बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

धूम-३

धूम-३

आधी याच नावाचे यशराज फिल्म्सचेच दोन सिनेमे येउन गेले. या खेपेस आपला भाउ उदय चोपरा याला अभिनय क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा आदित्य चोप्रा या त्या निर्मिति संस्थेच्या सर्वेसर्वाचा एक प्रयत्न असे म्हणता याव या साठी धूम-३. 

धूम म्हणजे दिग्दर्शक संजय गढ़वि व लेखक विजय कृष्ण आचार्य आस समीकरण आजवर होत पण यावेळेस आदित्य चोप्राने संजय गढवीला बाय बाय करून कहाणी व पटकथा लेखकालाच दिग्दर्शनाची संधी दिली. ती त्याने अर्थातच तोडीस तोड निभावण्याचा प्रयत्न केला पण.....
धूम म्हणजे आजवर थरारक चोर्या व त्यातल्या चोराला पकडण्यासाठीची धावपळ अस आजवर समीकरण होत
याही वेळेस थोडफार तेच पण नवीन दिग्दर्शकाने त्याला भावनेची फोडणी देण्याचा प्रयत्नही केलेला आहे.
त्याच्या प्रेक्षकांना पटण्या न पटण्यावर कमर्शियलि सिनेमाचे भवितव्य अवलंबून राहील.

धूम-३ ची कहाणी हि आधीच्या धूम-१ व धूम-२ शी कोणताही संपर्क न दाखवता एक पूर्णपणे वेगळाच प्लॉट कथेचा दाखवते. निर्माता व दिग्दर्शक हेच दोघ कथालेखक व दिग्दर्शक हाच पटकथा लेखक,त्यामुळे बरेच त्यांचे practicle प्रॉब्लेम्स निकालात निघाले असतील निर्मिती अवस्थेतच. या कहाणीत भावनेचा ओलावा आणण्यासाठी म्हणू पण सुरवातीला काही काळ जकी श्रॉफ ची वर्णी लेखक दिग्दर्शकाने लावलेली आहे. आणि खरोखर jackie भाऊ त्यात पूर्ण
फिट बसून सामान्य प्रेक्षकांना आमिर खानच्या महत्वाच्या व्यक्तिरेखे बाबत involve होण्यास भाग पाडतात.
खरे तर आमिर खानची व्यक्तिरेखा हि धूम-३ चा प्राण असे म्हणता येईल. दुहेरी भूमिका अगदी राम और श्याम पासून आजवर अनेक जणांनी निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमिर स्वत:च एक दिग्दर्शक असल्यामुळे त्याला त्यातील खाच-खळगे व येणारे प्रॉब्लेम्स यांची जाणीव जात्याच असल्यामुळे अभिनय करताना त्याने अनेक प्रसंगात वेगळेपण जपलेले जाणवते. अगदीच लेटेस्ट उदाहरण घ्यायचे म्हटले तर औरंगझेब या सिनेमात अर्जुन कपूर ने साकारलेल्या दुहेरी भूमिकेचे घेता येईल. त्यात भूमिकेत टीकाकारांना बराच स्कोप सुटला होता प्रॉपर सामिक्षणासाठी. पण इथे
आमिर खानने पूर्ण जीव ओतून या दोन्ही भूमिका साकारलेल्या आहेत. दोन भाऊ जेंव्हा समोर समोर एकाच फ्रेम मध्ये असतात तेंव्हा अभिनयाचे कौशल्य व दिग्दर्शन यांची कसोटी लागते. पण आमिर खान येथे अगदी पुरेपूर उतरलेला आहे दिग्दर्शकाच्या/निर्मात्याच्या//प्रेक्षकांच्या अपेक्षेवर.
दिग्दर्शनाबाबत खरोखर कसोटी लागत असेल जेंव्हा दुचाकीवर चित्तथरारक stunts चित्रपटात असतात तेंव्हा. दोन वेळेस संजय गढवी यावर पुरेपूर उतरला आणि या वेळेस विजय कृष्ण आचार्यची कसोटी होती. पण सांगण्यास आनंद कि दिग्दर्शनात कुठेही उणीव जाणवत नाही. भावनिक प्रसंगानपासून अगदी stuntबाजी पर्यंत सगळे व्यवस्थित पार पडते पण कुठेतरी प्रेक्षकांना या सगळ्याची वास्तविकता खुपल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ कतरिना कैफ व तिची भूमिका, भलेही कथेला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचीच आहे पण वास्तविकतेत तिला काहीच कधीच स्ट्राईक कस होत नाही कथेच्या मुळाबद्दल असे प्रेक्षकांना जाणवून गेल्याशिवाय राहत नाही.

प्रीतमचे संगीत दिग्दर्शन चांगलेच. वादच नाही. त्याच्या धूम च्या टायटल सॉंगचा आधीच्या धुम्स च्या लोकप्रियतेत मोलाचा वाटा आहे. टायटल सॉंग याही वेळेस तेच. पण या वेळेस कतरिना कैफ व तिच्या अंगोपांगाच्या प्रदर्शनाच्या नादात बाकी गाण्याकडे दुर्लक्ष झालेले जाणवते कित्येक प्रसंगात.

टू व्हीलर व त्याचे stunts आवडत असतील तर खरोखर एक उत्तम सिनेमा व आमिर खान fans साठी तर मस्टwatchच.

पूर्ण चित्रपटाला मी चार ४* देईन
-समीर

रविवार, १ डिसेंबर, २०१३

असा मी अशी ती (मराठी)



असा मी अशी ती (मराठी)

जर तुम्ही सचित पाटील या 'झेंडा' मुळे लोकप्रिय झालेल्या नावामुळे इम्प्रेस होऊन हा सिनेमा बघणार असाल तर 
एक गोष्ट लक्षात ठेवा कि यात फक्त आणि फक्त सचित पाटीलच आहे,बाकी काहीही नाही. प्रेम या कल्पनेवर 
मराठी सिनेमा बेतणे हे लागूच असते व हा हि प्रयत्न त्याला अपवाद नाही. स्वामी समर्थ यांच्यामुळे दिग्दर्शक अतुल काळे व निर्माती उषा साळवी हे इतके संमोहित (म्हणूयात का?) कि नशीब या कल्पनेचा समावेश कथेत करून देवदुतांचा समावेश कथेत होऊन त्या देवदूतांची वेशभूषा प्रत्यक्ष स्वामी समर्थांची देऊन सामान्य
प्रेक्षकांच्या भावनेला हात घालण्याच्या प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
दिग्दर्शक अतुल काळेंचे खरोखर कौतुक कारण त्यांनी 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकरांचा समावेश त्याच
भूमिकेत करून त्याचा उपयोग कथेचा एक महत्वाचा हिस्सा पुढे नेण्यासाठी बेमालूमपणे केलेला आहे. आदेश बांदेकर
किंवा होम मिनिस्टर या दोन्ही गोष्टीना प्रसिद्धीची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांचा समावेश जर करायचाच तर तो प्रसिद्धीसाठी नाही या वास्तविकतेबरोबर महिला प्रेक्षक वर्ग राजी व्हायला हवा तरच काही सिरीयसनेस येईल हे व्यवस्थित काळजी घेऊन त्यांच्या अन्वये कथा पुढे नेलेली आहे अतुल काळेनि.
कहाणी:
प्रेम हि मराठी सिनेमाची अत्यंत आवडती ठोकळेबाज एक कल्पना. दिग्दर्शक अतुल काळे हे स्वत:च लेखक
व मुख्य भूमिकेतील सचित पाटील हे त्यांच्या सोबतीने सहलेखक. पण सामान्य प्रेक्षकाला कहाणीत मूळ
काय हे शेवटपर्यंत कन्फ्युजन राहते व शेवटी दूर कारणाचा प्रयत्न लेखक द्वयीने केलेला आहे पण तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो व काहीही अर्थ राहत नाही. तस बघितल तर कहाणीचा उद्देश अतिशय कौतुकास्पद,सकारात्मक विचारसरणीला खतपाणी देण्याचा प्रयत्न पण अंधश्रद्धेला खतपाणी आहे कि काय या अजब कन्फ्युजन पर्यंत सामान्य प्रेक्षक येउन ठेपतो शेवट पर्यंत पण शेवटी लेखक द्वयीने तुम्ही नशीब आपले बदलू शकता या
कल्पनेवर भर देण्याचा (लोकलाजेस्तव?) एक प्रयत्न नक्की घडवलेला जाणवतो
अभिनय:
सचित पाटील हा मुख्य भूमिकेत व स्वत: एक लेखक. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वा अजाणतापणे त्याच्या भूमिकेला जास्त फुटेज मिळालेले आहे. किंबहुना अपेक्षेपेक्षा जास्तच. त्याचा प्रेम या कन्सेप्ट ला साकारताना (दोन वेळा
साकारतानाही) कुठेही आपल्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही उलट सकारात्मक विचारसरणीचा
शेवटी मुख्यत्वे वापर दाखवताना त्या अन्वये प्रेक्षकांच्या भावनांना ठेच पोचणार नाही याची स्वत: लेखक असल्यामुळे त्याने व्यवस्थित काळजी घेतलेली आहे.

सध्याच्या छोट्या पडद्यावर स्टार प्लस वाहिनीवर
गाजणाऱ्या 'प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा' या मालिकेतील"अवंतिका" मानसी साळवीने एका छोट्याश्या पण महत्वाच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वास्तविक पाहता त्या मालिकेत तिचा जो मुलगा दाखवलेला आहे (आदित्य) त्याच सारख्याच वयाचा सचित पाटील आहे (इथला नवरा) पण तिने समर्थपणे पेललेली भूमिका आहे असे प्रेक्षकांना जाणवल्या शिवाय राहत नाही आणि पल्लवी सुभाष हिने अप्रतिम अभिनय केलेला आहे. वास्तविक बघता तिची
भूमिका खूप कठीण या सदरात मोडली असती पण तिने अंधश्रद्धेला खतपाणी न घालणे/प्रेम या कन्सेप्टला साकारण्याच्या प्रयत्नात प्रक्षकांना पचणार नाही या पातळीवर न पोचणे/एका लहान मुलाच्या भावनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे असा गैरसमज प्रेक्षकांचा होऊ न देणे असे अनेक उद्देश लेखकद्वयीचे व्यवस्थित पार पाडलेले आहे. थोडक्यात एक उत्तम भूमिका निभावलेली आहे.
संगीत:
अमितराज व आदित्य बेडेकर असे दोन संगीत दिग्दर्शक वापरलेले आहेत. संगीत अगदीच extraordinary वगेरे नसले तरी अगदीच टाकाऊहि नाही. पण निर्माती उषा साळवी तरीही चक्क एका हिंदी गाण्याचा समावेश सिनेमात का करत असतील असे कोडे प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहत नाही. ते गाण 'उत्तम' categoryत मोडते पण शेवटी हिंदीच,मराठी सिनेमात त्याचा उपयोग काय हे प्रेक्षकांना जाणवल्या शिवाय राहत नाही.

रेटिंग: मी या चित्रपटाला १* देईन
-समीर