रविवार, २० मार्च, २०१६

इच्छा नि आवश्यकता



"आवश्यकता" हा जीवनाचा न टाळण्याजोगा भाग
त्या देर-सवेर पुर्ण होतातच
काळानुसार  कधी ना कधी
त्या पुर्ण होण्यासाठी पळवाट मिळवतातच

खरा प्रश्न हा असतो कि
इच्छांना महत्व द्यावे कि आवश्यकताना??
दोघींचेही एकमेकांशी सख्य
पण नशिबाचा कस लागतो प्रत्यक्षात उतरताना

आवश्यकता कुणाच्याही शेवटी  पूर्ण होतातच
त्यात काहीही नवल नसते  
पण आवश्यकतांनी  इच्छांच रूप घेतल
आणि मग कुणि लक्ष्य मिळवलं तर मात्र नवल असते

आवश्यकता या  एखाद्या फकीराच्याही असतात
कशाही तो त्या पूर्ण करतोच करतो !!!
आणि इच्छा या एखाद्या राजाच्याही असतातच
त्या साठी तो गाऱ्हाणे  रडतोच रडतो !!!

हाच असेल बहुधा  देवानी नेमलेला
नशिबाचा मुख्य कार्यभाग
सगळ्यांना नेहमीच सगळंच मिळाल
तर देवाने शेवटी कुठे घ्यावा सहभाग

-समीर 

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

England Vs South Africa


आपल्या आय पी एलच्या फायनल सारखा अक्षरश: उत्कंठा शिगेला पोचवणारा 20-20 आंतरराष्ट्रीय सामना आज विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीतच बघायला मिळाला. अर्थात भारतीय पिचचा वाटा असला तरी खेळाडूंचे योगदान दुर्लक्षित करता येणारच नाही. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २३० धावांचा पहाड उभा केला. आणि प्रत्युत्तरात इंग्लंडने डेल स्टेन असलेल्या गोलंदाजांच्या तोफखान्याचा सामना करत लक्ष्य २० षटके व्हायच्या आधीच गाठलं. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या मानसिकतेच प्रदर्शन यातून स्पष्टपणे घडलं असे मला वाटलं. इंग्लंडच्या डावात १७ व्या षटकात मॉरीसला जरा फटका पडल्यावर आफ्रिकन खेळाडू पूर्ण आशा सोडून बसले होते आणि आशा न सोडता प्रयत्न केला असता तर चित्र निश्चितच वेगळं राहिलं असतं. वास्तविक बघता त्यांच्या फिल्डिंगने त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचून दिला. पण त्यांच्या पराभवाला हि खचलेली मानसिकताच शेवटी कारणीभूत ठरली.आजपर्यंतच्या २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसर्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा धावांचा पाठलाग केल्याबद्दल इंग्लंड संघाचे अभिनंदन.
-समीर

मंगळवार, १५ मार्च, २०१६

New Zealand Vs India

New Zealand beat India by 47 runs
still I will appreciate Indian performance for-
1. Captain Dhoni's bold decision to finish Ashwin's quota of all 4 overs before 10th over
2.Captain did not loose his calmness after getting hit for a six to Ashwin on 1st ball of match
3. Jaspreet Bumrah's bowling skill specially his ability to bowl yorkers is exceptional compared to other Indian bowlers
4.In 2007 world cup India loose first match against New Zealand and then went on to win the world cup.
On this positive note, I support Team India.

रविवार, १३ मार्च, २०१६

फुन्त्रू (मराठी)


मराठी सिनेमा हा "प्रेम" हा विषय सोडून साय-फाय थ्रिलर अश्या मराठीला कदाचित पूर्णत: अनोळखी असणार्या प्रांतात शिरू शकतो काय?? उत्तर आहे होय!!!! तसली हिंमत करणारे फिल्ममेकर्स मराठीत आहे आणि तसा प्रयत्नही ते करण्याची हिंमत करू शकतात, या हिमतीला लोकाश्रय कितपत मिळेल हे काळ ठरवेलच पण प्रयत्न मनापासून केलेला आहे हे जाणवते हे मात्र नक्की. त्यातही उल्लेखनीय असे की     साय-फाय थ्रिलर हा प्रकार कदाचित मराठीत नाही आणि मराठीचं एकूणच आर्थिक गणित बघता ते शक्यही नाही पण हि हिंमत करून दिग्दर्शक सुजय एस. डहाके मराठीत कदाचित पहिल्यांदाच एक साय-फाय थ्रिलर घेऊन आलेत. शेवट करताना त्यातही तो अर्धवट ठेवून आणि फुन्त्रू-२ अशी पाटी देऊन सुजयजींनी सिक्वेल येणारच असे अप्रत्यक्षपणे दर्शकांना सुचित केलेले आहे.

मोहन आगाशे हे एक इंजीयारिंग कॉलेजचे प्राध्यापक-संशोधक-फाउंडर-संशोधक वगेरे. मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेजचे.  साय-फाय थ्रिलर अर्थात सायन्स वर बेतलेली रहस्यमय कथा जेंव्हा बनवल्या जाते तेंव्हा आपण जे साधर्म्य कथेसाठी जोडतोय ते खरोखर बघण्यासारखे नाही काय? एक मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेज मधले विद्यार्थी-प्राध्यापक इतक्या शिताफीने कम्प्युटर software प्रॉब्लेम्स इतक्या डीटेल्ससकट उलगडू शकतात??थोडावेळ विनोद बाजूला ठेवू पण केतकी माटेगावकर सारखी मुलगी देखील मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये admission घेत नाही, त्याची कारणे आपण बाजूला ठेवू पण असे घडते हे मात्र नक्की.     
      
मदन देवधर (वीरा) हा एक मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी आणि (अनया) केतकी माटेगावकर ही त्याची क्लासमेट. ती त्याला आवडते आणि तो प्रयत्न करतो पण त्याला जवळपास रिजेक्ट करते. मग तो एका प्रोजेक्टपर्यंत पोचतो आणि तिची एक प्रतिकृती तयार करतो. या सगळ्या गुंत्याला साकारताना कहाणी मैत्री-effective task execution इत्यादी इत्यादी बर्याच विषयांना स्पर्श करते.
संजय डहाके हे या आधी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या "शाळा"या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना भेटलेत. फुन्त्रू हे टायटल का तर इमेज क्रिएशन चा जो प्रोजेक्ट विराला सापडतो त्या प्रोजेक्टचे नाव असते फुन्त्रू. संजयजीच याचे कथा व पटकथा लेखक. कथा व्यवस्थित जुळवून आणलेली आहे त्यांनी काही क्षुल्लक डीटेल्स वगळले तर कुणीही कथेवर बोट दाखवू शकणार नाही उदा. इंजिनियरिंगचे विद्यार्थी सोडले तर. पण मुद्दा आहे पटकथा कारण ही देखील संजयजिंचीच. कथेला नीट जुळवण्यात कदाचित इतकी मेहनत घेतल्या गेली की पटकथेकडे दुर्लक्ष झालेले आहे हे नक्की. इतके स्पष्ट दुर्लक्ष की कथेचा अंदाज प्रेक्षकांना लागून जातो पण कथाच पुढे न सरकल्यामुळे प्रेक्षक कंटाळून जातात.
हृषीकेश-सौरभ-जसराज असे तीन संगीतकार या चित्रपटाला लाभलेत आणि सांगण्यास आनंद की अप्रतिम संगीत सगळ्या गाण्यांना त्यांनी दिलेले आहे.बाकी सगळे गाणे तर उत्तम आहेतच पण वैभव जोशी यांनी लिहिलेल्या "अलख निरंजन तू" हे गाणे विशेष उल्लेखनीय. आणखी एक संगीतात संगीत दिग्दर्शकांनी जे कमावलं ते साकेत कानेटकर यांनी पार्श्व-संगीतात गमावलं. असे बरेच प्रसंग होते ज्यात उत्तम पार्श्व-संगीत ही कहाणीची गरज होती कारण कहाणी ही एक साय-फाय थ्रिलर होती. पण........

संजय जाधव यांनी टाईमपास १ च्या वेळेस शेवट न करवता अर्धवट ठेवून सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या संजयजींनी सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केलेली आहे. सिक्वेल आल्यास हरकत नाही पण नवीन भागात संथ पटकथा आणि पार्श्व संगीत या बाबींकडे लक्ष देतील अशी अपेक्षा प्रेक्षक बाळगतात. मला चित्रपट ठीक वाटला म्हणून मी दोन (२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर