रविवार, ३१ मे, २०१५

तनु वेड्स मनु रिटर्न्स



तनु वेड्स मनु रिटर्न्स 

निर्माता दिग्दर्शक आनंद राय (आपले रांझणा वाले हो) हे त्यांच्याच जुन्या तनु वेड्स मनु चा सिक्वेल अर्थात परत टू घेऊन आले आहेत. सिक्वेल म्हटल्यावर तो पहिल्या भागावरच अवलंबून हवा. जर तो तसा नसेल लोकांचा इंटरेस्ट निघून जातो. पण तनु वेड्स मनु बद्दल सांगण्यास आनंद कि कहाणी पूर्णपणे पहिल्या भागावर अवलंबून आहे. आणि पहिला जिथे संपतो तिथूनच पुढे दुसरा सुरु होतो पण तरीही दुसरा बघताना पहिला बघितलेला असण्याची आवश्यकता जाणवत नाही. पूर्णपणे वेगळे कथानक आहे आणि ते पहिल्या भागावर अवलंबून असले तरी त्याचे संदर्भ संवादात मिळतात. त्यामुळे पहिला बघितलेला नसला तरी दुसरा बघूनही समजण्यात काहीही गफलत होत नाही. या बाबीवर आनंद राय खूप मोठे मैदान मारतात कारण सिक्वेल म्हटले कि आपल्याला असते हॉलीवूड ची सवय. कुठलाही सिक्वेल जर आधीचे पार्ट बघितलेले नसतील तर पटकन उतरत नाही. सिक्वेल हा हॉलीवूडमध्ये आधीच्याच कहाणीवर इतका अवलंबून असतो कि बस... तर सांगायचा मुद्दा हा कि हा पार्ट टू असला तरी पण तुम्ही पहिल्यांदाच जाऊनही नीट एन्जॉय करू शकता.
कहाणी:
पहिल्या भागात दोन व्यक्ती प्रेमात पडतात. त्याचं लग्न होते आणि तेथे कहाणी संपते. मग आता दुसर्या भागात लग्नानंतरच त्यांचं आयुष्य कसं बनल असेल? इंटर्नल consequences असतील का?
असतील तरी त्यांचा स्वभाव (पहिल्या भागानुसार) बघता त्यांनी ते कसे handle केले असतील?
अश्या प्रश्नांचे उत्तरं घेऊन दुसरा भाग आलेला आहे. लेखक पहिल्या आणि दुसर्या भागाचेही हिमांशू शर्माच आहेत पण त्यांनी कोठेही conceptual अतिशयोक्ती केलेली नाही. नाहीतर असल्या प्रकरणात काहीतरी संदेश देणे- कौतुक मिळवणे- अवार्ड्स मिळवण्याची इच्छा बाळगणे असल्या विविध कारणांखाली "अती" म्हणजेच practically घडण्यास अशक्य असल्या बाबींचा समावेश केल्या जातो. मग या बाबींना कहानिशी-पहिल्या भागाशी वगेरे तारतम्य सांभाळण्यात दिग्दर्शकाची पकड सुटते.पण येथे लेखकाने असे काहीही घडू दिलेले नाही.
अभिनय:
तनु त्रिवेदी (कंगना राणावत) हिने अक्षरश: एकहाती आणि समर्थपणे तोलून धरलेला हा चित्रपट आहे.
तिचे मनुशी (आर माधवन) पटणे- न पटणे इत्यादी साकारताना पहिल्या भागातला तोच बिनधास्तपणा साकारलेला आहे. आणि तरीही नवेपणा देखील itroduce केलेला आहे. या (थोड्याफार) नवेपणाचा मला जाणवलेला मला जाणवलेला संदर्भ म्हणजे तिचे राजा अवस्थी (जिमी शेरगिल) सोबतचे काही प्रसंग. पण कदाचित दुसर्या भागात ती लग्न झालेली आणि पहिल्या भागात कुमारी असा फरक असल्यामुळे तो कोरडेपणा असावा. आर माधवन या व्यक्तीने काहीही जास्त संवाद नसतानाही फक्त expressions मनु शर्मा तोललेला आहे. आणि याचमुळे तो व्यवस्थित जमून आलेला आहे. पण तनु बर्याच प्रसंगात इतकी जमून आलेली आहे कि हा गडी नायक न राहता सहाय्यक व्यक्तिरेखा बनतो. पण हि तनुच्या (कंगनाच्या) अप्रतिम अभिनयाची एकप्रकारची असलेली पावतीच.
दिग्दर्शन:
आनंद राय यांनी सिक्वेल मधेही पहिल्या भागावर अवलंबून असणेपण सोडलेले नाही आणि तरीही नवीन प्रेक्षकांना तो समजेल कुठेही न समजल्यासारखा वाटणार नाही याची काळजी घेतलेली आहे हे वाटल्याशिवाय राहत नाही. भलेही संगीत हा कमर्शियल यशासाठीचा एक अतिशय महत्वाचा घटक यात कमी पडतो.पण ती कमी कहाणी अन दिग्दर्शकाचे कहाणी हाताळण भरून काढते.

पहिला भाग हा उत्तम होताच पण हा दुसरा भागही अप्रतिमरीत्या बनलेला आहे. एखादा सामान्य व्यक्ती चित्रपटगृहात तीन तास एन्जॉय करणे या हेतूने जातो. बाकी काहीही त्याचा हेतू नसतो. बर्याच काळानंतर या हेतूला पूर्णपणे खरा करणारी एक कलाकृती. मराठीत सिक्वेल्ची अपेक्षा इतकी नाही पण भविष्यात "मुंबई-पुणे-मुंबई" चा सिक्वेल कधी बनला तर तो असाच अर्थपूर्ण असावा अशी मला प्रामाणिक अपेक्षा आहे. हिमांशू शर्माचे अप्रतिम कहाणी आणि पटकथा लेखन अन कंगनाच्या अप्रतिम अभिनयासाठी मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २४ मे, २०१५

अगबाई अरेच्या-२ (मराठी)




अगबाई अरेच्या-२ (मराठी)

अगबाई अरेच्या या आपल्या पहिल्याच चित्रपटाचे टायटल दुसर्या चित्रपटात वापरून त्या सिक्वेल सारखे २ हे शीर्षक देऊन केदार शिंदे हा नवीन चित्रपट घेऊन आलेला आहे पण सांगण्यास आनंद जी हा चित्रपट म्हणजे सिक्वेल नाही. पूर्णत: वेगळे कथानक आहे आणि या कथानकाचा पहिल्या भागाशी काहीही संबंध नाही.मागच्या अगबाई अरेच्या मध्ये "गालावर खळी" स्वप्नील बांदोडकरचे गाजलेले गाणे होते. भलेही तो चित्रपट कथानकासहित विस्मृतीत गेला असेल पण हे गाणे आणि अजय-अतुलचे "मल्हार वारी" हे गाणे विसरणे अशक्यच. तिकीटबारीवर तो चित्रपट खूप गाजला होता पण त्या गाजण्यामागे या दोन गाण्यांचा सहभाग खूप मोठा आहे.याच पहिल्या भागातले "मन उधाण वार्याचे गुज पावसाचे" हे शंकर महदेवनचेहि उत्कृष्ट गाणे होते.

असे जर आहे तर हा पार्ट २ असा दुसरे भागासारख नाव घेऊन का आला असेल ? पहिल्या भागात कथेच्या नायकाला दुसर्याच्या मनातल ओळखण्याची शक्ती आपोआप मिळते आणि त्याचा तो कसा वापर करतो या भोवती फिरणारे ते कथानक होते. या भागात अशी कोणतीही शक्ती वगेरे कथेत नाही पण मी बघितलेल्या केदार शिंदेच्या मुलाखतीप्रमाणे प्रेमात मन-कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा हे medium खूप महत्वाची भूमिका बजावतात. मग पहिला भाग हा पूर्णत: मनावर अवलंबून जर होता तर हा भाग स्पर्श अर्थात त्वचा या medium वर अवलंबून आहे. म्हणून हा पार्ट २ असावा. आणि केदार शिंदे हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक मोठे नाव. त्यामुळे पुढील काही वर्षात याच रेंज मध्ये पुढील पार्ट दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. त्या मुलाखतीत तरी मला असं जाणवलं आता बघुयात कि व्यावसायिक गणितं केदार शिंदेच्या पाठीशी राहतात कि त्याला थांबवतात.

अभिनय:सोनाली कुलकर्णीच्या अप्रतिम अभिनयाचे कौतक असल्याशिवाय अगबाई अरेच्या-२ चा उल्लेखहि अशक्य इतका अप्रतिम अभिनय तिने केलेला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणजे दिल चाहता है आणि डॉ प्रकाश बाबा आमटे वाली (दुसरी नाही), नाहीतर सिनली कुलकर्णी मराठी चित्रपट सृष्टीत दोन आहेत. गैसमज होण्याची शक्यता आहे.तर या सोनाली कुलकर्णीने रंगवलेली शुभांगी कुडाळकर हि यातली मुख्य व्यक्तिरेखा. हिच्या अवतीभोवती पूर्ण काहीही सुरवात ते शेवट पर्यंत फिरते. पण सांगण्यास आनंद कि सोनाली कुलकर्णी कोठेही कमी पडत नाही. हि कहाणी तिचा तिच्या (कोणत्याही) प्रेमाला होणारा स्पर्श आणि त्याचे aftereffects अश्या एका वेगळ्याच विषयाभोवती गुंफलेली आहे.
दिग्दर्शन:
केदार शिंदे यांचे दिग्दर्शन हि चित्रपटाची जमेची बाजू, यांच्या दिग्दर्शन क्षमतेबद्दल कुणाची शंका असण्याची शक्यताच नाही. आणि तरीही कुणाला शंका आल्यास "सही रे सही" किंवा "पुन्हा सही रे सही" हि त्यांची दोन नाटके बघून घ्यावीत. गैरसमज दूर होईल.
तर स्पर्शावर बेतलेले एक कथानक आणि त्यातही मराठी म्हणजे प्रेम हा कहाणीचा अनिवार्य भाग. या स्पर्श आणि त्याचे कहानिशी corelation सांभाळताना दिग्दर्शकाची पकड सुटेल असे बरेचशे प्रसंग होते. सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे सोनाली कुलकर्णीच्या मुख्य व्यक्तिरेखेला किती काळ फुटेज देणे. तिला कमी काळ जरी पडद्यावर आणल असत, एडिटिंग वगेरे मध्ये रोल काटला असता तरी फरक पडला असता. येथे केदार शिंदे मैदान मारतात.

पहिला भाग हा सुपर डुपर हिट होता. मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड वगेरे पण जर दोन असे सिक्वेल सारखे शीर्षक वापरताय तर मग थोडा फार संबंध पहिल्या भागाशी दाखवायला हरकत नव्हती असं वाटून जाते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग रोहित शेट्टी जसे त्याचा चित्रपटात दिग्दर्शनाचे श्रेय Rohit Shetty & team असं आपल्या पूर्ण संचाला देतो, तीच पद्धत इथेही केदार शिंदे & team अशी श्रेयनामावलीत दिग्दर्शनाच्या श्रेयासाठी वापरलेली आहे. पण मग त्याची सगळ्यात मुख्य गोष्ट फॉलो केलेली नाही. mouth to mouth publicity साठी कोणत्याही चित्रपटाचा शेवट मुख्य भूमिका बजावतो.
तर चित्रपटाचा संथ शेवट आणि संगीत हे दोन मुख्य मुद्दे अगबाई अरेच्या-२ मध्ये कमी पडतात म्हणून मी चित्रपट ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर