सोमवार, १६ जून, २०२५

जर तरची गोष्ट

 



जर तरची गोष्ट

इरावती कर्णिक लिखित आणि अद्वैत दादरकर - रणजित पाटील  दिग्दर्शित "जर तरची गोष्ट" या नाटकाचा २५२ व्वा प्रयोग बघण्याचा योग आज जुळून आला.  ‘जर आणि तर मध्ये अडकलेल्या नात्याच्या, हसण्याच्या आणि रुसण्याच्या  या विचित्र (!) गोष्ट निर्मितीचा प्रयत्न प्रिया बापट हिचा आहे.

समर (उमेश कामत) आणि राधा (प्रिया बापट) यांचे लग्न, लग्नानंतरचा डिव्होर्स आणि डिव्होर्सनंतर पल्लवी अजय   (सती) आणि आशुतोष गोखले (अबीरयांच्यासोबत जुळलेली नाती आणि नंतर सरतेशेवटी या नवीन नात्यातून परतलेली जुनी कहाणी असा सगळा गोतावळा म्हणजे "जर तरची गोष्ट" !

तर या कहाणीचा थोडाफार अंदाज वाचकांना लागला असेलच , तर पुढे जाऊन आपण कथेबद्दल जास्त काय बोलावे ? तर झाले असेल असे कि चार मित्र जमले असतील, आणि ठरवले असेल कि आपण नाटक काढू ! प्रिया म्हणाली असेल मी निर्मिती करते इरावती बाई लिहून देतील. मग कहाणी "आजकाल असेच असते" या सदराखाली  सगळ्यांनी मिळून फायनलाईझ केली असेल

दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील या दोघांनी मिळून केले आहे. बस या एका वाक्याउपर त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय सांगावे ?? शब्दमर्यादेनं दम तोडला माझ्या !!

मराठी रसिक हा एक निर्बुद्ध प्राणी असून आपण काहीही दाखवले तरी आपल्या "इमेजखाली" ते चालवून घेतल्या जाईल असा गैरसमज होण्याइतके उमेश कामत आणि प्रिया बापट मोठे स्टार मराठीत आहेत का ??  मी या नाटकाला माझे पैसे खर्च करून तिकीट काढून गेल्यामुळे मी या नाटकाला पाव (/)* देईन बाकी निर्णय मायबाप प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

(१५//२०२५)


रविवार, ८ जून, २०२५

एका लग्नाची पुढची गोष्ट


एका लग्नाची पुढची गोष्ट

"एका लग्नाची गोष्ट" या प्रशांत दामलेंच्याच जुन्या नाटकाचा पुढचा भाग  म्हणजेच "एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकाचा प्रयोग क्रमांक ७७१ आणि प्रशांतजींचा वैयक्तिक १३२५२ वा प्रयोग बघण्याचा भाग्य आज लाभले. एका लग्नाची गोष्ट मधील मन्या (प्रशांत दामले) आणि मनी (कविता मेढेकर) यांचे त्या नाटकांत प्रेम होते आणि मग लग्न होऊन 'ते' नाटक संपते. या नाटकांत दोघंही चाळीशीच्या घरात आहेत आणि वयानुसार त्यांच्या नात्यांत  होणाऱ्या दुराव्याचा कसा कस लागतो याचे कथानक म्हणजे "एका लग्नाची पुढची गोष्ट" . अद्वैत दादरकर हे  या नाटकाचे लेखक  दिग्दर्शक आहेत.

तर या नाटकांत मन्या मनी हे दोघंही छानपैकी आपल्या संसारात मश्गुल असतात, त्यांना एक २२ वर्षांचा मुलगाही असतो आणि तो बंगलोर ला कुठेतरी शिकत असतो. तर जसे जसे त्यांचे वय वाढत जाते तसं तसं त्यांच्या नात्यांत एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो. लग्नानंतरच्या जीवनात येणाऱ्या बदलांमुळे नवरा बायकोच्या नात्यांत मानसिक रित्या कितपत ताण निर्माण होतो हे  दाखवण्याचा प्रयत्न आहे. मुखत्वे लग्नापूर्वीचे प्रेम आणि रोमँटिक संबंध लग्नानंतर कसे बदलतात, या बदलामुळे त्यांच्या आपापसातील कम्युनिकेशन मध्ये कसा बदल होतो हे जाणवून देण्याच्या प्रयत्न नाटकांत आहे.

त्यांच्या नात्यांत येणारा हा रुक्षपणा दूर करण्यासाठी मनी हि पुरु (अद्वैत दादरकर) आणि कश्मिरा (मृणाल चेंबूरकर) यांच्या साह्याने एक प्लॅन राबवते. आणि तो प्लॅन यशस्वी झाल्यामुळे मन्याच्या मनात पुन्हा प्रेमाची पालवी फुटून त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत होतात.

अभिनयाबद्दल बोलायचे म्हटल्यास प्रशांत दामलें बद्दल काय बोलणार..? ते अभिनय तर छान करतातच पण गातातही हि अप्रतिम आणि नाचतातही खूप सहज . सुरवातीला चिडचिडा आणि नंतर भावूक झालेला मन्या खूप छान उभा केलाय. त्यांचे "मला सांगा " आणि "ती परी "ह्या दोन गाण्यांशिवाय तिसरं गाणंही ऍड केलंय. "तू हि असावा मी ही असावीअसे बोल आहेत त्या गाण्याचे. आधीची दोन्ही गाणी आवडत होतीच पण हे  तिसरं गाणंही छान जमून आलंय.कविता मेढेकर यांनी उत्कृष्ट रित्या नात्यांतील दुरावा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायकॉलॉजिकल थिरपीचा वापर करून तिने पुरु कश्मिरा सोबत रचलेला प्लॅन आणि त्याचे केलेलं execution बऱ्यापैकी पटते. आणखी एक नेपथ्याचा अति वापर करता कथानक समजावण्यासाठी तिचाच दोन-तीन दा दिग्दर्शकाने वापर केलेला आहे. म्हणजे ती एंट्री प्रेक्षकांतून घेते, नाटकांत दोन-तीनदा कथेपासून वेगळी होऊन प्रकाशयोजनेच्या साहाय्याने काय चाललंय स्टेजवर ते समजावते. ते बरोबर शोभलंय. याला लेखक-दिग्दशर्क अद्वैत दादरकर ची नवीन संकल्पना कदाचित म्हणता येईल पण ती शोभलेली आहे व्यवस्थित, प्रेक्षकांना कथानक समजते पूर्णपणे.

सरतेशेवटी midlife क्रायसिस या प्रत्येकच विवाहित जोडप्याच्या आयुष्यातील अनिवार्य घटनेभोवती विनोदी अंगाने गुंफणाऱ्या या कथानकांस मी पूर्ण पाचपैकी पाच स्टार (*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर (08/06/2025)