लोकमान्य-एक युग पुरुष
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव ऐकलं कि काही गोष्टी आठवतात १. तिसरी किंवा चौथीत त्यांच्यावर असणारा एक धडा
२."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा डायलॉग ३."सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा त्यांचा केसरीतला अग्रलेख आणि४. मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही हि शाळेत कुठेशी ऐकलेली गोष्ट.
याउप्पर नवीन पिढीला त्यांच्याबद्दल काहीही माहित नाही आणि म्हणूनच दिग्दर्शक ओम राउतने सुरवातीलाच हे स्पष्ट केले आहे कि नवीन पिढीला त्यांच्या विचारांची ओळख व्हावी हा मुख्य उद्देश सिनेमाचा आहे.
लोकमान्य टिळक त्यांचे स्वराज्यासाठी चालणारे विविधांगी प्रयत्न समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत आधी असलेली मैत्री आणि पुढे झालेले तात्विक मतभेद त्यांचे खाजगी जीवन-समाजजीवन अश्या विविध कोनांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाला स्पर्श करण्याचा चित्रपटाचा उद्देश नक्कीच सफल होतो हे मात्र नक्की.
पुणे शहरात असलेले लोकमान्यांचे वास्तव्य-पुण्यात झालेले प्लेग या रोगाचे थैमान-rand या इंग्रज अधिकार्याची या काळात झालेली नियुक्ती-प्लेग या कारणाखाली त्याने केलेले अनन्वित अत्याचार आणि शेवटी चाफेकर बंधूंनी त्याची केलेली हत्या
हि कहाणी आपल्यापैकी अनेकांना माहित असेल पण या चाफेकर बंधूंना लोकमान्य टिळकांची फूस होती/समर्थन होते हे बर्याच
मंडळींना माहित नसेल.पण होते आणि कदाचित लोकमान्य टिळक हे चाफेकर बंधूंचे "ब्रेन" हा कट रचण्यात होते हे हि बर्याच लोकांसाठी नवीन असेल.पण होते.
अभिनय:
सुबोध भावे या अभिनेत्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची भूमिका केलेली आहे आणि सांगण्यास आनंद कि तो अक्षरश: जगलेला आहे हि भूमिका. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्याने प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचवलेत. त्यांचे गो.ग.आगरकरांशी असलेले तात्विक मतभेद,समाज सुधारणेला असलेले समर्थन पण त्या अनुषंगाने धर्मात ढवळा-ढवळ करण्यास असलेला विरोध, त्या काळच्या जातीव्यवस्थेतील निम्न घटकांनी मंदिरात जाण्यास असलेली बंदी झुगारून देवाच्या चरणी त्यानाही जागा मिळावी यासाठी लोकमान्यांनी केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची रचना एक ना दोन असे अनेक प्रसंग होते ज्यात सुबोध भावे हा लोकमान्य वाटला नसता कदाचित पण सगळीकडे तो लोकमान्य टिळक वाटतो. त्यांची सकारात्मक विचारसरणी साकारण्यात पूर्णतया यशस्वी झालेला आहे तो."कितीही संकट आली आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय देऊन मी उभा राहीन"
वरवर बघता अगदी साधा भासणारा हा लोकमान्यांचा एक डायलॉग पण सुबोध भावे कोणतीही अतिशयोक्ती न करता हा त्यांचाच हे साकारण्यात यशस्वी होतो.
शाहू-फुले-आंबेडकर यांपेक्षाही वेगेळे मोठे लोक महाराष्ट्रात होऊन गेले हि माहिती नवीन पिढीपर्यंत अगदी समर्पकरीत्या पोचवणाऱ्या या चित्रपटास सुबोध भावे(अभिनय) -(दिग्दर्शक) ओम राउत-(लेखक) कौस्तुभ सावरकर यांच्या एकत्रित प्रयत्नांसाठी साडेचार (४.५ *) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव ऐकलं कि काही गोष्टी आठवतात १. तिसरी किंवा चौथीत त्यांच्यावर असणारा एक धडा
२."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा डायलॉग ३."सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा त्यांचा केसरीतला अग्रलेख आणि४. मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही हि शाळेत कुठेशी ऐकलेली गोष्ट.
याउप्पर नवीन पिढीला त्यांच्याबद्दल काहीही माहित नाही आणि म्हणूनच दिग्दर्शक ओम राउतने सुरवातीलाच हे स्पष्ट केले आहे कि नवीन पिढीला त्यांच्या विचारांची ओळख व्हावी हा मुख्य उद्देश सिनेमाचा आहे.
लोकमान्य टिळक त्यांचे स्वराज्यासाठी चालणारे विविधांगी प्रयत्न समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत आधी असलेली मैत्री आणि पुढे झालेले तात्विक मतभेद त्यांचे खाजगी जीवन-समाजजीवन अश्या विविध कोनांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाला स्पर्श करण्याचा चित्रपटाचा उद्देश नक्कीच सफल होतो हे मात्र नक्की.
पुणे शहरात असलेले लोकमान्यांचे वास्तव्य-पुण्यात झालेले प्लेग या रोगाचे थैमान-rand या इंग्रज अधिकार्याची या काळात झालेली नियुक्ती-प्लेग या कारणाखाली त्याने केलेले अनन्वित अत्याचार आणि शेवटी चाफेकर बंधूंनी त्याची केलेली हत्या
हि कहाणी आपल्यापैकी अनेकांना माहित असेल पण या चाफेकर बंधूंना लोकमान्य टिळकांची फूस होती/समर्थन होते हे बर्याच
मंडळींना माहित नसेल.पण होते आणि कदाचित लोकमान्य टिळक हे चाफेकर बंधूंचे "ब्रेन" हा कट रचण्यात होते हे हि बर्याच लोकांसाठी नवीन असेल.पण होते.
अभिनय:
सुबोध भावे या अभिनेत्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची भूमिका केलेली आहे आणि सांगण्यास आनंद कि तो अक्षरश: जगलेला आहे हि भूमिका. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्याने प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचवलेत. त्यांचे गो.ग.आगरकरांशी असलेले तात्विक मतभेद,समाज सुधारणेला असलेले समर्थन पण त्या अनुषंगाने धर्मात ढवळा-ढवळ करण्यास असलेला विरोध, त्या काळच्या जातीव्यवस्थेतील निम्न घटकांनी मंदिरात जाण्यास असलेली बंदी झुगारून देवाच्या चरणी त्यानाही जागा मिळावी यासाठी लोकमान्यांनी केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची रचना एक ना दोन असे अनेक प्रसंग होते ज्यात सुबोध भावे हा लोकमान्य वाटला नसता कदाचित पण सगळीकडे तो लोकमान्य टिळक वाटतो. त्यांची सकारात्मक विचारसरणी साकारण्यात पूर्णतया यशस्वी झालेला आहे तो."कितीही संकट आली आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय देऊन मी उभा राहीन"
वरवर बघता अगदी साधा भासणारा हा लोकमान्यांचा एक डायलॉग पण सुबोध भावे कोणतीही अतिशयोक्ती न करता हा त्यांचाच हे साकारण्यात यशस्वी होतो.
शाहू-फुले-आंबेडकर यांपेक्षाही वेगेळे मोठे लोक महाराष्ट्रात होऊन गेले हि माहिती नवीन पिढीपर्यंत अगदी समर्पकरीत्या पोचवणाऱ्या या चित्रपटास सुबोध भावे(अभिनय) -(दिग्दर्शक) ओम राउत-(लेखक) कौस्तुभ सावरकर यांच्या एकत्रित प्रयत्नांसाठी साडेचार (४.५ *) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर






