शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

सौ.शशी देवधर (मराठी)



सौ.शशी देवधर (मराठी)

जेंव्हा कोणताही मराठी चित्रपट बघायला तुमचे पाय चित्रपट गृहाकडे वळतात तेंव्हा एक गोष्ट कंसीडर करायलाच हवी कि तो चित्रपट "प्रेम" या संकल्पनेवर बेतलेला असतो आणि त्याच संगीत हा त्याचा आत्मा असतो पण सौ शशी देवधर
आश्चर्यकारकरित्या त्याला अपवाद ठरतो. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणत्याही स्वरुपात हा चित्रपट प्रेम संकल्पनेच्या संपर्कात येत नाही. आणि "आर्ट फिल्म" हि संकल्पना वाटू शकते इतके ट्विस्ट आणि टर्न कहाणीत आहेत आणि तरीही प्रेमाशी संपर्क आल्याविना.या मुव्हीला माजी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने निर्मिती करण्याची हिम्मत दाखवली हे विशेष उल्लेखनीय.
कहाणी:
मराठी सिनेमात प्रेम या संकल्पनेवर अवलंबून नसलेली एका स्त्रीची कहाणी जी आपल्या आयुष्याचे उसवलेले ठिगळ जोडायचे प्रयत्न करते आहे,एका सायकियाट्रीस्ट,एका पोलिस इन्स्पेक्टर आणि एका शिक्षकासोबत. मराठी सिनेमा "स्प्लीट personality " या अवघड विषयावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतो का? उत्तर हो आणि सौ शशी देवधर हे त्याच उदाहरण. डॉ अजिंक्य वर्तक(अजिंक्य देव) यांच्या कार सोबत सौ शुभदा देवधर यांच्या अपघाताने कहाणीची सुरवात होते. आणि अनेक वळणे घेऊन सौ नीलिमा वर्तक यांच्या कहाणीने संपते. सायको थ्रिलर हा प्रकार मराठीत जवळपास नाहीच पण हा चित्रपट सुरवात करतो आहे अशी अपेक्षा एक रसिक म्हणून आपण बाळगूया. .
अभिनय:
सगळ्यात आधी सई ताम्हणकर हिचे खरोखर कौतुक. सौ शुभदा देवधर आणि सौ नीलिमा ठाकूर अश्या दोन वेगवेगळ्या साच्यातील भूमिका तिने समर्थपणे पेललेल्या आहेत.दुनियादारी मधली शिरीन किंवा इतर कोणत्याही प्रेम या संकल्पनेवरच्या भूमिकेपासून पूर्णपणे वेगळी एक सायकिक भूमिका समर्थपणे सईने निभावलेली आहे.अजिंक्य देव याचेही बर्याच काळानंतर डॉ अजिंक्य वर्तक या सायकीयाट्रीस्टच्या एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते. आणि त्यानेही अगदी विशेष उल्लेखनीय नसली तरी समर्थपणे भूमिका पेललेली आहे. वास्तविक बघता सईची भूमिका पूर्णच फुटेज खाऊन गेली असती पण अजिंक्य देवने तसे होऊ दिलेले नाही. तुषार दळवीने देखील व्यवस्थित हाताळलेली आहे त्याची भूमिका.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक अमोल शेटगे यांचे विशेष कौतुक कारण मराठी सिनेमा अक्षरश: एका वेगळ्या विषयावर बेतलेला,इतकी गुंतागुंतीची कथा असलेला आणि कोणताही अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय चेहरा नसूनही त्यांनी समर्थपणे विषय पेललेला आहे.वास्तविक बघता स्वत: दिग्दर्शक पटकथा लेखनात सहलेखक त्यामुळे त्याने बरेचसे प्रसंग आधीच manage केले असतील या शंकेस वाव आहे.पण तरीही त्यांनी मराठीत एक वेगळा विषय आणून तो पेलून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करावेच लागेल.एक दिग्दर्शक हा एका सिनेमाच्या नौकेचा मुख्य captain असतो.सगळ्या चांगल्या वाईट बाबींना जबाबदार.आता सिनेमा मराठी तो हि इतका वेगळ्या धाटणीचा म्हणजे तिकीटबारीवर जास्त चालण्याची अपेक्षाच नाही तरीही प्रयत्नात कसूर न ठेवणे यासाठी विशेष दाद हि द्यावीच लागेल. वास्तविक बघता असे बरेच प्रसंग होते ज्यात दिग्दर्शक स्वत: कन्फ्युज झाला असता तर कपाळमोक्ष नक्की होता सिनेमाचा.पण अमोल शेटगे अक्षरश: पुरून उरलेत.
संगीत: मराठी सिनेमात संगीत हे लागतेच कारण गीत हे मुळात कविता वाटण्याइतक्या चपखलपणे प्रेक्षकांना "आत पोचतात". tubby - parik अशी जोडी यात निर्मात्याने वापरलेली आहे आणि ते हि याला पुरून उरतात.फक्त दोन गाणे पण ते कमी पडत नाहीत.चपखलपणे सूट होतात.गीतकार आशिष कुलकर्णी यांचेही गीतांसाठी विशेष कौतुक पण सगळ्यात शेवटी अजिंक्य देवच्या आवाजात एक कविता वाचन आहे त्यासाठी विशेष कौतुक कारण ती संगीत नसलेली कविता खरोखर उत्कृष्ट categoryत येते.
का बघावा:
मराठीत वेगळे सिनेमे बनतच नाहीत,वेगळ्या विषयाला मराठी फिल्ममेकर्स हातच घालत नाहीत,अशी चर्चा आपण बर्याचदा बघतो. या चर्चेला हा सिनेमा एक उत्तर देऊ शकतो. स्प्लीट personality या वेगळ्या विषयावरचा एक मराठी सिनेमा म्हणून हा सिनेमा नक्कीच बघावा असा आहे.
रेटिंग:पूर्ण प्रयत्नासाठी आणि सईच्या अभिनयासाठी मी या सिनेमाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

पुणे व्हिया बिहार



पुणे व्हिया बिहार (मराठी)

प्रेम या कन्सेप्ट वर बेतलेला हा चित्रपट असेल या कल्पनेने हा मराठी चित्रपट बघायला जर तुम्ही जात असाल तर हे लक्षात घ्यायलाच हव कि तस आहे पण "मुलगी पटवणे" यावर ते मर्यादित नाही तर महाराष्ट्र-बिहार असे दोन प्रांत involve असल्यामुळे प्रेम हे आहेच पण प्रेमानंतरची लग्नापर्यंत असलेली करावी लागणारी adjustment यावर बेतलेली हि कहाणी आहे.
उमेश कामत ( सध्या गाजणाऱ्या एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेतील ओम चौधरी,यात अभिजित भोसले) व मृण्मयी देशपांडे (तारा यादव) या दोघांची कहाणी म्हणजे पुणे व्हिया बिहार.
तारा यादव बिहार मधील एका राजकारण्याची मुलगी,महाराष्ट्रात औरंगाबाद मध्ये शिकायला येउन इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारी एक बिहारी मुलगी.अभिजित भोसले हा पुण्यातला एका मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक सुपुत्र. त्यांची कॉलेजमध्ये
झालेली भेट.
अभिनय: उमेश कामत याने अभिनयाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केलेले आहे. वास्तविक बघता त्या मालिकेत तो प्रेमभंग झालेल्या एका वकिलाची भूमिका करतो व इकडे प्रेमात पडलेल्या व प्रेयसीसाठी कोणत्याही extent पर्यंत उतरून काहीही मदत करण्यास तयार असलेला एक व्यक्ती, पण या दोन्ही भूमिकेत उमेश कामत व्यवस्थित सुट होतो. कुठेही कमी पडत नाही. मृण्मयी देशपांडेला दिग्दर्शकाने एक बिहारी मुलगी म्हणून कास्ट केलेलं असलं तरी कोणत्याही angleने ती मराठी मानसिकतेला बिहारी वाटतच नाही. त्यात तिची चूक नसेलही कदाचित कारण ती मुळचीच मराठी वाटते. आणि प्रेक्षकांना हे अनेकदा जाणवते. भरत जाधव याचंहि बर्याच काळानंतर एक कॉमेडी नसलेल्या पण चक्क थोड्या खलनायकी व नंतर सहाय्यक व्यक्तिरेखा बनलेल्या भूमिकेने दर्शन घडते. अरुण नलावडे यांनीही एका छोट्याश्या भूमिकेने छाप सोडलेली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिग्दर्शनात (मराठी) या चित्रपटाद्वारे पदार्पण केल असाव कारण त्यांनी बरेच प्रयोग करून बघितलेत. लेखक सचिन मोटे यांच्यासोबत ते सहलेखक आहेत. सलमान खानच्या नवीन आलेल्या जय हो सारख एकदा वापरण्याचा प्रयत्न केलेलं, thank यु व त्याच एक्स्प्लेनेशन हा त्याचं एक उदाहरण. तीन तासाच्या कहाणीने वळणे घेतांना कितपत घ्यावी याला मर्यादा असाव्या लागतात.नव्हे असतातच.पण सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी त्या कहाणीला इतकी वळणे दिलीत कि बस,, चक्क एका २०० भाग चालणार्या मराठी मालिकेची कहाणी तीन तासात बसवल्यासारखी वाटते.
कधी कधी अभिनय/दिग्दर्शन/पटकथा/संगीत सगळ काही उत्तम असलं तरी चित्रपटात सगळच चांगल असावं लागत.
असो...
मी उमेश कामत व भरत जाधव यांच्या अभिनयासाठी २* स्टार देईल,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर