रविवार, २९ मार्च, २०१५

Cinderella



Cinderella-

Hollywood film makers are excellent when it is a question of effective execution of a fantacizing story on screen. Well, we read in our childhood regarding this romantic fantasy story of Cinderella which became in a shape of movie, real characters etc. and came to meet viewers on big screen. One thing which is required to mention that there are so many people who are interested in this story as almost all the rows are fully occupied in a multiplex where I have seen this film which was unexpected. But the original story by Charles Perrault is I found more fantasizing than this on screen story. This must be due to English accent difference which is much more difficult to digest in a Hollywood movie than reading in a book. In this story, in familiar Hollywood style, the cruelty of a step mother towards Cinderella is shown but as we are Bollywood movie lovers we found it most of the times something like “reading between the lines” or “ left for our assumption”. Suppose Cinderella is made in Bollywood director could have spent one and half hour out of the three to explain the cruel behavior of Cinderella’s stepmother towards her. Here this cruelty seems based on audience understanding. This seems due to time boundation of director have in Hollywood. As we find happy ending in required in almost all fantasizing stories, here magic is included as shown in original story. 

“have Courage, be Kind and have faith in little bit of Magic” this is the most beautiful line which I really liked in this movie. We find it practically true in our life while dealing with many people in our day-to-day life.
A fantasizing on–screen story depends on it’s on screen execution. As the story was dependent on a originally published one, which is either liked or un-liked by most of the people if it created issue in any manner during execution as a drama in screen it will lead it to a failure. Kenneth Branagh as a director was successful in this on screen evolution of this story which is popular all over the world. I will give this film 4* out of 5 for efforts of director/writer and lead actress rest up-to viewers.


-Sameer

रविवार, १ मार्च, २०१५

दम लगा के हैशा


दम लगा के हैशा

यशराज फिल्म्सची धुरा आदित्य चोप्राने घेतल्यापासून आदित्य चोप्राने या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात चित्रपटनिर्मितीच्या तंत्रात अनेक स्वागतार्ह बदल केले असून यशराज फिल्म्स आता संगीत विरहित आणि पूर्णत: कहाणीवर अवलंबून असलेल्या आशयगर्भ चित्रपट निर्मितीत आली असून या क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व आधीच्याच वेगळेपणानुसार ठसे उमटवीत आहे हे हा चित्रपट बघितल्यावर रसिकांना जाणवते हे मात्र नक्की.
आर्ट फिल्म ज्याला मराठीत कदाचित आशयगर्भ असे म्हणूया त्यात कहाणी आणि त्या कहाणीत पात्रांना असलेले दिग्दर्शन यांना अनन्यसाधारण महत्व असते. ते संबंधित पात्र जर कहाणीला नीट प्रेक्षकांपर्यंत सादर करू शकले नाहीत तर असे चित्रपट कदाचित समीक्षकांच्या दृष्टीने यश मिळवतातहि पण पदरमोड करून तिकीट काढणारे प्रेक्षक मात्र फारसं चांगले बोलत नाहीत आणि कमर्शियलि सपशेल अपयशी ठरतात असे प्रयत्न. यशराज फिल्म्सने याची काळजी घेतलेली असल्याचे बर्याच ठिकाणी जाणवून जाते, आणि तितके अनुभवी असल्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षितही आहे.
याचे सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे कास्टिंग अर्थात पात्र निवड. हि पात्र निवड naturally कहाणीच्या अपेक्षेनुसारच असली तरीही ती जर चुकली असती तरीही नक्कीच एक ढिसाळ प्रयत्न आपोआप बनला असता हा.पण आदित्य चोप्राने यात नक्कीच अनुभवाचे योग्य analysis करून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत.
कहाणी:
नव्वदीच्या दशकातली कहाणी ज्यात नायक एक सामान्य मुलगा असून त्याचे ऑडियो कॅसेट्सचे दुकान असून एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला व्यक्ती असून त्याचे त्याच्या मनाविरुद्ध जुळवलेले अरेंज marriage आणि शेवटी झालेला सगळ्या गुंत्याचा
शेवट अशी एक एकदम यशराजच्या इमेजपेक्षा वेगळी कहाणी असून कदाचित काही विशिष्ट वयोगटात जाणवणाऱ्या काही ज्वलंत पण सार्वत्रिक नसणाऱ्या पण असणार्या आणि हे आपण कधी ना कधी नक्कीच अनुभवलेल्या प्रश्नाला हात घालणारी हि एक कहाणी.
अभिनय:
प्रेम तिवारी (आयुष्मान खुराणा) हा तो सामान्य तरुण. दहावीही नसलेला आणि वडलांचे ऑडियो कॅसेट्सचे दुकान इमाने इतबारे चालवणारा. आयुष्यमान खुराणाची अभिनय निवड किंवा रोल करण्याची निवड (मिळालेल्या कहाण्यांपैकी) हि उत्तम असते हे विकी डोनर आणि हवाईझादा या उदाहरणामुळे प्रेक्षक नक्कीच समजून असतील. पण त्याने निवडलेल्या या भूमिकेमागे निर्माता आणि त्याचे वेगळेपण नक्कीच अवलंबून असतील असे वाटल्याशिवाय राहत नाही. कारण हिरोगिरी अर्थात प्रेम-नृत्य-फायटिंग इत्यादी काहीही करणारा नायक हा नाही. दहावी न झालेला एक सामान्य तरुण रंगवताना त्याचे आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न रंगवताना आणि सोबतच लग्नाळलेला आणि लग्नासाठी काही विशिष्ट अपेक्षा बाळगणारा आणि त्या अपेक्षांची practicality पूर्णत: दुर्लक्षित करून फक्त खंडीभर अपेक्षा बाळगणारा एक निम्न मध्यमवर्गीय तरुण उत्कृष्टपणे उभा केलेला आहे आयुष्यमान खुराणाने.
संध्या वर्मा (भूमी पेडणेकर) हि मुख्य नायिकेच्या भूमिकेत असून वाढलेले वजन आणि त्या वजनामुळे आपोआप संयमित झालेल्या अपेक्षा अशी एक वेगळीच दोलायमान व्यक्तिरेखा साकारताना तिने खरोखर तिचे वेगळेपण जाणवून दिलेले आहे.
दिग्दर्शन:
भेजा फ्राय (१ आणि 2)चे लेखक शरत कटारिया दम लगा के हैया मध्ये रसिकांना दिग्दर्शक म्हणून भेटतात. आणि दोन्ही भेजा फ्राय इतकेच त्यांचे वेगळेपण आणि अस्तित्व जाणवून देतात. वास्तविक बघता हि कहाणीही थोडी विचित्र categoryत येते कारण सामान्य मुलीना लग्नाआधी आणि बायांना लग्नानंतर वजनावर केलेली गमतीतलीहि टिप्पणी चालत नाही हे आपल्याला जाणवते.पण खरोखर कुठेही प्रेक्षकांना पूर्ण चित्रपटात अशी pratyaksh टिप्पणी नायिकेवर जाणवत नाही आणि जाणवण्याइतपत अप्रत्यक्ष संदर्भ मात्र जाणवतात. मान्य असो वा नसो हा कंट्रोल दिग्दर्शकाचाच आणि याच महत्व बघताना जाणवते.
बरेचदा आपण बर्याच विजोड जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात बघतो. कोणत्याही प्रकारची शारीरिक compatibility नसलेल्या. आपण लक्ष देत नाही पण लक्ष दिलं तर प्रश्न पडतो कि या जोड्या टिकल्या कश्या? या "टिकल्या कश्या" ला काहीही उत्तर नसते आणि शोधूही नये पण बनतात कश्या याचे उत्तर मिळू शकते याचा अंदाज या चित्रपटाने लागतो. असा अंदाज प्रेक्षकांना लागावा आणि कहाणी नीटपणे पडद्यावर उतरावी हि निर्मात्याची/लेखकाची अपेक्षा दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची जोडी पूर्ण करते आणि दिग्दर्शन आणि अभिनयासाठी मी चित्रपटाला (४) चार * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

हवाइझादा



हवाइझादा

विमान हा शब्द आठवायला सांगितला तर आपल्याला काय क्लिक होते?? पुरातन काळात पुष्पक विमान ज्यात प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येला परतले पण हे जरा अतीच पुरातन झाल पण थोडं पुढे आल्यास राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला १९०३ साली आणि मग त्या विमानाला पुढे सुधारत सुधारत आजच विमान बनलं असे आपल्याला शाळेत वगेरे समजल्याच आठवते. पण राईट ब्रदर्सने विमान शोधायच्या आठ वर्षे आधी पंडित शास्त्री आणि शिवकर तळपदे या महाराष्ट्रीय व्यक्तींनी विमान यशस्वीपणे शोधले होते पण राज्यकर्त्या इंग्रजांनी हे कधीच मान्यता देऊन जगासमोर आणले नाही. त्यामुळे त्यांना त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. हि कहाणी जनतेला/जगाला कळावी या हेतूने लेखक-पटकथा लेखक विभु पुरी नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत "हवाइझादा"
कहाणी:
शिवकर तळपदे हा एका जमीनदाराचा सुपुत्र, काहीही करत नसलेला, अक्षरश: चौथीत आठ वर्ष वगेरे दाखवून त्याची बौद्धिक पातळी हिन हे सिद्ध करण्याचा विभु पुरीचा प्रयत्न पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो. वास्तविक बघता हाच जर हेतू होता तर त्याला पूर्णत्वास नेण्याचे अनेक पर्याय होते पण हा पर्याय जमलेला नाही.
हा शिवकर तळपदे घरातला काहीही करण्यास असमर्थ व्यक्ती पुढे योगायोगाने पंडित शास्त्रींच्या (मिथुन चक्रवर्ती) संपर्कात येतो.
शात्रीजींच्या संपर्कात येउन त्याच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळते. पुढे शास्त्रीजींचा मृत्यू होतो अर्थात या शिवकरच्या कृत्याने मानसिक धक्का बसून. मग शास्त्रीजींचे अपूर्ण स्वप्न विमान बनवण्याचे ते शिवकर पूर्ण करून विमान बनवण्यात यशस्वी होतो.
दिग्दर्शन:
विभु पुरींचे दिग्दर्शन लाभलेले आहे पण त्यांचे नवागतपण खूप ठिकाणी कळून येते. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी चित्रपट दिग्दर्शन स्वतंत्रपणे करण्याआधी सहायक दिग्दर्शक किंवा तत्सम एखादी भूमिका निभवायला हवी होती अनुभव मिळवण्यासाठी असे वाटून जाते. बर्याच गोष्टी खुपतात कथेतल्या, काही उदाहरणे घेऊ-१.चौथीत आठ वर्ष नापास असलेला मुला "पारा" चे दोन अर्थ शिकवण्याइतपत हुशार कसा बनतो?२. पंडित शास्त्रींचा मृत्यू त्याच्यामुळे जर होतो तर या महत्वाच्या बाबीला पुढे पूर्णपणे दुर्लक्षित कसे काय गेलेले आहे?३. gasoline चा सोर्स त्याला कुठून व कसा मिळतो? ४.पल्लवी शारदा (सितारा) सोबतच्या त्याच्या प्रेमप्रकरणात त्याला असं ठरवल्यासारख यश कसं मिळते? काहीही न करता??५.चित्रपटात देशभक्ती दाखवण्यासाठी लोकमान्य टिळकांचा समावेश दिग्दर्शकाने केलेला आहे मग त्याचे aftereffects नंतर
काय घडले हे दाखवण्याइतपत भान का बाळगले गेलेले नाही?अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या अगदी इरिटेट करतात मुळात विषय कितीही चांगला असला तरी एखाद्या हिंदी चित्रपटाला कमर्शियलि यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टीना सांभाळावे लागते. हिंदीत तमिळ-तेलगु सारखी प्रेक्षक संख्या कन्फर्म नसल्यामुळे एका हिंदी चित्रपटाला सगळंच बघावं लागते आणि हे आता विभु पुरीला समजेल पण त्याला समजण्यासाठी एका चांगल्या विषयाला वाहिलेल्या चित्रपटाचा बळी मात्र जाईल.
मी हवाईझादाला पाव (१/४*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा
-समीर

शनिवार, २४ जानेवारी, २०१५

बेबी



बेबी 

बेबी हे टायटल वाचून आधी काय आठवते? जर तुम्ही चित्रपट रसिक असाल तर साजिद खानचा हे बेबी नावाचा एक तद्दन फुटकळ सिनेमा जो मी चित्रपटगृहात बघितल्यावर घरी टीव्ही वरही कोणाला बघू दिला नाही. बेबी बघायला जाताना त्याच इम्प्रेशनने जात असाल तर सगळ्यात आधी हे क्लियर करून घ्या कि तसे काहीही नाही. बेबी हे टायटल असूनही अजिबात फुटकळपणा नाही. हिरोइन
नाही व संगीतही नाही. पण हीच सगळ्यात मुख्य व उत्तम गोष्ट आहे.
कथा:
भारतीय सेना अन सेनेतले सिक्रेट एजंट्स हा एक मोठा विषय आहे पण ते एजंट्स विविध मोहिमा पार पाडताना सगळ ground level execution कसे करत असतील हा आपल्या चित्रपट निर्मात्यांचा एक आवडता विषय. याच विषयला घेऊन नीरज पांडे हा नवीन चित्रपट घेऊन आलेला आहे. भारतीय सेना आणि सेनेतले सिक्रेट एजंट्स यांच्यावर असलेली कहाणी म्हणजे पाकिस्तानचा उल्लेख हा अपरिहार्यच आणि तसा तो होतोच. पण पाकिस्तानवर टीका करतानाही भारतीय चित्रपट निर्माते आजवर मुसलमान धर्माचा उल्लेखही टाळायचे. पण बेबी मात्र मुस्लिम धर्मावर प्रत्यक्ष टीकेला वाट करून देऊन कदाचित वाद ओढवून घेतो आहे कि काय अशी शंका येते कारण डायरेक्ट डायरेक्ट मुस्लिम धर्म अन त्याचा दहशतवादाशी संबंध यावर प्रकाश पडतो.
दिग्दर्शन:
नीरज पांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या हाताळलेला एक विषय आहे हा. नीरज पांडे हे नाव आधीही आपल्याला माहीत आहे, अ वेनस्डे आणि स्पेशल २६ मुळे. पण बेबी खरोखर एक वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. भारतीय सिक्रेट सर्व्हिस अन त्यांच्या मोहिमांवर पाकिस्तानथ्रू मुस्लिम धर्मावरील टिप्पण्या त्यांनी व्यवस्थित हाताळलेल्या आहेत.
लेखक व दिग्दर्शक स्वत: नीरज पांडे हेच आहेत आणि धार्मिक वितंडवाद लागला नाही तर कदाचित हा एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून भविष्यात गणल्या असे वाटून जाते.
एका वेगळ्याच कथेवरील अक्षय कुमार चा अभिनय आणि नीरज पांडेच्या लेखन-दिग्दर्शनासाठी मी बेबी ला साडेतीन (३ १/२*) स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, १७ जानेवारी, २०१५

आय ["I"]



आय ["I"]

दक्षिण भारतीय चित्रपट हे बघायला आपण जातो तेंव्हा हे लक्षात घ्यायलाच हवं कि कितीही ठिसूळ कथा असली तरी त्या कथेला साकारण्यात इतकी मेहनत घेतलेली असते कि ती मेहनत पदोपदी जाणवते अन रसिक त्या मेहनतीवरच फिदा होतात.आता दिग्दर्शक शंकर जो आधीही आपल्याला नायक आणि अपरिचित मुळे पुरेसा माहित आहे तो एक नवीन आणि वेगळीच कथा घेऊन आलेला आहे.["I "].दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे नायक प्रधान हे निश्चित आणि आय हे त्याला अपवाद नाही पण मुख्य अभिनेता विक्रमचे करावे तितके कौतुक कमीच आहे.कथा-पटकथा स्वत: शंकर ने subha च्या साथीने लिहिलेली आहे आणि बघणार्याला वास्तविकतेशी फारकत जाणवली तरी दक्षिण भारतीय चित्रपटात मुबलक आढळणारी cinematic लिबर्टी विचारात घेत तितके अपेक्षितच आहे. मुळात आय ["I "] हे विचित्र टायटल का असा प्रश्न रसिकांना खासकरून हिंदी रसिकांना पडणे अगदी साहजिक आहे पण ["I "] म्हणजे influenza किंवा तत्सम एक व्हायरस आणि त्या व्हायरस मुळे घडणारी कथा. पण हे प्रेक्षकांना शेवटच्या काही मिनिटात कळते. आय ची उकल लवकर होऊ नये हे तत्व शंकर ने कटाक्षाने पाळल्याचे जाणवते. पण चित्रपटगृहाच्या बाहेर जेंव्हा प्रेक्षक पडतो तेंव्हा मध्यंतरापर्यंत जाणवणारी "काहीही न समजल्याची" भावना शेवटी उरत नाही.हेच दिग्दर्शक आणि लेखक शंकरचे यश.

कथा:
लिंगेसन उर्फ लि (विक्रम) हा एक जिम ट्रेनर. मिस्टर तमिलनाडू वगेरे. त्याला आवडणारी एक मोडेल दिया (एमी jackson ) . अपघाताने त्याच्या आयुष्यात झालेली दियाची एन्ट्री. तिला मदत करण्यासाठी त्याची झालेली modelling मधली एन्ट्री.या फिल्ड मध्ये काळात नकळत बनलेले शत्रू. या शत्रूंच्या चक्कर मध्ये झालेली आयची त्याच्या शरीरातली एन्ट्री आणि मग त्याने दिलेला लढा. हि सगळी कथा अनेक flashback च्या वळणांनी फिरते, आणि मध्यंतरापर्यंत काय सुरु आहे याचा थांगपत्ताही प्रेक्षकांना नीटसा लागत नाही.पण मध्यंतरानंतर सगळ हळू-हळू क्लियर होत जाते.या आय अन त्यापासून होणार्या नुकसानाचा लीने घेतलेला सूड त्याच्या वर्तमानकाळाशी को-रिलेट करून कथा संपते.


अभिनय:
विक्रम या तमिळ अभिनेत्याचे कौतुक करावे तितके कमी आहे इतकी अप्रतिमरीत्या लीची भूमिका त्याने उभी केलेली आहे.
सुरवातीला त्याच्या स्ट्रगलच्या काळात म्हणजे तो जिम ट्रेनर असताना त्याचे मिस्टर तामिळनाडू बनण्यासाठी चाललेले प्रयत्न,
त्यात त्याने बनवलेली बॉडी. आता बॉडी आमच्या सलमानकडे पण आहे पण त्याचे presentation जे करणे वयाच्या अट्ठेचाळीसाव्या वर्षी विक्रमने साध्य केले हे खरोखर कौतुकास्पद. हि झाली सुरवातीची गोष्ट, पण नंतर आयचे आगमन झाल्यावर त्या बॉडी-बिल्डरची पूर्ण शेप-चेहरा-आवाज बदलतो. हा मेक-अप जरी असला तरी कमल हसन सारख्या सराईतपणे त्याने त्या मेकअप ला बाळगून त्यातूनही
व्यवस्थित मांडणी केलेली आहे. मुळात असा व्हायरस असू शकतो का? असेल तर त्याच transportation इतकं सोपं असू शकते का? हा जर अस्तित्वात असलाच तर त्याच अस्तित्व आजपर्यंत लक्षात न येत तो गुलदस्त्यात कसा होता? इतका सहजासहजी तो मंडळीना मिळाला कसा? आणि सगळ्यात महत्वाचं, एका डॉक्टर ने त्याचं लीच्या शरीरातलं अस्तित्व शोधल्याच कथेत दाखवल,मग इतका हुशार तो डॉक्टर होता तर त्याने त्याची काट म्हणजे औषध/लस इत्यादी का शोधली नाही? हे प्रश्न तमिळ cinematic लिबर्टी विचारात घेऊन सोडून द्यावे लागतात,हिंदी प्रक्षकांना.


संगीत:
ए आर रहमानने मोजण्यापेक्षा जास्त वेळा निराशा केल्यावर या वेळेस अगदी उत्कृष्ट नाही पण श्रवणीय संगीत दिलेले आहे.
आणि तमिळ चित्रपटात असलेली एकूणच पातळी बघता त्याने दक्षिणी दृष्टीकोनातून उत्तम कामगिरी बजावलेली आहे.


विविध चित्रपटात आवडण्याचे विविध कारणे असतात, या चित्रपटात विक्रमने घेतलेली मेहनत, त्याची एकूणच अभिनयक्षमता लक्षात घेत त्याच्यासाठी मी चित्रपटाला साडे तीन (3 १/२*) देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, ४ जानेवारी, २०१५

लोकमान्य-एक युग पुरुष




लोकमान्य-एक युग पुरुष

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव ऐकलं कि काही गोष्टी आठवतात १. तिसरी किंवा चौथीत त्यांच्यावर असणारा एक धडा
२."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा डायलॉग ३."सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा त्यांचा केसरीतला अग्रलेख आणि४. मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही हि शाळेत कुठेशी ऐकलेली गोष्ट.
याउप्पर नवीन पिढीला त्यांच्याबद्दल काहीही माहित नाही आणि म्हणूनच दिग्दर्शक ओम राउतने सुरवातीलाच हे स्पष्ट केले आहे कि नवीन पिढीला त्यांच्या विचारांची ओळख व्हावी हा मुख्य उद्देश सिनेमाचा आहे.
लोकमान्य टिळक त्यांचे स्वराज्यासाठी चालणारे विविधांगी प्रयत्न समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत आधी असलेली मैत्री आणि पुढे झालेले तात्विक मतभेद त्यांचे खाजगी जीवन-समाजजीवन अश्या विविध कोनांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाला स्पर्श करण्याचा चित्रपटाचा उद्देश नक्कीच सफल होतो हे मात्र नक्की.
पुणे शहरात असलेले लोकमान्यांचे वास्तव्य-पुण्यात झालेले प्लेग या रोगाचे थैमान-rand या इंग्रज अधिकार्याची या काळात झालेली नियुक्ती-प्लेग या कारणाखाली त्याने केलेले अनन्वित अत्याचार आणि शेवटी चाफेकर बंधूंनी त्याची केलेली हत्या
हि कहाणी आपल्यापैकी अनेकांना माहित असेल पण या चाफेकर बंधूंना लोकमान्य टिळकांची फूस होती/समर्थन होते हे बर्याच
मंडळींना माहित नसेल.पण होते आणि कदाचित लोकमान्य टिळक हे चाफेकर बंधूंचे "ब्रेन" हा कट रचण्यात होते हे हि बर्याच लोकांसाठी नवीन असेल.पण होते.
अभिनय:
सुबोध भावे या अभिनेत्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची भूमिका केलेली आहे आणि सांगण्यास आनंद कि तो अक्षरश: जगलेला आहे हि भूमिका. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्याने प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचवलेत. त्यांचे गो.ग.आगरकरांशी असलेले तात्विक मतभेद,समाज सुधारणेला असलेले समर्थन पण त्या अनुषंगाने धर्मात ढवळा-ढवळ करण्यास असलेला विरोध, त्या काळच्या जातीव्यवस्थेतील निम्न घटकांनी मंदिरात जाण्यास असलेली बंदी झुगारून देवाच्या चरणी त्यानाही जागा मिळावी यासाठी लोकमान्यांनी केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची रचना एक ना दोन असे अनेक प्रसंग होते ज्यात सुबोध भावे हा लोकमान्य वाटला नसता कदाचित पण सगळीकडे तो लोकमान्य टिळक वाटतो. त्यांची सकारात्मक विचारसरणी साकारण्यात पूर्णतया यशस्वी झालेला आहे तो."कितीही संकट आली आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय देऊन मी उभा राहीन"
वरवर बघता अगदी साधा भासणारा हा लोकमान्यांचा एक डायलॉग पण सुबोध भावे कोणतीही अतिशयोक्ती न करता हा त्यांचाच हे साकारण्यात यशस्वी होतो.
शाहू-फुले-आंबेडकर यांपेक्षाही वेगेळे मोठे लोक महाराष्ट्रात होऊन गेले हि माहिती नवीन पिढीपर्यंत अगदी समर्पकरीत्या पोचवणाऱ्या या चित्रपटास सुबोध भावे(अभिनय) -(दिग्दर्शक) ओम राउत-(लेखक) कौस्तुभ सावरकर यांच्या एकत्रित प्रयत्नांसाठी साडेचार (४.५ *) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

Night at the Museum: Secret of the Tomb



Night at the Museum: Secret of the Tomb

Hollywood film makers are familiar of making imaginative extra human concepts real with the help of technology and other extra-ordinary back office regiments. Night at the Museum is an example of working of Hollywood moviemakers for making a conceptually unreal thing to a real thing. That too the titled film is the third sequel of this concept and producer encouraged for the third one means first and second one must be appreciated all over the world which finally there must turned out to be a handsome box-office collection. This is the third part in which the secret of Tomb kept in that museum which is responsible for transformation of all statues at night gets revealed and Larry (Ben Stiller) helps to get the final resolution to solve the mystery of that Tomb.

Acting:
Ben Stiller is the common point-hero-main character in all the three films in these sequels.
He is basically a night watchman in a museum where all the statues etc turns into a real thing every night. Although this concept seems a thing to laugh for a typical Indian movie watcher but Ben Stiller really worked hard to make this story seem a real one for the viewers. All the watchers involves into the story upto a great extent while watching that they start to assume this unreal thing as a real thing. Other back office aspect like screenplay-story-cinematography- make up-“etc” forces to trust the story. Although Ben Stiller must be appreciated for this but one should not ingnore the efforts of director Shawn Levy for all three parts. He also took many efforts for the success and they got paid off.

A museum where all the statues etc. Transforms to a real thing every night and Larry (Ben Stiller) rules them every night, takes their care, as their traditions are different from each other by centuries, he found a common resolution for all their problems. He gave them all a suitable work so that they can spend their living time and Larry can breathe at night.

I personally liked and loved the concept and system of makers to deal with the concept in all the three parts hence I will give this 5* as I appreciated this very much, rest depends on individual viewers.

-Sameer