रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

गोलीयो कि रासलीला-राम लीला

गोलीयो कि रासलीला-राम लीला 

प्रथितयश दिग्दर्शक,सहपटकथा लेखक,सह संगीतकार,सह कथालेखक संजय लीला भंसाली यांचा एक न जमलेला प्रयत्न म्हणजे रामलीला. रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांना एका सुंदरशा लव्ह स्टोरीने री-लॉंच करण्याचा एक न जमलेला प्रयत्न म्हणजे रामलीला. चित्रपटाच्या आधीच 'बेस्ड ऑन' रोमियो व ज्युलिएट अशी ठसठशीत सूचना पण प्रेम हि कन्सेप्ट सोडून त्यावर बेतण्याचा काय रोल हे कोणालाच काळत नाही. सह संगीतदिग्दर्शक असल्यामुळे (कि असूनही?) स्वत: संजय लीला भंसाली पण इस्माईल दरबारची पदोपदी आठवण करून देणारे संगीत. अगदी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटांच्या घेतलेल्या अनेक ट्युन्स.

थोडक्यात एक फसलेला प्रयत्न.

मी १ * देईन
-समीर

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

एक थी डायन


एक थी डायन

एक अप्रतिम हॉरर चित्रपट.कोणत्याही हॉरर चित्रपटाची हि खासियत असते कि भीती वाटावी पण तिरस्कार वाटू नये,
त्या अपेक्षेवर पुरेपूर उतरणारी एक कलाकृती. एकता कपूर (बालाजी टेलिफिल्म्स) आणि विशाल/रेखा भारद्वाजहे निर्माते  कानन अय्यर हे दिग्दर्शक,मुख्य भूमिकेत  इम्रान हाशमी,पण सांगण्यात हा आनंद कि कोणतेही शरीर प्रदर्शन नाही,स्त्री देहाचे दर्शन नाही,इव्हन "हाश्मी खासियत"
एक किसिंग सीन पण नाही. एक छोटासा आहे पण इतक चालायचच. 

हॉरर चित्रपट म्हटल कि अति मानवीय शक्ती  त्यांचा मानवीय जीवनावर पडणारा प्रभाव हे विशद करण्यात लेखक किती यशस्वी ठरलाय यावर कहाणीच भवितव्य ठरते.पण लेखक द्वयी मुकुल शर्मा  विशाल भारद्वाज स्वत:हे यात पूर्ण यशस्वी झालेत.  इम्रान हाश्मी हा एक जादुगार. आता त्याच्या जादुगारीत हातचलाखी किती  जादू किती हे मुख्य प्रश्न लेखक दिग्दर्शकाने मुद्दाम अनुत्तरीत ठेवलेत. आणि इम्रान चा अतिमानविय व्यक्तींमध्ये नंतर समावेश करून आपोआप याच उत्तर दिलेलं आहे

हा 'बोबो'(इम्रान हाश्मी) लहानपणापासून जादूत इंटरेस्ट असलेला.तो इतका इंटरेस्ट काइतकी प्रगती त्यात का/त्याच्या जवळच्या 
लोकांचा त्यात मदतरुपीप्रतीसाद का असे अनेक प्रश्न लेखक द्वयी  दिग्दर्शकाने नंतर निकालात काढलेले आहे. हा जो बोबो असतो तो नंतर किंवा सुरवातीपासूनच एका विच उर्फ फिमेल भूत च्या संपर्कात आपोआप येतो.
 निर्मात्याने सिनेमाच्या सुरवातीलाच टायटल्स च्या हि आधी हे सांगून टाकलंय कि भूत म्हणजे फिमेल्स असा गैरसमज पसरवण्यात वाढवण्यात त्याचा काहीही हेतू नाही हि सगळी कथा काल्पनिक आहेय़ विशेष सूचनेच महत्व नंतर पटते.

बॉलिवूड हॉरर चित्रपटात पार्श्व संगीत हा 'आत्मा' असतो.उदहरणार्थ फक्त एक 'खुट्ट' पण त्याची इंटेनसिटी चुकली तर तो प्रसंग हास्यास्पद बनायला वेळ लागत नाही. पण संगीतकार विशाल भारद्वाजने  ने ती जबाबदारी समर्थपणे निभवून सिनेमाला हास्यास्पद होण्यापासून वाचवलेलं आहे     
          . 
एका भूमिकेत कोंकणा सेन-शर्मा व हुमा कुरेशी ने हि छाप सोडलेली आहे 

बॉलीवूड चित्रपट सृष्टीत असलेला हॉरर चित्रपटाचा सुकाळ लक्षात घेता एक खरोखरच उत्तम चित्रपट असे मी म्हणेन मी याला चार 4* देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा

-समीर       

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

टीव्ही वरची धूळ

टीव्ही वरची धूळ
नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल
पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या 
अन त्या रोजच्या भांडणात 
आमच भांडण विरलं 

तीच वाढत वजन 
आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल 
पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची 
फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली 
अन आमच भांडण विरलं 

फिरायला जाऊया म्हणे 
गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली 
नेहमीचं भांडणाला कारण बनलं 
अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला 
त्या क्षीण प्रकाशात 
आमच भांडण विरलं 

आमच्या भांडणाच सदाहरित कारण 
तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट 
पुन्हा एकदा कारण बनल 
पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा 
तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी 
भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं

तिचा नि माझा 
स्वयंपाक घरातला प्रवेश 
दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल 
पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक 
त्यांनी सगळीकडे धाबे काढले 
त्या प्लान मध्ये 
आमचं भांडण विरलं 

-समीर  

बुधवार, ६ मार्च, २०१३

जगावेगळी ती

जगावेगळी ती

स्वप्न असतो एक अजोडसा ठेवा
कोणत्याही क्षणी आठवणीला एकटे सुटू देत नाही
स्वप्नांचे असते सगळ्यांशीच सख्य
हा आपला अन तो परका असा भेदभाव तिथे होत नाही
'ती' हा व्यक्तिविशेष
कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल
तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो
या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल
प्रेम हि कल्पना प्रत्येकच जण अनुभवतो
हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो
पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी
या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो
वेगळेपणा तिचा
कुठे नि कसा स्मरावा??
सावरणारा तिचा आडोसा
नेहमिपुरता हृदयात बंदिस्त असावा!!!
तिच्या आठवणींना कधीही अंत
असूच शकत नाही
पण नशिबापुढे आपण सगळेच पांगळे या वास्तविकतेला पर्याय
असूच शकत नाही
-समीर

रविवार, ३ मार्च, २०१३

The Attacks of 26-11

    



The Attacks of 26-11

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथे खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला.पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी १६६ बळी घेतलेत.हा हल्ला कसा झाला?नेमक तिथे काय घडल असेल? या जनतेच्या उत्सुकतेवर आधारित एक बॉलीवूड कलाकृती ते हि 
रामगोपाल वर्मासारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकाकडून.आजपासून काही वर्षांपूर्वी (पक्षी रंगीला/सत्या च्या काळात)रामगोपाल वर्माचा स्वत:चाही विश्वास नसेल कि तो एक सिनेमा दिग्दर्शित करेल ज्यात गाणे नसतील/डान्स नसेल/हिरोइन सुद्धा नसेल.पण केल.

सुमारे फक्त ६० मिनिटे म्हणजे २ तासाचा सिनेमा पण 'based on true story' अस सिनेमाच्या अगदी सुरवातीलाच सांगून टाकल्यामुळे तितकसं जनतेला काहीच वाटत नाही.आमिर अजमल कसाब च्या २६-११ ते फाशी या प्रवासासभोवताल पूर्ण सिनेमा फिरतो.मूळ प्रश्न,आजही,माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा कि (का?). हे हल्ले का केले गेले?इतक पद्धतशीर planning करून? तर या मुख्य  प्रश्नाच उत्तर उत्तर दिग्दर्शकाने (त्याच्या पद्धतीने) दिलंय . दाखवण्यासाठी (म्हणजे भारत विरोध धर्म वाचवणे इत्यादी)काहीही  असल तरी  खर  कारण हे त्या गटाचं (संमिलीत सर्वच मंडळींच्या गटाचं) पद्धतशीरपणे  केल्या गेलेलं "ब्रेन वॉशिंग".'आका' या व्यक्तीचा उल्लेख आहे पण या आका शब्दाआड कुणीही कुशल ब्रेनवॉशरअसू शकतो. मुबई हल्ल्याने सुरवात झालेला चित्रपट कसाब ला पुण्याला येरवडा जेल मध्ये झालेल्या फाशीवर संपतो.नाना पाटेकर याने त्या काळात मुंबईचे joint पोलिस कमिशनर असलेल्या राकेश मारिया यांची भूमिका केलेली आहे.संदीप जैस्वाल याने अजमल आमिर कसाब याची.दोघंही 'सूट' होतात आपापल्या भूमिकात.

कोणत्याही चित्रपटाला रेटिंग हे त्या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर अवलंबून असते.पण इथे हा भागच पूर्णत:जाणीवपूर्वक दुर्लक्षित असल्यामुळे मी या चित्रपटाला रेटिंग-पूर्ण ५* देईन एकदा मुंबई हल्ले समजून घेण्यासाठी कोणताही पूर्वग्रहदुषित 'माइंडसेट'  बाळगता नक्की बघावा असा एक चित्रपट.
-समीर