस पडद्यावर असलेले कलाकार जवळपास तेच असले तरी पडद्यामागची टीम पूर्ण तीच होती. कुटुंबासमवेत चित्रपट बघण्यासाठी जाता येईल असे केवळ दोन नावं हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. सुरज बडजात्या आणि राजकुमार हिरानी. याही वेळेस प्रयत्न पूर्ण असलेला जाणवतो पण भट्टी जमलेली नाही.
अभिनय:
आमिर खान त्याची अभिनय क्षमता यावर कुणाचा आक्षेप असण्याची शक्यताच नाही पण प्रत्येक अभिनेत्याला जीवनात एक कठीण भूमिका मिळते. माझ्यामते पीके हे अमीरखानच्या आता पर्यंतच्या करिअर मधील सगळ्यात वेगळी अन कठीण भूमिका.
आणि अमीर खान शब्दश: त्याच वेगळेपण आणि अभिनयक्षमता सिद्ध करतो या भूमिकेने. आता या अंतराळातील त्रांगड्यात
जनजागृतीच्या दृष्टीने सौरभ शुक्ला (तपस्वी) या व्यक्तिरेखेचा समावेश राजकुमार हिरानीने केलेला आहे पण.....
दिग्दर्शन:
हिंदी चित्रपट हे अंतराळ किंवा तत्सम बाबीवर जेंव्हा बनतात तेंव्हा हे हॉलीवूड नसल्यामुळे बजेट चा प्रश्न असतोच. हा सिनेमाही अगदी दिग्दर्शकच एक निर्माता असला तरी याला अपवाद ठरलेला नाही. पण राजकुमार हिरानीने खरोखर अमीर खानच्या व्यक्तिरेखेला हाताळण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.पण अभिजात जोशीबरोबर मिळून त्याने लिहिलेल्या पटकथेची गती इतकी मंदावते कि प्रेक्षक irritate होण्यापर्यंत. हि चूक अनवधानाने झाली असावी हे स्पष्ट आहे पण पटकथेची मंदावलेली गती या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर असर टाकणार हे नक्की. एक अत्युत्कृष्ट व्यक्तिरेखा चित्रपट तडीस नेत नाही हे प्रेक्षक नक्कीच जाणून आहेत.

मी आमिर खान च्या अभिनयासाठी मुखत्वे पीकेला अडीच (२ १/२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

एलिझाबेथ एकदशी (मराठी)



एलिझाबेथ एकदशी (मराठी)

सध्या गाजणाऱ्या होणार सून मी या घरची या मालिकेच्या लेखिका मोठ्या पडद्यावर उतरल्या असून मधुगंधा कुलकर्णी यांचा चित्रपट कथा लेखिका म्हणून पहिलाच चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
एलिझाबेथ हि एक सायकल अन घरच्या परिस्थितीमुळे तिला विकण्याची असलेली गरज, मग घरातल्या लहान मुलांचा त्या सायकलीला वाचवण्याचा प्रयत्न अन त्या प्रयत्नाभोवताल फिरणारी कथा म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
आजकालच्या काळात "मनोरंजनाचा एक तरतरीत डोस" या नावाखाली वास्तविकतेशी फटकून असलेल्या तद्दन निर्बुद्ध अन फुटकळ कथा आजकाल दिसतात. लेखिका मधुगंधा कुलकर्णी या स्वत:च एक निर्मात्या असून त्यांनी हरिश्चंद्राची factory फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या सोबत एक उत्तम कथा तीन तासात बांधलेली आहे. कौटुंबिक पातळीवर रंगवलेली एक अप्रतिम कथा असून श्रीरंग महाजन या बाल अभिनेत्याचा उल्लेख करावाच लागेल. या लहान मुलाने कथेच्या मागणीप्रमाणे अक्षरश: एकहाती तोलून धरलेली कथा आहे हि. आणि म्हणूनच बहुधा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्याच्यावर विसंबत त्याला कथेत
पूर्ण स्कोप दिलेला आहे.
एकूणच, गाणे नाही,मोठमोठे सेट्स/कलाकार नाहीत आणि कथाही एकदम हायफाय वगेरे वगेरे नाही पण एक वास्तविकतेवर अवलंबून असलेली कथा,इतकी वास्तविक कि चित्रपटातले पात्र वास्तविक जीवनात कुठे-ना-कुठे आपल्याला भेटल्याचे जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर.
मी या चित्रपटाला ४.५ * देईन ५ पैकी,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

किल-दिल


किल-दिल

श्री यशजी निवर्तल्यानंतर त्यांच्या यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीची धुरा नवीन सी इ ओ आदित्य चोप्राकडे आल्यापासून यशराज फिल्म्सचा चित्रपट दर्जा खालावला असून,कदाचित आजकालच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कमर्शियल एक्सलंसची कमी झालेली चिंता हे याचे महत्वाचे कारण असू शकते असा अंदाज प्रेक्षकांनी लावायला हरकत नाही असे वाटून जाते.
"जय हो" अन "किक" सारखे शब्दश: ठोकळे करोडे रुपये घेऊन जातात ते किल दिल सारख्याने चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करायला काहीच हरकत नसावी.
देव (रणवीर सिंग) आणि टूटू (अली जफर) या दोन अनाथ मित्रांची भय्याजी (गोविंदा) यांच्या अंडर घडलेली जीवनकथा म्हणजे किल-दिल. फक्त दोन हिरो घेऊन चित्रपट चालण्याचा जमाना संपून युग लोटले आहे याचा निर्माता आदित्य चोप्राने लावलेला योग्य अंदाज व कथेत परिणीती चोप्राचा केलेला समावेश.

दिग्दर्शन:
"साथिया" आणि "बंटी और बबली" चे दिग्दर्शक शाद अली यांचे बर्याच काळानंतर प्रेक्षकांना किल-दिल चे दिग्दर्शक म्हणून दर्शन घडते.

अजिबात चित्रपटातल्या कथा/पटकथा/अभिनेता/अभिनेत्री इ.इ. गोष्टींकडे लक्ष न देता फक्त मनोरंजनाचा एक तरतरीत डोस म्हणून चित्रपट बघणारा एक वर्ग बॉलीवूड मध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेला आहे. त्या वर्गाला डोळ्यापुढे ठेवून काढलेला एक चित्रपट म्हणजे किल-दिल.
किल-दिलला मी १/४ (पाव) स्टार देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

दावत-ए-इश्क



दावत-ए-इश्क

यशजी निवर्तल्यानंतर यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीचे प्रायोरिटीज बदलल्या असून आघाडीच्या चित्रपट कलाकारांना घेऊन "हुंडा" यासारख्या ज्वलंत विषयावर चित्रपट निर्मिती करण्याची रिस्क आदित्य चोप्राने घेतलेली आहे.मागील वर्षी आलेल्या यशराजच्याच आणि याच जोडगोळीला घेऊन असलेल्या "इशकझादे" या चित्रपटाचे दिग्दर्शक हबीब फैसल पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून दावत-ए-इश्क म्हणजेच मराठीत प्रेमाची मेजवानी.

कहाणी:
गुलरेझ कादिर उर्फ सानिया हि हैदराबाद मध्ये राहणारी एक मुस्लिम लग्नाळलेली तरुणी. पण हुंडा या गोष्टीमुळे लग्न जमत नसलेली.अतिशय हुशार व अमेरिकेत जाण्याची वगेरे स्वप्ने बाळगणारी. भारतीय संविधानातील हुंडाविरोधी कलम ४०९-A
चा दुरुपयोग करण्याचे ठरवून हुंडा तर द्यायचा पण हुंडा दिल्यावर ज्यांनी घेतला त्यांना धडा शिकवायचा या कलमाद्वारे असे ठरवते.मग तारिक हैदर उर्फ तारू व त्याच्या परिवाराला त्यांनी हुंडा मागितला म्हणून धडा शिकवायचे ती ठरवते. तिच्या या प्रयत्नाभोवताल कथा फिरते आणि ती त्याच्या व तो तिच्या प्रेमात पडून संपते.

दिग्दर्शन:

हबीब फैसल यांनी व्यवस्थित हाताळलेली कहाणी आहे अन्यथा हुंडा व भारतीय संविधानाचा प्रत्यक्ष उल्लेख यांचा परस्परसंबंध
जोडण्यात/समजण्यात/समजावण्यात/पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला असता तर प्रॉब्लेम झाला असता पण हबीब फैसल यांनी सगळ व्यवस्थित हाताळलं.

यशराज फिल्म्सची खासियत असलेले संगीत या सिनेमात बघावयास/ऐकावयास मिळत नाही. पण एक उल्लेखनीय कि जब तक है जान इतकी पातळी खालावलेली नाही.साजिद-वाजीद हे एकदम उत्कृष्ट नसले तरी "ठीक" पातळीवर आहेत. पण लेखक-पटकथा लेखक हबीब फैसल हे कथेची व पटकथेची मंदावलेली गती सावरण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.

एका आघाडीच्या हिंदी चित्रपट निर्मात्याचा आघाडीच्या कलाकारांना घेऊन असलेल्या हुंडा या भारतीय समाजजीवनातील प्रश्नावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला मी २* देईन.बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

रमा-माधव (मराठी)



रमा-माधव (मराठी) 

२० वर्षापूर्वी स्वामी या मालिकेतून "रमा" या भूमिकेने अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता दिग्दर्शक म्हणून त्याच कथेला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत. नुकतेच मागील वर्षी "प्रेम म्हणजे प्रेम असत" या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केल. आणि आता हा त्यांचा दुसरा चित्रपट.
रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांची लव्ह स्टोरी वगेरे इतिहासात प्रसिद्ध नाही (बाजीराव-मस्तानी सारखी) पण तरी त्यांनी या कथेला निवडलं आणि निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मृणालजींनी.
कहाणी:
रमाबाई व माधवरावांचा त्या कालच्या परंपरेप्रमाणे बालविवाह. मग वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी त्यांच्या शनिवारवाड्यातल्या आगमनापासून कथेची सुरवात आणि त्यांनी माधवरावांसोबत सदेह सती गेल्याच्या कथेवर शेवट. त्या दोघांच्या सहवासावर आणि सहवासातून फुलणाऱ्या प्रेमावर कथावस्तू टायटलनुसार डिपेंड असेल हि प्रेक्षकांची अपेक्षा लेखक व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी पूर्ण करू शकत नाहीत. पानिपतचा पराभव अन त्या युद्धात झालेली सदाशिवराव भाऊ अन विश्वासराव यांची हानी याचा समावेश कहाणीत आपोआप होतो. नव्हे करावाच लागतो कारण त्या शिवाय कहाणी पुढे सरकत नाही. पण सदाशिवराव भाऊंचा एक तोतया
पुढे माधवारावांपर्यंत पोचतो आणि सदाशिवराव असण्याचा दावा करतो या क्षुल्लक गोष्टीचा कहाणीत का समावेश केला असावा हे प्रेक्षकांना कळत नाही. राक्षसभुवनची लढाई अन निजामाविरुद्ध मिळवलेला विजय या गोष्टीला जरा जास्तच महत्व दिल्या जाऊन अमराठी प्रेक्षकांचा समज माधवरावांच contribution फक्त तितकच आहे कि काय अशी होईल अशी शंका येते. राजयक्ष्मा किंवा स्टमक कॅन्सर याची सरमिसळ होण्याइतकी दोन्ही संकल्पनाची सरमिसळ आहे.
अभिनय:
लहानगी रमा म्हणून श्रुती कार्लेकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. आणि दिग्दर्शकाने हे ओळखून तिला व्यवस्थित हाताळलेल आहे.प्रसाद ओक यांनी साकारलेल्या अप्रतिम राघोबा दादांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम भूमिका त्यांनी निभावलेली आहे राघोबदादांची. श्रुती मराठे (राधा हि बावरी फेम) हिचेही पार्वती बाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते.
पण आलोक राजवाडे यांचा माधवराव प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, हे नक्की.
दिग्दर्शन:
मृणाल कुलकर्णी यांनी पदार्पणातच प्रेम म्हणजे प्रेम असत या चित्रपटात एक मोठ्या वयाची लव्ह स्टोरी हाताळली होती. थोडक्यात एक वेगळा विषय. आणि हा विषयही थोडाफार वेगळाच. पण मुळात हा विषय इतिहासावर जरा जास्तच अवलंबून असल्यामुळे आणि त्या काळातली माहिती उपलब्ध नसल्यामुळे जो फरक पडायचा तो पडतोच. उदाहरणार्थ रमाबाईंच्या सती जाण्यावर जर शेवट करायचा होता तर सती कस जातात याची माहिती कदाचित उपलब्ध नसावी त्यामुळे शेवटी २-३ ओळीत प्रेक्षकांना फक्त सांगुत शेवट केलेला आहे. राघोबादादांच्या काळ्या जादुविषयक कथेला पुढे सरकवताना सुरवातीला काळ्या जादूला समर्थन मिळावे असा निर्माता/दिग्दर्शकाचा कोणताही हेतू नाही अशी डिस्क्लेमर मात्र मिळते.

मराठीतला एक वेगळा प्रयत्न आणि रमाबाई-माधवराव या इतिहासात दुर्लक्षित असलेल्या एका जोडीला लाइमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न असणार्या या चित्रपटाला मी २* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

पोष्टर बॉयज- (मराठी)





पोष्टर बॉयज- मराठी 

मराठी सिनेमांचा ट्रेंड निश्चितपणे बदलू लागला असून, श्रेयस तळपदे सारखे नव्या दमाचे निर्माते वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांना स्पर्श करून चक्क मराठीत सिनेमा बदल घडवू इच्छिताहेत आणि निर्माते श्रेयस तळपदे यांचा पोष्टर बॉयज हे त्याचं एक शानदार उदाहरण.श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या बॉलीवूड contacts चांगला उपयोग निर्मितीत व प्रसिद्धीत केल्याचं जाणवते. स्पष्ट उदाहरण म्हणजे लेस्ली लुइस यांनी चक्क मराठीत मराठी पद्धतीने केलेले संगीत निर्देशन आणि फराह खान,अनु मलिक आणि रोहित शेट्टी यांचा गेस्ट अपिअरन्स. यात चेन्नई एक्स्प्रेस मधला श्री शाहरुख खान यांचा गाजलेला डायलॉग रोहित शेट्टी कथेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अधोरेखित करतो. आणि कथेच्या एका महत्वाच्या वळणावर म्हणजे प्रेक्षकांना सत्यता पटते.

रोहित शेट्टीची एक गाजलेली पद्धत आहे, त्याच्या प्रत्येक सिनेमात शेवटी श्रेयनामावलीनंतर सिनेमा शूट करतानाच्या गमतीशीर किस्स्यांचा समावेश तो करतो. भलेही हि क्षुल्लक गोष्ट वाटते पण माउथ-टू-माउथ पब्लिसिटीच्या आजच्या जमान्यात हि गोष्ट या प्रेक्षकसंख्या व रिपीट प्रेक्षकवर्ग (ज्यांचे छोट्या शहरात चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस साठी खूप महत्व आहे). गोलमाल सिरीज अन सिंघम याद्वारे त्याने सिद्ध केलेली हि एक पद्धत आहे. तसाच प्रयत्न निर्माते श्रेयस तळपदे यांनी करून शेवटी एक गाणे (आयटम सॉंग) अन त्यांनतर असे शुटींग करतानाचे किस्से चक्क मराठीत प्रेक्षकांना दाखवलेत. आणि "मानो या ना मानो" याचा निश्चितच सकारात्मक परिणाम तिकीटबारीवर पडेलच पडेल.
कहाणी:
दिग्दर्शक समीर पाटील हेच चित्रपटाचे व पटकथेचे लेखक.अनिकेत विश्वासराव,दिलीप प्रभावळकर अन हृषीकेश जोशी या वेगवेगळ्या वयाच्या तीन व्यक्तींना एका सरकारी पोस्टर वर दिसलेली आपली इमेज, मग त्या इमेज पायी आलेले तिघांच्याही वैयक्तिक आयुष्यात वादळ आणि त्या वादळामुळे त्यांच्या आपापल्या समाजस्थानावर पडलेला असर आणि त्या तिघांचाही त्या वादळाविरुद्ध म्हणजे थोडक्यात सरकार विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा अन मिळवलेला विजय. मुळात कारण अन त्या अनुषंगाने "मुलगा-मुलगी समानता" या महत्वाच्या घटकाला प्रमोट करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. आणि हृषीकेश जोशीची पूर्ण भूमिकाच त्या अनुषंगाने घुसवण्यात आलेली आहे.
दिग्दर्शन:
लेखक व दिग्दर्शक समीर पाटील आणि विषय असा कि जर दुर्लक्ष झालं तर अश्लीलते कडे झुकण्यास जराही वेळ लागला नसता.
पण सांगण्यास कौतुक कि समीर पाटील ने मराठी मानसिकतेला केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थित कहाणीला हाताळलेले आहे.
संगीत:
हरिहरन व लेस्ली लुइस हि एक गाजलेली जोडी (कलोनियल कझिन्स हा band ) आहे. या जोडीपैकी लेस्ली लुइस यांनी मराठीत कदाचित पहिल्यांदाच दिलेले संगीत म्हणजे पोष्टर बॉयज.एकदम वेगळे नसले तरी व्यवस्थित संगीत दिलेले आहे त्यांनी.

मराठीतला एक अनोखा प्रयत्न अन अभिनय संगीत दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रात व्यवस्थित आणि मुले-मुली समानता या मुद्द्याला एका वेगळ्याच angle ने केलेला स्पर्श अश्या एकत्रित सगळ्या मुद्द्यांसाठी मी चित्रपटाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २७ जुलै, २०१४

किक



किक-हिंदी 

चांगल्या आघाडीच्या कलाकारांना घेऊन बनलेल्या हिंदी सिनेमाचा मागच्या काही दिवसात दुष्काळ पडलेला होता, सगळे दुसर्या 
फळीच्या कलाकारांचे सिनेमे येत होते, या गोष्टीचा फायदा घेऊन तिकीटवारीवर आपला अप्रत्यक्ष फायदा होईल हे समजून-उमजून 
सलमान खान यांचा नवीन आलेला एक चित्रपट म्हणजे किक.
मुळात किक म्हणजे काय? कारण आपण जेंव्हा कुणाला पंच करतो तेंव्हा जो आघात (फिजिकल) होतो त्याला किक म्हटल्या 
जाते पण हि किक एका सिनेमाचे टायटल होणे शक्य नाही. तर किक म्हणजे एक आंतरिक स्फूर्ती. आणि याचा जवळचा संबंध
मद्यप्राशन केल्यानंतर एक "किक बसते" असे म्हटल्या जाते त्या किकशी असावा.
कहाणी:
देवीलालसिंग उर्फ डेव्हिल या व्यक्तीची जाकलीन फर्नांडीस व रणदीप हुडा यांच्या सोबतीने भारतातून पोलंडथ्रू फिरलेली कहाणी म्हणजे किक.
अभिनय:
सगळ्यात आधी सलमान खानचे खरोखर कौतुक. त्याने या वयातही खूप नवीन गोष्टींचा प्रयोग या सिनेमात करून बघितला आहे.
अभिनयातही आणि गायनातही. हिमेश रेशमिया व यो यो हनी सिंग नेहि एकदम उत्कृष्ट वगेरे नसले तरी चांगले संगीत दिलेले आहे.पण "मित ब्रदर्स" या संगीतकार तिकडीचे खुद्द सलमानने गायलेले "hang over " या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल.
सलमान खानने गायलेले हे गाणे खरोखर उत्कृष्ट category त येते.
दिग्दर्शन:
साजिद नाडियादवाला हे एक निर्माता म्हणून आघाडीच नाव. त्यांनी किक द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. पण आधीच
गाठीशी असलेल्या अनुभवाचा स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कसा फायदा होतो याच उदाहरण म्हणजे या सिनेमाचा पटकथेसाठी
त्यांनी kelela चेतन भगतचा उपयोग.
सलमान खान आणि त्याने सर्व आघाड्यांवर स्वत:च्या वयाचा विचार न करता "जय हो" या तद्दन फालतू अपयशानंतर
kelelya प्रयत्ना साठी मी किक ला २.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर