शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

रमा-माधव (मराठी)



रमा-माधव (मराठी) 

२० वर्षापूर्वी स्वामी या मालिकेतून "रमा" या भूमिकेने अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता दिग्दर्शक म्हणून त्याच कथेला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत. नुकतेच मागील वर्षी "प्रेम म्हणजे प्रेम असत" या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केल. आणि आता हा त्यांचा दुसरा चित्रपट.
रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांची लव्ह स्टोरी वगेरे इतिहासात प्रसिद्ध नाही (बाजीराव-मस्तानी सारखी) पण तरी त्यांनी या कथेला निवडलं आणि निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मृणालजींनी.
कहाणी:
रमाबाई व माधवरावांचा त्या कालच्या परंपरेप्रमाणे बालविवाह. मग वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी त्यांच्या शनिवारवाड्यातल्या आगमनापासून कथेची सुरवात आणि त्यांनी माधवरावांसोबत सदेह सती गेल्याच्या कथेवर शेवट. त्या दोघांच्या सहवासावर आणि सहवासातून फुलणाऱ्या प्रेमावर कथावस्तू टायटलनुसार डिपेंड असेल हि प्रेक्षकांची अपेक्षा लेखक व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी पूर्ण करू शकत नाहीत. पानिपतचा पराभव अन त्या युद्धात झालेली सदाशिवराव भाऊ अन विश्वासराव यांची हानी याचा समावेश कहाणीत आपोआप होतो. नव्हे करावाच लागतो कारण त्या शिवाय कहाणी पुढे सरकत नाही. पण सदाशिवराव भाऊंचा एक तोतया
पुढे माधवारावांपर्यंत पोचतो आणि सदाशिवराव असण्याचा दावा करतो या क्षुल्लक गोष्टीचा कहाणीत का समावेश केला असावा हे प्रेक्षकांना कळत नाही. राक्षसभुवनची लढाई अन निजामाविरुद्ध मिळवलेला विजय या गोष्टीला जरा जास्तच महत्व दिल्या जाऊन अमराठी प्रेक्षकांचा समज माधवरावांच contribution फक्त तितकच आहे कि काय अशी होईल अशी शंका येते. राजयक्ष्मा किंवा स्टमक कॅन्सर याची सरमिसळ होण्याइतकी दोन्ही संकल्पनाची सरमिसळ आहे.
अभिनय:
लहानगी रमा म्हणून श्रुती कार्लेकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. आणि दिग्दर्शकाने हे ओळखून तिला व्यवस्थित हाताळलेल आहे.प्रसाद ओक यांनी साकारलेल्या अप्रतिम राघोबा दादांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम भूमिका त्यांनी निभावलेली आहे राघोबदादांची. श्रुती मराठे (राधा हि बावरी फेम) हिचेही पार्वती बाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते.
पण आलोक राजवाडे यांचा माधवराव प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, हे नक्की.
दिग्दर्शन:
मृणाल कुलकर्णी यांनी पदार्पणातच प्रेम म्हणजे प्रेम असत या चित्रपटात एक मोठ्या वयाची लव्ह स्टोरी हाताळली होती. थोडक्यात एक वेगळा विषय. आणि हा विषयही थोडाफार वेगळाच. पण मुळात हा विषय इतिहासावर जरा जास्तच अवलंबून असल्यामुळे आणि त्या काळातली माहिती उपलब्ध नसल्यामुळे जो फरक पडायचा तो पडतोच. उदाहरणार्थ रमाबाईंच्या सती जाण्यावर जर शेवट करायचा होता तर सती कस जातात याची माहिती कदाचित उपलब्ध नसावी त्यामुळे शेवटी २-३ ओळीत प्रेक्षकांना फक्त सांगुत शेवट केलेला आहे. राघोबादादांच्या काळ्या जादुविषयक कथेला पुढे सरकवताना सुरवातीला काळ्या जादूला समर्थन मिळावे असा निर्माता/दिग्दर्शकाचा कोणताही हेतू नाही अशी डिस्क्लेमर मात्र मिळते.

मराठीतला एक वेगळा प्रयत्न आणि रमाबाई-माधवराव या इतिहासात दुर्लक्षित असलेल्या एका जोडीला लाइमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न असणार्या या चित्रपटाला मी २* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

पोष्टर बॉयज- (मराठी)





पोष्टर बॉयज- मराठी 

मराठी सिनेमांचा ट्रेंड निश्चितपणे बदलू लागला असून, श्रेयस तळपदे सारखे नव्या दमाचे निर्माते वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांना स्पर्श करून चक्क मराठीत सिनेमा बदल घडवू इच्छिताहेत आणि निर्माते श्रेयस तळपदे यांचा पोष्टर बॉयज हे त्याचं एक शानदार उदाहरण.श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या बॉलीवूड contacts चांगला उपयोग निर्मितीत व प्रसिद्धीत केल्याचं जाणवते. स्पष्ट उदाहरण म्हणजे लेस्ली लुइस यांनी चक्क मराठीत मराठी पद्धतीने केलेले संगीत निर्देशन आणि फराह खान,अनु मलिक आणि रोहित शेट्टी यांचा गेस्ट अपिअरन्स. यात चेन्नई एक्स्प्रेस मधला श्री शाहरुख खान यांचा गाजलेला डायलॉग रोहित शेट्टी कथेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अधोरेखित करतो. आणि कथेच्या एका महत्वाच्या वळणावर म्हणजे प्रेक्षकांना सत्यता पटते.

रोहित शेट्टीची एक गाजलेली पद्धत आहे, त्याच्या प्रत्येक सिनेमात शेवटी श्रेयनामावलीनंतर सिनेमा शूट करतानाच्या गमतीशीर किस्स्यांचा समावेश तो करतो. भलेही हि क्षुल्लक गोष्ट वाटते पण माउथ-टू-माउथ पब्लिसिटीच्या आजच्या जमान्यात हि गोष्ट या प्रेक्षकसंख्या व रिपीट प्रेक्षकवर्ग (ज्यांचे छोट्या शहरात चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस साठी खूप महत्व आहे). गोलमाल सिरीज अन सिंघम याद्वारे त्याने सिद्ध केलेली हि एक पद्धत आहे. तसाच प्रयत्न निर्माते श्रेयस तळपदे यांनी करून शेवटी एक गाणे (आयटम सॉंग) अन त्यांनतर असे शुटींग करतानाचे किस्से चक्क मराठीत प्रेक्षकांना दाखवलेत. आणि "मानो या ना मानो" याचा निश्चितच सकारात्मक परिणाम तिकीटबारीवर पडेलच पडेल.
कहाणी:
दिग्दर्शक समीर पाटील हेच चित्रपटाचे व पटकथेचे लेखक.अनिकेत विश्वासराव,दिलीप प्रभावळकर अन हृषीकेश जोशी या वेगवेगळ्या वयाच्या तीन व्यक्तींना एका सरकारी पोस्टर वर दिसलेली आपली इमेज, मग त्या इमेज पायी आलेले तिघांच्याही वैयक्तिक आयुष्यात वादळ आणि त्या वादळामुळे त्यांच्या आपापल्या समाजस्थानावर पडलेला असर आणि त्या तिघांचाही त्या वादळाविरुद्ध म्हणजे थोडक्यात सरकार विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा अन मिळवलेला विजय. मुळात कारण अन त्या अनुषंगाने "मुलगा-मुलगी समानता" या महत्वाच्या घटकाला प्रमोट करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. आणि हृषीकेश जोशीची पूर्ण भूमिकाच त्या अनुषंगाने घुसवण्यात आलेली आहे.
दिग्दर्शन:
लेखक व दिग्दर्शक समीर पाटील आणि विषय असा कि जर दुर्लक्ष झालं तर अश्लीलते कडे झुकण्यास जराही वेळ लागला नसता.
पण सांगण्यास कौतुक कि समीर पाटील ने मराठी मानसिकतेला केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थित कहाणीला हाताळलेले आहे.
संगीत:
हरिहरन व लेस्ली लुइस हि एक गाजलेली जोडी (कलोनियल कझिन्स हा band ) आहे. या जोडीपैकी लेस्ली लुइस यांनी मराठीत कदाचित पहिल्यांदाच दिलेले संगीत म्हणजे पोष्टर बॉयज.एकदम वेगळे नसले तरी व्यवस्थित संगीत दिलेले आहे त्यांनी.

मराठीतला एक अनोखा प्रयत्न अन अभिनय संगीत दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रात व्यवस्थित आणि मुले-मुली समानता या मुद्द्याला एका वेगळ्याच angle ने केलेला स्पर्श अश्या एकत्रित सगळ्या मुद्द्यांसाठी मी चित्रपटाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर