सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

तमाशा

तमाशा

दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजवण्यासाठी दिग्दर्शकाने पूर्ण कहाणी वाहून घेतलेली आहे. वेद वर्धन-सोहोनी (रणबीर कपूर) आणि तारा माहेश्वरी (दीपिका पदुकोण) यांची अपघाताने झालेली भेट अन त्या भेटीला पुढे आलेली प्रेमाची भरती या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे "तमाशा".

इम्तियाज आली स्वत:च लेखक आल्यामुळे कदाचित पण त्याने बर्याच ठिकाणी गोष्टी आपोआप समजतील अशी काळजी घेतल्याचे जाणवते. पण तरीही जो फरक पडायचा तो पडतोच. एक उदाहरण घेऊ, "तमाशा" हे शीर्षक का तर हे समजावताना त्याने वेद वर्धन-सोहोनीच्या पूर्वायुष्याचा संदर्भ वापरलेला/दिलेला आहे. त्याच्या पूर्वायुष्यातील आवडत्या गोष्टीत तमाशाचा समावेश करून त्याद्वारे त्याने त्या कलेला सरतेशेवटी तो आपले पोटाचे साधन कसे बनवतो हे बेमालूमपणे इम्तियाज manage करतो. एक हे हि उदाहरण घेऊ कि दिग्दर्शकच लेखक असला तरी काही गोष्टी समजावताना कसा कमी पडू शकतो, कसं/कुठे तर तारा माहेश्वरी आणि वेदची भेट होते, ताटातूट होते मान्य पण ताटातुटीच्या पाच वर्षांच्या कालखंडात (कालखंड दाखवलेला आहे) काहीही फरक पडत नाही?? मागील पानावरून पुढे अशी कहाणी त्यांची भेट झाल्यावर सरकते?? ती दिल्ली अन तो शिमला असे वेगवेगळ्या शहरातील असूनही?? इथे दिग्दर्शक प्रेक्षकांना "समजून जातील ब्वा" असे manage करतो. तारा माहेश्वरी या दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखेच्या उल्लेख केवळ ती आहे इतपतच करावा लागेल कारण इम्तियाज आली आपल्याच "रॉकस्टार" पटाकडून इतका इम्प्रेस वाटतो कि तिला जास्त स्कोपच त्याने ठेवलेला नाही. बर्याच काळ तर ती कहाणीच्या बाहेरच असते.
या असल्या गोष्टी संगीतात दाबून जातात आणि प्रेक्षकांच्या स्म्रुतिपटलावरुन थिएटरच्या बाहेर पडताना पुसल्या जातात पण श्री रा.रा.ए आर रहमान हे पुन्हा एकदा पार्श्वसंगीत आघाडीवर अपयशी ठरलेले आहेत. दोन किंवा तीन गाणेही आहेत पण ते "सो सो" category त येतात.
इम्तियाज अली ने लेखक म्हणून कहाणी लिहिताना कहाणीचा हेतू ठरवताना गफलत केल्याचे जाणवते किंवा नंतर एका कहाणीच एका चित्रपटात रूपांतरण करताना जे बदल घडले असतील त्या बदलत कहाणी भरकटली असे वाटते. कारण काहीही असो पण कहाणी भरकटली बरेच काळ असे इम्प्रेशन घेऊन प्रेक्षक बाहेर पडतात. एक साधा मुलगा कला क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणारा मग घरच्यांच्या दबावाखाली झुकून
इंजी. इत्यादी क्षेत्रात नशीब आजमावलेला. मग तिथे यशस्वी झाल्यानंतर बॉलीवूडसदृश्य कर्मधर्मसंयोगाने तसलीच परिस्थिती बनून प्रेमात पडलेला. मग ताटातूट झालेला. या ताटातुटिचे कारण हि शब्दश: "हास्यास्पद" असलेला. हे कारण हास्यास्पद बनले कारण लेखक/दिग्दर्शक या कारणाची गहनता प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात सपशेल अपयशी ठरलेत. पियुष मिश्राच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल. कहाणी लहान मुलांना सांगणारा/समजावणारा एका म्हातार्याची व्यक्तिरेखा त्याने निभावलेली आहे. पण कहाणी पुढे सरकवण्यात इतक्या ठिकाणी त्याचा संदर्भ येतो कि जर तो कमी पडला असता तर अक्खा चित्रपटच हास्यास्पद बनला असता.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजावण्याचा लेखक/दिग्दर्शक इम्तियाज अलीचा प्रयत्न त्याचे कमर्शियल रूपांतरण करताना भरकटल्याचे जाणवते. मी या चित्रपटाला १ स्टार १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मुंबई-पुणे-मुंबई 2



मुंबई-पुणे-मुंबई=2 

मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद  कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला.  "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले  मराठी चित्रपट असले तर आजच्याहि  जमान्यात  मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात. सुट्टी असो वा नसो पण मराठी चित्रपटांनी आजच्या जमान्यात तिकीट बारीवर शब्दश: अलोट गर्दी खेचणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघंही आधीच्याच भागाप्रमाणे याही भागात असून त्यांनी त्यांची कहाणी पुढे नेलेली आहे आणि आधीच्या भागात  त्यांची नावे नव्हती फक्त एक मुंबईचा आणि एक मुंबईची अशी सारवासारव होती पण या भागात नामकरण करून गौतम प्रधान आणि गौरी देशपांडे यांची कहाणी नीटपणे मांडलेली आहे.
गौतम प्रधान हा पुण्याचा मुलगा आणि गौरी प्रधान हि मुंबईची मुलगी यांचा विवाहसोहळा संपन्न कसा होतो या धाग्याभोवती वेवेगळ्या अंगांनी फिरणारी कहाणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई २. पण यात समाधान कि कहाणीत कोणतेही फिल्मी ट्विस्ट नाही. वास्तविक बघता अंगद म्हैसकर (अर्णव) च्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना अशी शंका बरेचदा येते आणि त्यातही अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल पक्की राहात नाही त्यामुळे या संशयाला बळकटी मिळते पण सरतेशेवटी चित्रपट "शेवट गोड" करून संपतो. पण सतीश राजवाडे हे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना थोडेफार कन्फ्युज करण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
चित्रपटाची पहिल्या भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात. बाकी जाऊ देऊ पण खानविलकर कि कोणीतरी या बिल्डर्सची जाहिरात करून देण्याची पद्धत त्यांनी वापरली. 
अविनाश-विश्वजित या संगीतकार जोडीलाच पहिल्या भागाप्रमाणे याहि भागात राजवाडेंनी रिपिट केलेले आहे. पण पहिल्या भागात "कधी तू" आणि "का कळेना" या दोनच गाण्यांनी जो प्रभाव या जोडीने निर्माण केला होता त्यांच्या १०%हि या वेळेस नाही. मान्य असो वा नसो पण या दोन गाण्यांचे पहिल्या भागाच्या यशातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. या वेळेस त्यांना ती जादू री-क्रिएट करणे अजिबात जमलेले नाही.
प्रेम आणि त्यानंतर लग्नाची/लग्नासाठी/लग्नापर्यंत इत्यादी इत्यादी जुळवाजुळव हा नाही म्हटले तरी सर्व वयोगटांत इंटरेस्टिंग विषय आहे. यावर मराठी चित्रपटात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे संवाद (dialogues ) पण अश्विनी  शेंडे  या लेखिकेने पटकथा आणि संवाद हि दुहेरी जबाबदारी सांभाळूनही दोन्हीकडे उत्तम न्याय केलेला आहे. त्यातही त्यांच्या संवाद लेखनासाठी त्यांचे विशेष कौतुक.
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला सांभाळत सतीश राजवाडेंनी त्या दोघांकडूनही उत्तम अभिनय करवून घेतलाय पण मागील भागातली अविनाश-विश्वजित हि जोडी संगीत आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली आहे. काही प्रसंगात "कधी तू" हे background म्हणून वापरले असते तरी चालले असते असे उगाचच प्रेक्षकांना बरेचदा वाटून जाते. मला सगळंच आवडल विशेष करून संवाद पण संगीताने माझा भ्रमनिरास केला म्हणून मी चित्रपटाला साडे तीन (३१/२)* स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर


बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

प्रेम रतन धन पायो


करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली  खासियत  या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या  नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!! 

सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ  है आणि  विवाह   असल्या  एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद"  आपोआप बनतो.  

सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी  मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते.  या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली  त्याचप्रमाणे या  वेळेस रिपीट ऑडीयंस तर  सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.  

लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत  प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट  उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.

आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........

मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा  वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क  हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य  समजून जायला हवे. 

चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर