रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

किल-दिल


किल-दिल

श्री यशजी निवर्तल्यानंतर त्यांच्या यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीची धुरा नवीन सी इ ओ आदित्य चोप्राकडे आल्यापासून यशराज फिल्म्सचा चित्रपट दर्जा खालावला असून,कदाचित आजकालच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कमर्शियल एक्सलंसची कमी झालेली चिंता हे याचे महत्वाचे कारण असू शकते असा अंदाज प्रेक्षकांनी लावायला हरकत नाही असे वाटून जाते.
"जय हो" अन "किक" सारखे शब्दश: ठोकळे करोडे रुपये घेऊन जातात ते किल दिल सारख्याने चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करायला काहीच हरकत नसावी.
देव (रणवीर सिंग) आणि टूटू (अली जफर) या दोन अनाथ मित्रांची भय्याजी (गोविंदा) यांच्या अंडर घडलेली जीवनकथा म्हणजे किल-दिल. फक्त दोन हिरो घेऊन चित्रपट चालण्याचा जमाना संपून युग लोटले आहे याचा निर्माता आदित्य चोप्राने लावलेला योग्य अंदाज व कथेत परिणीती चोप्राचा केलेला समावेश.

दिग्दर्शन:
"साथिया" आणि "बंटी और बबली" चे दिग्दर्शक शाद अली यांचे बर्याच काळानंतर प्रेक्षकांना किल-दिल चे दिग्दर्शक म्हणून दर्शन घडते.

अजिबात चित्रपटातल्या कथा/पटकथा/अभिनेता/अभिनेत्री इ.इ. गोष्टींकडे लक्ष न देता फक्त मनोरंजनाचा एक तरतरीत डोस म्हणून चित्रपट बघणारा एक वर्ग बॉलीवूड मध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेला आहे. त्या वर्गाला डोळ्यापुढे ठेवून काढलेला एक चित्रपट म्हणजे किल-दिल.
किल-दिलला मी १/४ (पाव) स्टार देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर